Headlines

मध्यरात्रीपासून दुपारपर्यंत रिपरिप:पाऊस सरासरीच्या 50 टक्क्यांवर

जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्रीपासून शुक्रवारी दुपारपर्यंत पावसाची रिपरिप सुरू राहिल्याने खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १४.३ मिमी पाऊस झाला असून, १ जूनपासून आजपर्यंत एकूण २२७.४ मिमी पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्याने आतापर्यंत मोसमी सरासरीच्या ५० टक्क्यांहून अधिक टप्पा ओलांडला. जिल्ह्यात गुरुवारी मध्यरात्री सुरू झालेला पाऊस शुक्रवारी दुपारी २ वाजेपर्यंत कायम…

Read More

आंदोलन:नशिराबादजवळ पाण्याच्या साचण्यावरून नागरिक आक्रमक

नशिराबादजवळील पोलिस ठाणे फाट्यावरील सर्व्हिस रोडच्या बोगद्याखाली गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ही गंभीर समस्या कायम असतानाही टोल वसुली निर्विघ्नपणे सुरू असल्याने संतप्त नागरिक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी थेट नशिराबाद टोल नाका गाठून काही काळासाठी टोल वसुली बंद पाडली. या आंदोलनादरम्यान अनेक वाहनांना टोल न भरताच मोफत…

Read More

निफाडच्या संगमेश्वर मंदिराला पुराचा वेढा:नांदूरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने 49,382 क्यूसेक विसर्ग

कादवा नदीला आलेल्या पुरामुळे निफाड येथील ऐतिहासिक संगमेश्वर महादेव मंदिराला पुराच्या पाण्याने वेढा पडला असून मंदिराचा संपर्क तुटला आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर व नाशिक परिसरात गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी, दारणा, कादवा, बाणगंगा आदी नद्यांना मोठा पूर आला आहे. त्यामुळे निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर धरणातून शुक्रवारी ४९,३८२ क्यूसेक पाण्याचा विसर्ग जायकवाडीच्या दिशेने करण्यात आला असून…

Read More

वृक्षारोपण:भराडीच्या वीरशैव लिंगायत स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण

श्री स.भु. प्रशाला, भराडीचे इको क्लब, राष्ट्रीय सेवा योजना आणि छत्रपती संभाजीनगरच्या ओंजळ सेवाभावी सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने येथील वीरशैव लिंगायत स्मशानभूमीत (३० जुलै) रोजी वृक्षारोपण करण्यात आले. कार्यालयाचे अध्यक्षस्थान राजेंद्र कोठावदे यांनी भूषवले, तर प्रमुख अतिथी म्हणून पं.स. सदस्य नारायण खोमणे उपस्थित होते. तसेच ओंजळ संस्थेच्या अध्यक्षा सुनिता जांभुळकर, कुशीवर्ता साबळे, सचिन घोरपडे, गणेश…

Read More

नागरिकांचे हाल:पिंपळगाव रेणुकाईच्या रस्त्यावर पाण्याचे तळे, गुडघाभर पाण्यातून जीवघेणा प्रवास

भोकरदन तालुक्यातील जुईधरण फाटा ते वालसांवगी फाटा या महत्त्वाच्या रस्त्याचे काम रखडले आहे. नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. सलग दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पिंपळगाव रेणुकाई मुख्य फाट्याजवळ रस्ता खोदून ठेवलेल्या ठिकाणी गुडघाभर पाणी साचले आहे. मोठे डोह तयार झाले आहेत. वाहनचालक, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी यांच्यासाठी हा मार्ग धोकादायक बनला आहे. रोज…

Read More

जायकवाडीत 14,177 क्युसेकने आवक:पाणीसाठा 75 टक्क्यांवर, आमदार विलास भुमरे यांनी धरणाला भेट देऊन केली पाहणी

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर ओसरल्याने धरणात येणाऱ्या पाण्याचा वेग काहीसा मंदावला आहे. मात्र, गोदावरी खोऱ्यातील वरच्या धरणांतून अद्याप विसर्ग सुरू असल्याने पुढील काही दिवस धरणातील आवकमध्ये चढ-उतार कायम राहण्याचा अंदाज आहे. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत जायकवाडीत १४,०१३ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. यामुळे धरणातील उपयुक्त पाणीसाठा ७५ टक्क्यांवर पोहोचला असून, ५७.२६ टीएमसी (१६२१.६०३…

Read More

उभ्या ट्रकला दुचाकीची धडक; एक ठार:वडील-भाऊ गंभीर जखमी; पाऊस, धुक्यामुळे वाळूजच्या बकवालनगरमध्ये दुर्घटना

सिडको वाळूज महानगरातून बजाज कंपनीत कामासाठी निघालेल्या एकाच कुटुंबातील तिघांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोखंडी सळयांनी भरलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक बसल्याने, २२ वर्षांचा तरुण कामगाराचा जागीच मृत्यू झाला. तर, त्याचे वडील आणि लहान भाऊ गंभीर जखमी झाले आहेत. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी पहाटे ५.५५ वाजेच्या सुमारास बकवाल नगर परिसरात घडली….

Read More

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी:यंदा ऑगस्ट महिन्यांत शाळांना 12 दिवस सुट्या

शाळेचे नवे शैक्षणिक सत्र सुरू होऊन आता २ महिने उलटले आहेत. लवकरच विद्यार्थ्यांच्या पहिल्या घटक चाचणीची लगबग सुरू होईल. मात्र, अभ्यासाच्या या धावपळीत विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात विद्यार्थ्यांना केवळ ९ सुट्या मिळाल्या होत्या; यंदा मात्र सण आणि उत्सवांमुळे यात वाढ झाली असून, ऑगस्टमध्ये विद्यार्थ्यांना एकाच महिन्यात तब्बल १२ सुट्या मिळणार…

Read More

विकास निधीतील कामांना एनओसीची मुदत 3 महिनेच:खासदार, आमदारांच्या निधीच्या 200 कोटींच्या कामांसाठी एनओसी देऊनही कामे झाली नाहीत

आमदार आणि खासदार निधीतून विकासकामे करण्यासाठी गेल्या ३ वर्षांत महापालिकेकडून तब्बल २०० कोटी रुपयांच्या ‘ना-हरकत प्रमाणपत्रां’चे (एनओसी) वाटप करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधींच्या जवळच्या कंत्राटदारांनी वशिलेबाजीने ‘एनओसी’ तर पदरात पाडून घेतल्या, मात्र वर्षे उलटूनही प्रत्यक्षात कामेच सुरू केलेली नाहीत. या खोळंबलेल्या विकासकामांची गंभीर दखल घेत, ‘एनओसी’ दिल्यानंतर ३ महिन्यांत काम सुरू न झाल्यास ती परवानगी थेट…

Read More

पुणे पोलिसांकडून 'ऑपरेशन म्यूल हंट' मोहीम हाती:132 गुन्हे दाखल, 152 आरोपींना अटक, आर्थिक पुरवठा रोखणार

पुणे शहर पोलिसांनी सायबर गुन्हेगारांना मिळणारा आर्थिक पुरवठा रोखण्यासाठी ‘ऑपरेशन म्यूल हंट’ ही विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १३२ गुन्हे दाखल करण्यात आले असून, १५२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. सायबर गुन्हेगारांकडून वापरल्या जाणाऱ्या किंवा भाड्याने उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या बँक खात्यांवर कठोर कारवाई करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. पोलिस…

Read More