Headlines

समृद्धी महामार्गावर कार पुलावरून‎ कोसळली:दोघे जागीच ठार‎, खडकनारळा डोणगावजवळ घडलेली घटना‎

शिर्डीहून छत्रपती संभाजीनगरकडे ‎‎भरधाव जाणाऱ्या कारचालकाचे ‎‎नियंत्रण सुटल्याने कार समृद्धी‎महामार्ग चॅनल क्रमांक ५६-५७‎मधील समृद्धी महामार्गावरून थेट ‎‎पुलाखाली जाऊन पडली. यात मुंबई ‎‎येथील दोन जण ठार, तर पाच जण‎गंभीर जखमी झाले.‎ ही घटना शिल्लेगाव पोलिस‎ठाण्याच्या हद्दीतील खडकनारळा‎डोणगावजवळील समृद्धी मार्गाच्या‎पुलाखाली रविवारी सकाळी घडली.‎ या घटनेत हुमेरा मोहसीन शेख‎(३१, रा. कल्याण) व हरिम जुनेद‎अहमद (८, रा. ठाणे मुंबई)…

Read More

भागवत शास्त्र आपल्या मनातील मृत्यूची भीती नाहीशी करते:त्याचे वाचन गरजेचे, न्हावी येथील भागवत कथेत राहुल भोळे यांचे निरूपण‎

भागवत शास्त्र हे माणसाच्या मनातील मृत्यूची भीती नाहीशी करणारे श्रेष्ठ शास्त्र आहे, असे निरूपण सावरगावकर राहुल महाराज भोळे यांनी केले. येथील सद्गुरु नारायणनाथ मंदिरामध्ये अधिक मासाचे (पुरुषोत्तम मास) औचित्य साधून आयोजित श्रीमद् भागवत पुराण कथा वाचन व गीता पारायण सोहळ्यात ते बोलत होते. कथेचे वाचन करताना भोळे यांनी सांगितले की, अभिमन्यू पुत्र राजा परीक्षित याला…

Read More

मान्सूनने ईशान्य व्यापला, महाराष्ट्रात मात्र संथगतीने चाल:15 जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता कमी – मुख्यमंत्री

देशात नैऋत्य मान्सून वेगाने पुढे सरकत आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, ३-४ दिवसांत महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशाच्या आणखी काही भागांत मान्सून पुढे जाण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. असे असले तरीही हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर मान्सूनची वाटचाल संथगतीने होणार आहे. त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रात १५ जूनपूर्वी समाधानकारक पावसाची शक्यता अत्यंत कमी असल्याचा इशारा…

Read More

सुप्रिया सुळेंचे व्याही भाजप आ.लखानींकडे पत्नीसह तब्बल 75कोटींहून अधिकची संपत्ती:पत्नीच्या नावेही 30 कोटी 99 लाख 162 रुपयांची मालमत्ता

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अरुण हनुमंत लखानी हे बिनविरोध निवडून आले आहेत. उद्योग क्षेत्रात सक्रिय असलेले लखानी हे कोट्यधीश आहेत. त्यांच्याकडे तब्बल ४५ कोटी २८ लाख ३९ . विशेष म्हणजे त्यांच्या पत्नीच्या नावेही ३० कोटी ९९ लाख १६२ रुपयांची मालमत्ता असल्याने हे दांपत्य मिळून ७६ कोटी रुपयांहून…

Read More

राज्यसभेच्या खासदारपदासाठी छगन भुजबळांच्या अटी-शर्ती:पुतण्या समीरला येवल्यातून विधानसभेची उमेदवारी आणि कॅबिनेट मंत्रिपदही हवे

राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे एकाला राज्यसभेवर जाण्याची संधी आहे. या जागेवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दावा केला आहे. मात्र, खासदारकीसोबत दोन अटी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांपुढे घातल्या आहेत. त्यातील एक अट म्हणजे त्यांच्या रिक्त होणाऱ्या विधानसभेतील येवला मतदारसंघाची जेव्हा पोटनिवडणूक होईल तेव्हा त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यालाच पक्षातर्फे उमेदवारी…

Read More

नियम मोडल्यास कारवाई:राज्यात एसटी बसस्थानकांच्या 200 मीटर परिसरात अवैध प्रवासी वाहनांना नो एन्ट्री, 5 ते 15 जूनदरम्यान राज्यव्यापी मोहीम

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उत्पन्नाला भगदाड पाडणाऱ्या आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात राज्य सरकारने आता कंबर कसली आहे. राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात होणाऱ्या अवैध खासगी वाहतुकीला पूर्णपणे आळा घालण्यासाठी ५ जून ते १५ जून २०२६ या कालावधीत संपूर्ण राज्यात ‘विशेष अंमलबजावणी मोहीम’ राबवण्याचे आदेश परिवहनमंत्री तथा एसटी…

Read More

अंनिसची संघर्ष फेरी:"प्रत्येक जण प्रयत्न करू.. भोंदू मुक्त गाव साकारू', बुवाबाजी व भोंदूगिरीविरोधात दिली घोषणांची साद‎

येथील बडी साजन मंगल कार्यालयात ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ व ‘विवेक जागर संस्था’ यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय विस्तारित कार्यकारणीच्या बैठकीचा दुसरा दिवस विविध उपक्रमांनी गाजला. शनिवारी सायंकाळी पाच वाजता बडी साजन मंगल कार्यालय ते कोठी रोड मार्गे बाजार समिती आणि तेथून जुने बसस्थानक मार्गे पुन्हा बडी साजन मंगल कार्यालयापर्यंत एक भव्य व ऐतिहासिक ‘विरोधी संघर्ष…

Read More

छत्रपतींपासून प्रेरणा घेऊन अभियान राबवावे:जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे प्रतिपादन, पोवाड्यांनी जिंकली मने‎

अतिशय धाडसी सेनानी असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. आजच्या इतके आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध नसतानाही त्यांनी एक आदर्श आणि लोककल्याणकारी राज्यकारभार चालवून दाखवला. सर्वसामान्यांवर कदापि अन्याय होऊ नये, हीच त्यांची भूमिका असायची. कोणत्याही नागरिकाला प्रशासनाचा जाच होणार नाही, ही बाब अत्यंत महत्त्वाची आहे. याच संकल्पनेनुसार सध्या ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान…

Read More

पालकमंत्र्यांनी विरोधकांना गोंजारले,‎मतांसाठी आघाडीतील नेत्यांच्या घरी‎:राष्ट्रवादीचे आमदार नारायण पाटील यांच्याशी जेऊर येथे गुप्तगू‎

जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुका एकमेव असा आहे, की नवे जुने भाजपचे नेते कार्यकर्ते एक दिलाने काम करत आहेत. भाजप पक्षासाठी मोहोळ विधानसभा मतदारसंघांमध्ये विश्वासू ,निष्ठावंत नेत्याची गरज होती. ती आता माजी आमदार राजन पाटील यांच्या माध्यमातून मिळाली. त्यांनी काहीच मागितले नाही. परंतु येणाऱ्या पुढील काळामध्ये ते आमच्या मांडीला मांडी लावून बसलेले तुम्हा सर्वांना दिसतील. त्याचबरोबर विधान…

Read More

कवठा कडू आमसभेत गोंधळ; आरोपांनी तापले वातावरण:ग्रामस्थांचा सत्ताधाऱ्यांवर भडीमार, उत्तरांअभावी संताप अनावर

तालुक्यातील कवठा कडू ग्रामपंचायतीच्या ५ जून रोजी आयोजित आमसभेत विविध विकासकामांतील कथित गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून मोठा गोंधळ उडाला. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासन व सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप करत जाब विचारला. मात्र, अनेक प्रश्नांना स . ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गावात प्रत्यक्षात एकच सार्वजनिक शौचालय असताना ग्रामपंचायतीच्या नोंदीत तीन सार्वजनिक शौचालये दाखवल्याचा आरोप केला. घनकचरा व्यवस्थापनासाठी मशीन खरेदीसाठी खर्च…

Read More