Headlines

पर्यावरण संवर्धन रॅली; 150 कापडी पिशव्या:15 रोपांचे वाटप, मान्यवरांच्या हस्ते नियमित कापडी पिशवी वापरणाऱ्या नागरिकांचा “वसुधा विकास पुरस्काराने’विशेष गाैरव‎

. “राखण्या निसर्गाचा समतोल माप, झाडे लावा माय बाप’, अशी घोषणा देत “माय वसुधा विकास” संस्थेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिवसानिमित्त पर्यावरण संवर्धनासाठी जनजागृती रॅली काढण्यात आली. नियमित कापडी पिशवी वापरणाऱ्या नागरिकांना यानिमित्ताने “वसुधा विकास पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले. रॅलीत १५० कापडी पिशव्या आणि १५ रोपांचे वाटप करण्यात आले. पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या माय वसुधा विकास…

Read More

देवस्थान जमीनीसाठी 15 सप्टेंबरपर्यंत नव्या हरकतींची मुदत:नागपुरात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा

महाराष्ट्रातील देवस्थानांच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांच्या मालकीच्या जमिनींवरील अतिक्रमणे दूर करण्यासाठी प्रस्तावित असलेल्या “महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम, 2026’ च्या मूळ मसुद्याला राज्य सरकारने तूर्तास स्थगिती दिली आहे. आता या कायद्याचे “सुधारित प्रारूप’ तयार करण्यासाठी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आल्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर…

Read More

वैभव नाईक राजकारणात सक्रिय झाले की नोटीस का येते?:विधानसभा अध्यक्ष राजकीय पक्षाचा चमचा असतो!, संजय राऊत यांचा हल्लाबोल

वैभव नाईक यांची चौकशी गेली अनेक वर्षे सुरू आहे. नेमके ही चौकशी का सुरू आहे? त्या चौकशीला काही दिशा नाही. वैभव नाईक राजकारणात सक्रिय झाले की त्यांना नोटीस दिली जाते. आम्हालाही तशा नोटीस येत असतात, याकडे देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले पाहिजे की केवळ विरोधकांनाच का नोटीस दिली जाते, असे उबाठाचे नेते संजय राऊत यांनी…

Read More

दिव्य मराठी स्टिंग:ना वय, ना ओळखपत्र; अवैध लाॅजिंगवर अनैतिकतेचा बाजार, त्र्यंबकेश्वर रस्ता बनला ‘अनलीगल कपल हब’

नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्ता अवैधलॉजिंगसाठी ओळखला जात आहे. 15 ते 17 किमी अंतराच्या या मार्गावर तब्बल 52लॉज असून, यातील बहुतांशलॉजवर ना ओळखपत्र, ना वयाची विचारणा केली जात आहे. केवळ पैसे घेऊन अनैतिकतेला मुभा दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार ‘दिव्य मराठी’च्या स्टिंग ऑपरेशनमध्ये कैद झाला आहे. कुठेही ना पोलिसांचे भय, ना कायद्याचा धाक दिसून येतो. ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने…

Read More

शहरात लोकसहभागाने हवेची गुणवत्ता समाधानकारक:सिंगल युज प्लास्टिक विरोधात महापालिका कठोर‎

प्रतिनिधी | अमरावती दिवसेंदिवस वाढणारे शहरीकरण, काँक्रिटचे जंगल आणि विकासकामांची घोडदौड सुरू असतानाच, महापालिकेच्या प्रभावी उपाययोजनांमुळे शहराने पर्यावरण संवर्धनात राष्ट्रीय पातळीवर आपला दबदबा निर्माण केला आहे. राष्ट्रीय पातळीवरील ‘स्वच्छ वायू सर्वेक्षण २०२५’ मध्ये अमरावती शहराने देशात प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पटकावून मानाचा तुरा खोवला आहे. यापूर्वी २०२२, २०२३ आणि २०२४ मध्ये शहराने अनुक्रमे तृतीय, प्रथम आणि…

Read More

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आचरणात आणण्याची गरज:मनपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन, महापौर ज्योती गाडे यांचे प्रतिपादन‎

“छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन लोककल्याणकारी आणि न्यायप्रिय असे रयतेचे राज्य निर्माण केले. समाजातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविणे, महिलांचा सन्मान राखणे, शेतकरी व कष्टकरी वर्गाला न्याय देणे तसेच सुशासन निर्माण करण . हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त अहिल्यानगर मनपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून…

Read More

साई टेकडी परिसरातील तलावात 3 जण बुडाले:एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात तिघेही बुडाले

सातारा परिसरातील साई टेकडीजवळील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या ६ मित्रांपैकी तिघांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. एका मित्राला पाण्यात बुडताना पाहून त्याला वाचवण्यासाठी गेलेले इतर दोघेही पाण्यात ओढले गेले. अग्निशमन दल आणि स्थानिक कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे दोघांना जिवंत बाहेर काढण्यात यश आले. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण सातारा परिसरावर तीव्र शोककळा पसरली आहे. मृत झालेली तिन्ही…

Read More

'कॉकरोच जनता पार्टी'चे दिल्लीत जोरदार आंदोलन:CM फडणवीसांची 'अराजकता' म्हणत टीका, तर ठाकरेंचा सरकारला इशारा

सोशल मीडियाच्या माध्यमातून कोट्यवधी तरुणांना आकर्षित करणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ने (CJP) आज देशाची राजधानी दिल्लीतील जंतरमंतरवर थेट रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन केले. या आंदोलनामुळे देशातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, यावर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनाला ‘अराजकता पसरवण्याची मानसिकता’ म्हटले आहे, तर दुसरीकडे शिवसेना प्रमुख…

Read More

हिंगोलीत ठाकरे गटाचे 9 जूनला आक्रोश आंदोलन:संपूर्ण शेतकरी कर्जमाफी, शक्तीपीठ रद्द करावा यांसह इतर मागण्यांचा समावेश

राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी यासह इतर मागण्यांसाठी हिंगोली येथे ठाकरे गटाच्या वतीने मंगळवारी तारीख 9 सकाळी साडेदहा वाजता आक्रोश आंदोलन केले जाणार आहे. हिंगोली येथील महात्मा गांधी चौकात मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता हे आंदोलन केले जाणार आहे. यावेळी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती कोणत्याही अटी व शर्तींशिवाय करण्यात यावी तसेच संपूर्ण कर्ज माफ करावे, शेतकऱ्यांना खत व…

Read More

जिल्हा बँकेच्या आखाड्यात सर्वपक्षीय दिग्गज:उमेदवारी मागे घेण्यासाठी महायुतीत रंगणार ओढाताण‎

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांनी अर्ज दाखल केले आहेत. यात भाजप आणि शिंदेसेनेकडून सर्वाधिक अर्ज दाखल आहेत. त्यामुळे अर्ज छाननीनंतर उमेदवारी मागे घेण्यासाठी सत्ताधारी पक्षांतच ओढाताण होण्याची चिन्हे आहेत. मागील दोन दिवसांत या निवडणुकीसाठी भाजपकडून मंत्री अतुल सावे, आमदार संजना जाधव, शहराध्यक्ष किशोर शितोळे, शिंदेसेनेकडून आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र अब्दुल…

Read More