Headlines

…तर हे विद्यार्थी सरकार सुद्धा बदलतील:अभिजीत दिपकेंचा इशारा; जंतर-मंतरच्या आंदोलनानंतर दिपके छत्रपती संभाजीनगरात दाखल

राजधानी दिल्लीत कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी देशातील युवकांनासोबत घेऊन विशेषतः जेन-झी पिढीला सोबत घेत मोठे आंदोलन उभारले होते. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे ज्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, त्याच्या निषेधार्थ त्यांनी हे आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि यश आले. त्यानंतर तब्बल 40 दिवसांनंतर अभिजीत…

Read More

मराठा समाजासाठी जे कुणीच केलं नाही ते महायुतीने केलं:तरीही काही शंका असतील तर मार्ग काढू; जरांगेंच्या इशाऱ्यावर फडणवीसांची ग्वाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील विविध महत्त्वाच्या घडामोडींवर सविस्तर भाष्य केले. नागपूरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूरस्थिती, मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेले आंदोलन आणि विद्यार्थ्यांचे आंदोलन या सर्वच मुद्द्यांवर त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. विशेष म्हणजे, राज्यातील आंदोलक विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याचे मोठे आदेश त्यांनी गृह विभागाला दिले आहेत. तसेच, काँग्रेस नेते…

Read More

Maharashtra ST Bus NCMC Smart Card Deadline Extended

एसटी प्रवासात शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना अद्याप NCMC स्मार्ट कार्ड प्राप्त झाले नसल्याने त्यांची गैरसोय होऊ न . राज्य शासनाच्या वतीने अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, ज्येष्ठ नागरिकांना तसेच महिलांना प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत देण्यात…

Read More

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात राजकीय घुसखोरीचा आरोप:उदय सामंतांचा काँग्रेसवर घणाघात; म्हणाले- मनोज जरांगे पाटलांच्या शंकांचे निरसन करू

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आज गुरुपौर्णिमेनिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरुळ येथे दर्शनासाठी आले होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील अनेक घडामोडींवर सविस्तर भाष्य केले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून त्यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसने आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या खांद्यांचा वापर करू नये, असे सामंत म्हणाले. यासोबतच, मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलनाचा इशारा, कंगना रनौत यांचे…

Read More

6 महिन्यांतच गाड्यांचा कंटाळा?:मुंबई महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना आता हवी 'इनोव्हा', पालिकेची लूटमार योग्य नाही- पेडणेकर

मुंबई महापालिकेत अवघ्या सहा महिन्यांतच पदाधिकाऱ्यांसाठी पुन्हा नवीन आणि अधिक महागड्या गाड्या खरेदी करण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. जानेवारी महिन्यात पालिकेने पदाधिकाऱ्यांच्या सेवेसाठी ‘स्कॉर्पिओ’ गाड्या खरेदी केल्या होत्या. मात्र त्या सोयीच्या नसल्याचे कारण देत आता सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, उपमहापौर आणि तीन वैधानिक समित्यांच्या अध्यक्षांसाठी ‘इनोव्हा क्रिस्टा’ गाड्या घेण्याची मागणी केली जात आहे. प्रशासनाकडून तयार…

Read More

पुणे पोलिसांची भाडेकरू पडताळणी मोहीम सुरू:माहिती न दिल्यास घरमालकांवर होणार कायदेशीर कारवाई

शहरातील वाढती लोकसंख्या, परराज्य व इतर जिल्ह्यांतून रोजगार, शिक्षण आणि व्यवसायासाठी होणारे स्थलांतर लक्षात घेऊन पुणे पोलिसांनी भाडेकरू व घरमालकांच्या पडताळणीसाठी विशेष मोहीम सुरू केली आहे. घरमालकांनी भाडेकरूंची माहिती संबंधित पोलिस ठाण्यात ऑनलाइन अथवा प्रत्यक्ष सादर करणे बंधनकारक असून, नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर परराज्य व…

Read More

'NEET' फेरपरीक्षेचाही पेपर फुटला?:आमदार रोहित पवारांचा खळबळजनक आरोप, गुजरातमधून 3 दिवस आधीच पेपर फुटल्याचा दावा

देशात सध्या पेपरफुटीचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, यातच आता आमदार रोहित पवार यांनी ‘नीट’ परीक्षेबाबत एक अत्यंत खळबळजनक आरोप केला आहे. ‘नीट’चा पेपर फुटल्यानंतर जी फेरपरीक्षा घेण्यात आली होती, तिचा पेपरही परीक्षेच्या तीन दिवस आधीच गुजरातमध्ये फुटल्याचा दावा पवार यांनी एका ट्विटद्वारे केला आहे. जर ही गोष्ट खरोखरच सत्य असेल, तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने…

Read More

एक कोटींच्या दरोडा प्रकरणात दोन पोलिस निलंबित:खाकी वर्दीची प्रतिमा मलिन केल्याने कठोर कारवाई, नेमके प्रकरण काय?

पुणे ग्रामीण पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांचा सुमारे एक कोटी रुपयांच्या दरोड्याच्या कटात थेट सहभाग उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. नऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नवले परिसरात 18 जुलै रोजी हर्षवर्धन पवार या व्यापाऱ्यावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न झाला होता. या गंभीर प्रकरणात पोलिस हवालदार प्रमिला निकम आणि पोलिस नाईक अजित मेस्त्री या दोघांचा कटामध्ये सहभाग असल्याचे…

Read More

Ambadas Danve Questions CM Fadnavis Over Kannad Farmer Loan Waiver Controversy

छत्रपती संभाजीनगरमधील कन्नडमध्ये शेतकऱ्यांवर 2 लाख 6 हजारांचे कर्ज आहे ते कर्जमुक्तीच्या यादीत सव्वा लाख रुपयेच दाखवल्याचा दावा अंबादास दानवे यांनी केला आहे. उरलेले कर्ज बँक भरणार का? अनेक शेतकऱ्यांसोबत हेच होत आहे, असा आरोप दानवे यांनी केला आहे. तर . अंबादास दानवे यांनी कन्नड तालुक्यातील चिकलठाण येथील शेतकरी लक्ष्मीकांत खरे यांचे उदाहरण देत सरकारने…

Read More

राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चा अर्थहीन- शरद पवार:बारामतीत वक्तव्य, राजकीय चर्चांना अखेर पूर्णविराम

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेला राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी बारामतीत स्पष्ट शब्दांत पूर्णविराम दिला. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चेचा आता कोणताही संबंध उरलेला नाही, असे सांगत त्यांनी या शक्यता थेट उडवून लावल्या. जानेवारी महिन्यात विमान अपघातात निधन झालेले तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन्ही…

Read More