Headlines

एआयने शेतीला नवी दिशा, उत्पादन वाढ शक्य:कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे पुणे कृषी महाविद्यालयाच्या वर्धापनदिनी आवाहन

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करून कृषी क्षेत्राचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते, असा विश्वास व्यक्त केला. पुणे कृषी महाविद्यालयाच्या ३८ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी कृषी विद्यार्थ्यांना प्रयोगशीलता आणि नवतंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. हा वर्धापनदिन कार्यक्रम सोमवार, १३ रोजी महाविद्यालयातील शिरनामे सभागृहात उत्साहात पार पडला….

Read More

ज्ञानाधारीत अर्थव्यवस्था विकसित करावी लागेल:डॉ. अभय जेरे यांचे ‘स्टुडंट्स कन्व्हेन्शन’मध्ये प्रतिपादन

विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी जीडीपी वाढवणे आवश्यक आहे, आणि त्यासाठी ज्ञानाधारित अर्थव्यवस्था विकसित करावी लागेल, असे मत भारताच्या नवनिर्मिती परिसंस्थेचे शिल्पकार व एआयसीटीईचे माजी उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे यांनी व्यक्त केले. एस.ए.ई. इंडियाच्या पश्चिम विभागातर्फे आयोजित ‘स्टुडंट्स कन्व्हेन्शन २०२५-२६’ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. हा कार्यक्रम एआयएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयात पार पडला. यावेळी व्यासपीठावर एस.ए.ई….

Read More

कृषी:कांदा दरात झालेल्या घसरणीने बळीराजाच्या अडचणीमध्ये वाढ; प्रतिक्विंटल १२०० पर्यंत घसरण, शेतकरी भाववाढीच्या प्रतिक्षेत

प्रतिनिधी | अहिल्यानगर महिनाभराच्या कालावधीत जिल्हाभरातील कांद्याच्या दरामध्ये मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला कांद्याला मिळणारा भाव एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत लक्षणीयरीत्या खाली आला असून, यामुळे उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक गणितावर परिणाम झाला आहे. मागील महिनाभरातील स्थिती पाहता सुमारे प्रतिक्विंटल सुमारे ३०० रुपयांची घसरण झाली आहे. सद्यस्थितीत एक नंबर कांदा अवघा ९०० ते १२००…

Read More

सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हावे असे वाटत असेल तर शुभेच्छा:पण असे राजकीय वातावरण तापत नाही, गिरीश महाजनांचा राऊतांना टोला

अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले असून, महायुतीच्या उमेदवार आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी रविवारी (१२ एप्रिल) प्रचाराचा नारळ फोडला. यावेळेस आयोजित सभेत राजकीय भाषणांपेक्षा भावनांचा कल्लोळ अधिक पाहायला मिळाला. मंत्री अदिती तटकरे यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत, त्यांचे मुख्यमंत्रिपदाचे अपूर्ण राहिलेले स्वप्न सुनेत्रा वहिनींच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा…

Read More

डेटिंग ॲपद्वारे फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश:हॉटेलमध्ये नेऊन युवकांना घातला जात होता लाखोंचा गंडा, नागपुरातील घटना

नागपूरमध्ये डेटिंग ॲपच्या माध्यमातून युवकांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश झाला आहे. सदर परिसरातील माऊंट रोडवरील एका हॉटेलमध्ये हा प्रकार वारंवार घडत असून, यात संबंधित हॉटेलचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका विशिष्ट डेटिंग ॲपवरून युवकांशी ओळख केली जाते. त्यानंतर संबंधित मुलगी त्यांना सदरमधील ‘सुआ क्लब अँड रेस्ट्रो’ येथे भेटण्यासाठी बोलावते….

Read More

आशाताईंनी स्वर समाधी घेतली:चंद्र-सूर्य आहेत तोवर आशाताईंची गाणी अजरामर राहतील, एकनाथ शिंदेंनी वाहिली श्रद्धांजली

ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांनी संगीत क्षेत्रात हिमालया एवढं उत्तुंग काम करुन ठेवलंय, जे कुठल्याही फूटपट्टीने मोजता येणार नाही. आशाताई महाराष्ट्राच्या शान होत्या आणि मराठी अस्मितेच्या मानबिंदू होत्या. आशाताईंचे निधन नाही तर त्यांनी स्वर समाधी घेतली, अशा शब्दांत शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली. उपमुख्यमंत्री…

Read More

भोंदू खरातला 1825 बड्या आसामींचे कॉल:नावे ऐकूण हादरा बसेल, अंजली दमानिया यांचा दावा; बुधवारी करणार मोठा खुलासा

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणात दोन दिवसांत मोठा खुलासा करण्याची ग्वाही दिली आहे. भोंदू अशोक खरातला 1825 मोठ्या आसामींचे कॉल आले होते. यात राकारणी, आयजी व तहसीलदारांसह अनेकांची नावे आहेत. त्यांची नावे ऐकूण सर्वांनाच हादरा बसेल. मी या प्रकरणी दोन दिवसांत मोठा खुलासा करेल, असे त्या म्हणाल्यात. भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे…

Read More

भोंदू अशोक खरातकडे जाणाऱ्या महिलांना पोलिसांत का जावे वाटले नाही?:व्यवस्थेत काम करणारे आम्ही सर्वजण अपयशी ठरलो – सुप्रिया

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणात व्यवस्था म्हणून आम्ही सर्वजण अपयशी ठरल्याची खंत व्यक्त केली आहे. भोंदू अशोक खरातकडे जाणाऱ्या महिलांना पोलिसांकडे का जाऊ वाटले नाही? यावरून एक व्यवस्था म्हणून व व्यवस्थेत काम करणारे लोक म्हणून आम्ही सर्वजण अपयशी ठरल्याचे सिद्ध होते. या प्रकरणी सत्ताधारी व विरोधक या…

Read More

रिक्षाचालकांसाठी मराठी सक्तीच्या निर्णयावरून बिष्णोई गँगची उघड धमकी:RTO अधिकाऱ्याला धमकीने खळबळ

मुंबईत रिक्षाचालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या प्रस्तावामुळे निर्माण झालेला वाद आता अधिकच गंभीर वळणावर पोहोचला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा चालवण्यासाठी मराठी भाषा येणे आवश्यक असल्याचे जाहीर केल्यानंतर मराठी विरुद्ध अमराठी असा वाद पुन्हा एकदा पेटला आहे. या पार्श्वभूमीवर आता गुन्हेगारी जगतातील बिष्णोई गँगने थेट हस्तक्षेप करत मिरा-भाईंदरमधील RTO अधिकाऱ्याला धमकी दिल्याची माहिती…

Read More

राज्य मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय जाहीर:विकसित महाराष्ट्र 2047 कडे मोठी झेप;भरतीपासून आरोग्य, शिक्षण ते विकासाला मोठी चालना

राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत सोमवारी अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांना मंजुरी देण्यात आली. विकसित महाराष्ट्र 2047 या व्हिजनला अनुसरून विविध क्षेत्रांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेषतः शासन सेवेतील भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यावर भर देण्यात आला असून, यामुळे भविष्यातील प्रशासन अधिक कार्यक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शासन सेवेतील पदभरती प्रक्रियेत मोठे…

Read More