Headlines

यात्रेच्या तोंडावर बुवासिद्ध देवस्थानावर वाद:फलकावरून राहुरीमध्ये संताप, वक्फ न्यायाधिकरणाच्या आदेशाचा उल्लेख असलेल्या फलकाला विरोध‎

राहुरी शहराचे ग्रामदैवत श्री बुवासिद्ध देव यांच्या यात्रा उत्सवाला बुधवारपासून (२९ जुलै) प्रारंभ होत असताना मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या एका फलकामुळे शहरात वादाचे वातावरण निर्माण झाले आहे. फलकावर वक्फ न्यायाधिकरणाच्या आदेशाचा उल्लेख करत मंदिर परिसरात ध्वज लावणे, आरती करणे, घोषणाबाजी करणे, धार्मिक विधी करण्यास मनाई असल्याचा मजकूर नमूद केला आहे. या फलकाला ग्रामस्थांनी विरोध दर्शवत…

Read More

स्वामींचे दर्शन:अक्कलकोटनगरीत गुरुपौर्णिमा उत्सवासाठी आज दीड लाखावर भाविक, पहाटे दोनपासून भक्तांसाठी मंदिर खुले

गुरुपौर्णिमेच्या उत्सवासाठी अक्कलकोट नगरी भक्तिरसात न्हाऊन निघण्यासाठी सज्ज झाली आहे. येथील प्रसिद्ध श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिर, समाधी मठ आणि श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा वर्धापन दिन व गुरुपौर्णिमा उत्सवासाठी दीड लाखांवर भाविकांची मांदियाळी जमणार आहे. गुरूपौर्णिमेच्या पूर्वसंध्येलाच शहरांमधील सर्व भक्तनिवास व यात्रीनिवास फुल्ल झाले असून, प्रशासनाने आणि देवस्थान समितीने गर्दीचे नियोजन करण्यासाठी चोख व्यवस्था…

Read More

केअर टेकरने वृद्धेचा केला गळा आवळून खून:पानमंगरूळ येथील घटना, दोन दिवसांनंतर‎उघडकीस आला प्रकार, 2 तोळे सोने केले लंपास‎

आई-वडिलांच्या देखभालीसाठी ठेवलेल्या तरुणानेच वयोवृद्ध आजीची तिच्या साडीच्या पदराने गळा आवळून हत्या केली. ही घटना पानमंगरूळ येथे घडली. याबाबतची हकीकत अशी, जमिनीत शांताबाई तद्देवाडी (वय ८१) आणि तिचे पती भीमशा (वय ९३)हे दोघे पती-पत्नी शेतात वस्तीवर राहत होते. त्यांचा मुलगा संगप्पा हा पुणे येथे माळी काम करतो. वडिलांचा पाय मोडल्यामुळे आणि वयामुळे त्यांना पुणे येथे…

Read More

महावितरणच्या अप्रेंटिस भरती प्रक्रियेस विलंब; उमेदवार त्रस्त:भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी‎

महावितरणच्या अचलपूर, अमरावती शहर व अमरावती ग्रामीण विभागांतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अप्रेंटिस भरती प्रक्रियेची अर्ज प्रक्रिया पूर्ण होऊनही अद्याप पुढील कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी आहे. रखडलेली भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी उमेदवारांनी संयुक्त निवेदनाद्वारे महावितरणच्या मुख्य अभियंत्यांकडे केली आहे. जिल्ह्यातील आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी महावितरणच्या अप्रेंटिस भरती प्रक्रियेसाठी अर्ज…

Read More

नारळाच्या दरात गतवर्षीपेक्षा 15 रुपये वाढ:गुरुपौर्णिमेनिमित्त आवक वाढली, दिवाळीपर्यंत नारळाची होणार विक्री, 40 रु.दर‎

आषाढ पौर्णिमा अर्थात गुरूपौर्णिमेनिमित्त गुरूला श्रीफळ अर्थात नारळ अर्पण करण्याची परंपरा आहे. हे आरोग्यदायी फळ आहे. त्याचे सेवन शरीरासाठी आवश्यक असून, शरीरातील खनिजं, सोडियम, पोटॅशियमसह इलेक्ट्रोलाईट्सची हे फळ उणीव भरून काढते. त्यामुळे ते बहुउपयोगी फळ असून, याच कारणास्तव मंदिरातील देवापासून ते ज्यांनी गुरू म्हणून उत्तम संस्कार, ज्ञान दिले त्यांनाही आदरभाव व्यक्त करण्यासाठी नारळ अर्पण केले…

Read More

हेल्मेट न घातल्यास एक हजारांचा दंड, शनिवारपासून अंमलबजावणी:शासकीय कर्मचाऱ्यांवर कारवाईनंतर सर्वसामान्यांवर नजर‎

संपूर्ण जिल्ह्यात १ ऑगस्टपासून दुचाकीस्वारांसाठी हेल्मेटची सक्ती अत्यंत कडकपणे लागू केली जाणार आहे. रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी (झिरो फॅटिलिटी) पोलिस प्रशासनाने हा कठोर निर्णय घेतला आहे. त्यानुसार १ ऑगस्टपासून कोणतीही पूर्व-जनजागृती न करता थेट दंडात्मक कारवाईला सुरुवात करण्यात येणार आहे. मोटार वाहन कायद्यानुसार दुचाकीवर बसल्याबरोबर हेल्मेट घालणे सक्तीचे आहे. त्यामुळे १ ऑगस्टपासून नियम…

Read More

शाळांचा 100 मीटर परिसर होणार तंबाखूमुक्त:‘नशामुक्त- तंबाखूमुक्त शाळा-महाविद्यालय परिसर'' अभियान सुरू; अंमलबजावणी कडक‎

जिल्ह्यात “मिशन उडान’ अंतर्गत ‘नशामुक्त-तंबाखूमुक्त शाळा व महाविद्यालय परिसर अभियान’ राबवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य, त्यांचे सुरक्षित भविष्य आणि एक व्यसनमुक्त समाज निर्माण करण्याच्या उद्देशाने शैक्षणिक संस्थांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री व सेवनावर कायद्याने कडक बंदी घालण्यात आली आहे. कोटपा (सीओटीपीए) अधिनियम, २००३ नुसार शाळा, महाविद्यालय अथवा शैक्षणिक संस्थेच्या १०० मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री…

Read More

दर्जेदार ऊसाचा वाण दिल्यास गा‌ळपात शेतकऱ्यांना लाभ:चेअरमन शिवाजीराव सावंत यांनी दिली माहिती‎

राजवी ॲग्रो पॉवर प्रा.लि. आलेगाव बु. (ता. माढा) येथे गळीत हंगाम २०२६-२७ च्या शुभारंभानिमित्त रोलर पूजन सोहळा संपन्न झाला. कारखान्याचे व्हाईस चेअरमन तथा जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज सावंत यांच्या शुभहस्ते रोलरचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव सावंत होते. यावेळी बोलताना अध्यक्ष शिवाजीराव सावंत म्हणाले, “शेतकऱ्यांनी दर्जेदार ऊस दिल्यास कारखान्याला चांगले गाळप…

Read More

गुरूपाैर्णिमा उत्सव:शिर्डीत तीन लाखांवर येणार भाविक, आज 24 तास सुरू राहणार साई मंदिर‎

शिर्डीत ११७ व्या गुरुपौर्णिमा उत्सवासाठी शिर्डी सज्ज झाली आहे. मंगळवारपासून भाविक दाखल होण्यास सुरूवात झाली. ३० जुलैपर्यंत तीन लाखांहून अधिक भाविक उत्सवाला उपस्थित राहतील, असा अंदाज श्री साईबाबा संस्थानने व्यक्त केला. गतवर्षीपेक्षा ही संख्या ५० हजारांवर अधिक असणार आहे. यंदा चार लाख भाविकांच्या दर्शनाचे नियोजन केले आहे. मुख्य दिवशी म्हणजे २९ जुलै रोजी साई मंदिर…

Read More

युवकांनी केवळ नोकरीच्या मागे न धावता उद्योग-व्यवसायाकडे वळावे:‘चावडी बिझनेस ट्रेनिंग सेंटर'' शुभारंभाप्रसंगी तहसीलदार चावडे यांचे प्रतिपादन‎

रोजगारनिर्मितीसाठी स्थानिक पातळीवर अधिक प्रभावी प्रयत्न होणे आवश्यक असून, युवकांनी केवळ नोकरीच्या मागे न धावता उद्योग-व्यवसायाकडे वळावे. त्यासाठी चावडीसारख्या संस्था देत असलेले मार्गदर्शन व प्रशिक्षण अत्यंत प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन तहसीलदार कैलास चावडे यांनी केले. ग्रामीण व शहरी भागातील युवक-युवती, शेतकरी, महिला बचत गट आणि नवउद्योजकांना शेतीपूरक व्यवसाय, लघुउद्योग व उद्योग उभारणीचे प्रशिक्षण देणाऱ्या चावडी बिझनेस…

Read More