एआयने शेतीला नवी दिशा, उत्पादन वाढ शक्य:कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचे पुणे कृषी महाविद्यालयाच्या वर्धापनदिनी आवाहन
कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करून कृषी क्षेत्राचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते, असा विश्वास व्यक्त केला. पुणे कृषी महाविद्यालयाच्या ३८ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी कृषी विद्यार्थ्यांना प्रयोगशीलता आणि नवतंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. हा वर्धापनदिन कार्यक्रम सोमवार, १३ रोजी महाविद्यालयातील शिरनामे सभागृहात उत्साहात पार पडला….