नवीन पाणी योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पोहोचले:महिनाभरात शहरातील काही भागांना वाढीव पाणीपुरवठा सुरू होणार
नवीन पाणीपुरवठा योजनेच्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पोहोचले आहे. यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरातील काही भागांना येत्या महिनाभरात वाढीव पाणीपुरवठा सुरू होण्याची शक्यता आहे. योजनेच्या चाचणीतील तांत्रिक अडथळे दूर झाल्यानंतर ही महत्त्वपूर्ण प्रगती झाली आहे. योजनेच्या जलवाहिनीची चाचणी प्रक्रिया सोमवारपासून पुन्हा सुरू झाली. सकाळी ११ वाजता जायकवाडी येथील पंप सुरू करण्यात आले. ढोरकीन येथील बिघाडामुळे रिकामी झालेली…