Headlines

जिल्हा बँकेच्या आखाड्यात सर्वपक्षीय दिग्गज:उमेदवारी मागे घेण्यासाठी महायुतीत रंगणार ओढाताण‎

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय दिग्गज नेत्यांनी अर्ज दाखल केले आहेत. यात भाजप आणि शिंदेसेनेकडून सर्वाधिक अर्ज दाखल आहेत. त्यामुळे अर्ज छाननीनंतर उमेदवारी मागे घेण्यासाठी सत्ताधारी पक्षांतच ओढाताण होण्याची चिन्हे आहेत. मागील दोन दिवसांत या निवडणुकीसाठी भाजपकडून मंत्री अतुल सावे, आमदार संजना जाधव, शहराध्यक्ष किशोर शितोळे, शिंदेसेनेकडून आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र अब्दुल…

Read More

श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्तींचे संवर्धन करावे लागणार:झीज होत असल्याचा पुरातत्त्व सर्वेक्षणाचा अहवाल, पुढील आठवड्यात पाहणी करून अंतिम निर्णय

श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या मूळ मूर्तींचे स्वरूप बदलू नये, तसेच संवर्धनाची प्रक्रिया दीर्घकाळ टिकावी, यासाठी पुरातत्त्व तज्ज्ञांकडून मूर्तींची पाहणी करण्यात येणार आहे. त्यानंतर भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागामार्फत हे संवर्धन कार्य केले जाईल . श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेच्या मूर्तींच्या संवर्धनासंदर्भात मंदिर समिती, सल्लागार परिषद, स्थानिक महाराज मंडळी आणि पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक…

Read More

बॅलेट पेपर नाही, तर निवडणुकीवर बहिष्कार टाकावा:राज ठाकरेंची सूचना, उबाठासह सुप्रिया सुळेंचाही पाठिंबा; 8 जूनला दिल्लीत खलबते

राज्यात विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण कमालीचे तापले असतानाच, आता ‘ईव्हीएम’ विरुद्ध ‘बॅलेट पेपर’ हा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. जोपर्यंत निवडणुका बॅलेट पेपरवर होत नाहीत, तोपर्यंत थेट निवडणुकीवरच बहिष्कार टाकण्याचा विचार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडला असून, या भूमिकेला आता महाविकास आघाडीतूनही मोठे बळ मिळताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

Read More

राज्यात एआय, 5-जीमध्ये 4,080 कोटींची गुंतवणूक:पुणे, रायगडमध्ये प्रकल्प, 4750 रोजगार मिळणार

महाराष्ट्राला देशाचे आर्थिक इंजिन बनवण्याच्या दिशेने राज्य सरकारने आणखी एक मोठे पाऊल टाकले आहे. राज्यात इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि अत्याधुनिक लॉजिस्टिक्स क्षेत्रात मोठी गुंतवणूक येणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी दोन सामंजस्य करार करण्यात आले. या माध्यमातून तब्बल ४,०८० कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, ४,७५० तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होणार आहेत. राज्य सरकारला…

Read More

चटका लावणारी एक्झिट:ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक भूषण देशमुख यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार, इतिहासाचे अभ्यासक भूषण गोपाळ देशमुख (वय 64 ) यांचे आज निधन झाले. गेल्या महिन्यात भुईकोट किल्ल्यात हेरिटेज वॉक उपक्रमात लष्करी अधिकाऱ्यांच्या गटाला माहिती देत असताना त्यांना सर्पदंश झाला होता. त्यावर उपचार करण्यात आले. त्यातून बरे झाले होते. काही दिवसांनी त्यांना पुन्हा त्रास होऊ लागला. प्रकृती बिघडल्याने त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते….

Read More

भाविकांची गैरसोय:पैठण शहरामधील 8 नाल्यांचे पाणी गोदावरीच्या नदीपात्रात‎, विविध जिल्ह्यांतून दररोज 6 हजार भाविक येतात स्नानासाठी,

येथील गोदावरी नदीत अधिक मासानिमित्त पवित्र स्नानासाठी दररोज ५ ते सहा हजार भाविक येतात. मात्र, नदीपात्रात ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त पाणी सोडण्यात येत असल्याने भाविकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अधिक मासात गोदावरी स्नानाला विशेष धार्मिक महत्त्व असल्याने दररोज पाच हजार भाविक संत एकनाथ महाराज मंदिराच्या पाठीमागे, नागघाट आणि इतर घाटांवर स्नानासाठी येत आहेत. मात्र शहराच्या…

Read More

कॉकरोच जनता पार्टीवर मुनगंटीवारांचा निशाणा; आचारसंहितेलाही ठरवलं नवा गब्बरसिंग:सीजेपीच्या आंदोलनावरही स्पष्ट भूमिका

चंद्रपूरमध्ये बोलताना भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनावर तसेच विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर सविस्तर भाष्य केले. नीट परीक्षा प्रकरणावरून दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनामुळे या पक्षाची चर्चा देशभर होत असताना मुनगंटीवार यांनी सामान्य नागरिकांच्या भावना दुखावणाऱ्या वक्तव्यांमधूनच अशा प्रकारच्या चळवळी निर्माण होतात, असे मत व्यक्त केले….

Read More

निदा खान प्रकरणाचे धागेदोरे महाराष्ट्रभर:संभाजीनगरमधील कथित धर्मांतर प्रकरणावरून संजय शिरसाट आक्रमक, वडेट्टीवारांवर वेड्याच्या रुग्णालयात उपचार करण्याची वेळ

शिवसेना (शिंदे गट) प्रवक्ते आणि आमदार संजय शिरसाट यांनी विविध राजकीय घडामोडींवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर अत्यंत तिखट शब्दांत प्रहार केला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील कथित धर्मांतर आणि फसवणुकीच्या प्रकरणाचा संदर्भ देत शिरसाट म्हणाले की, ‘निदा खान प्रकरण’ हे केवळ नाशिकपुरते मर्यादित नसून त्याचे धागेदोरे संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेले आहेत, हे मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे आणि आता…

Read More

कापरेवाडीत पर्यावरण रक्षणासाठी एकवटले शेकडो हात:कापरेवाडीमध्ये महाश्रमदान व वृक्षारोपणात ग्रामस्थांनी घेतला उत्स्फूर्तपणे सहभाग‎

“जगात विज्ञान आणि तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली तरी पर्यावरणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. वाढते प्रदूषण आणि हवामान बदलाच्या काळात ‘पर्यावरण जगले तरच आपण जगू’ हे माणसाने वेळीच ओळखले पाहिजे. निसर्गाचे रक्षण करणे ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे,” . यावेळी उपस्थिताना मार्गदर्शन करताना हभप अशोक महाराज बोंगाणे म्हणाले, “अध्यात्म, निसर्ग आणि विज्ञान या तीन गोष्टींचे…

Read More

मोदी सरकारने देश अमेरिका अन् दोन उद्योगपतींना विकला:मतदार यादीतून विशिष्ट समाजाची नावे वगळणे चुकीचे; 'एसआयआर' प्रक्रियेवर नाना पटोलेंचा आक्षेप

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप ज्यांना घाबरतात त्यांच्यावर कारवाई केली जाते. देशासाठी काम करणाऱ्या लोकांना नजरकैदेत ठेवण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. कॉकरोच जनता पार्टींचे दिपके यांना चांगला पाठिंबा मिळत आहे, असे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटले आहे. नाना पटोले म्हणाले की, सत्ताधाऱ्यांनी देश विकला आहे. आपला रुपया मारला आहे. मोदी सरकार आल्यानंतर रुपयाची किंमत…

Read More