Headlines

अवैध दारूच्या धंद्याला चाप: यापुढे पोलिस पाटीलच असतील जबाबदार:अकोले तालुक्यातील अवैध दारूविरोधात आता "ऑपरेशन क्लीन'' सुरू होणार‎

“गावात अवैध दारू विकली जाते आणि पोलीस पाटील डोळे मिटून बसतात, हे आता खपवून घेतले जाणार नाही,” असा सज्जड दम संगमनेरचे प्रांताधिकारी अरुण उंडे यांनी दिला आहे. आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या सूचनेनंतर महसूल, पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाची तातडीची बैठक अकोले तहसील कार्यालयात पार पडली. यात अवैध दारू माफियांविरोधात “ऑपरेशन क्लीन’ छेडण्याचा निर्धार करण्यात…

Read More

…हुश्श, तनपुरे अखेर बिनविरोध! पण अपक्ष पानसरेंनी 6तास फोडला घाम:महायुतीची 5 तास रणनिती, शेवटच्या मिनिटाला पानसरेंनी आणला ट्विस्ट‎

दत्तात्रेय पानसरे (अपक्ष), मच्छिंद्र धुमाळ (अपक्ष) आणि करण ससाणे (अपक्ष) हे ५ उमेदवार रिंगणात होते. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीने पूर्ण ताकद पणाला लावली होती. त्यानुसार ४ उमेदवारांनी माघार घेणे अपेक्षित होते. . मात्र, दुपारी २:५९ वाजता अपक्ष उमेदवार दत्ता पानसरे यांचे सूचक शाहबाज सय्यद यांनी माघारीचा अर्ज दिला आणि तिथून पुढे चक्रे वेगाने फिरली….

Read More

एल-निनोचे संकट: पिण्याच्या पाण्याचे नियोजन आधीच करा:जिल्हाधिकारी डॉ. आशियांचे निर्देश, अनधिकृत पाणी उपशावर होणार कारवाई‎

अहिल्यानगर एल-निनोच्या संभाव्य प्रभावामुळे निर्माण होणाऱ्या पाणी आणि चारा टंचाईच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज आहे. आगामी काळात पर्जन्यमानावर होणारा परिणाम लक्षात घेता, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्हास्तरीय आढावा बैठकीत सर्व संबंधित विभागांना ‘वॉटर-फेडर’ नियोजनाचे निर्देश दिले आहेत. “टंचाईची परिस्थिती उद्भवण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करून पिण्याच्या पाण्याचे नियोजन आधीच करा, असे डॉ. आशिया यांनी…

Read More

जिल्हा परिषद नवीन इमारतीला 3वेळा मुदतवाढ मिळाली तरीही काम अर्धवटच:सभापती गरड यांनी कंत्राटदार, अधिकाऱ्यांना धरले धारेवर‎

जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीचे काम तब्बल तीन वेळा मुदतवाढ देऊनही अद्याप अपूर्णच आहे. धक्कादायक बाब म्हणजे, काम पूर्ण नसतानाही कंत्राटदाराला आतापर्यंत तब्बल ५९ पैकी ५७ कोटी रुपयांची बिले अदा करण्यात आली असल्याचे समोर आले आहे. प्रशासकीय काळामध्ये कंत्राटदाराला अधिकाऱ्यांनी पाठीशी घातल्यानेच कामाची गती मंदावली. कामाचा दर्जाही राखला गेला नसल्याचे बांधकाम सभापती सचिन गरड यांनी…

Read More

आई-वडिलांना चारधाम यात्रा घडवणाऱ्या मुलांच्या इच्छा पूर्ण होतात- इंदुरीकर महाराज:चारधाम यात्रेनंतर आयोजित गंगापूजन कार्यक्रमात इंदुरीकर महाराजांचे कीर्तन‎

ज्या मुलाने आपल्या आई-वडिलांची सेवा केली, वयोवृद्ध आई-वडिलांना चारधाम यात्रा घडवली, अशा मुलाच्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतात, असे प्रतिपादन प्रख्यात कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी कन्नड येथे माजी आमदार तेजस्विनी जाधव यांच्या चारधाम यात्रा-पूर्तिप्रीत्य र्थ आयोजित कीर्तनात केले. कन्नड शहरातील साई मंदिर प्रांगणात ऐंशी वर्षीय माजी आमदार तेजस्विनी जाधव यांच्या चारधाम यात्रेनंतर आयोजित गंगापूजन कार्यक्रमात इंदुरीकर…

Read More

विसापूर वनपरिक्षेत्रात पाणवठे कोरडे; वन्यजीवांचा मानवी वस्तीकडे मोर्चा:42 अंशांवरील तापमानामुळे पाण्याची तीव्र टंचाई; वन विभागाविरोधात संताप‎

तालुक्यातील कातरवाडी, रापली, वडगाव पंगू, समिट, तळेगावरोही तसेच येवला तालुक्यातील कातरणी, विसापूर वनपरिक्षेत्रातील जंगलांमध्ये वन्यजीवांसाठी तयार करण्यात आलेले कृत्रिम पाणवठे पूर्णपणे कोरडे पडल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सध्या परिसरातील तापमा . शासनाकडून वन्यजीव संवर्धनासाठी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जात असताना अनेक पाणवठ्यांमध्ये पाण्याचा एक थेंबही नसल्याने वन विभागाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले…

Read More

वेरूळ घाटातील ‘चांगोबा’ वळणावर 2 बसची धडक:अर्धा तास वाहतूक ठप्प, ट्रॅव्हल्सचालक जखमी‎

वेरूळ लेणीकडे जाणाऱ्या घाटातील ‘चांगोबा वळणा’जवळ गुरुवारी सकाळी साडेसहा ते सात वाजेच्या दरम्यान खाजगी ट्रॅव्हल्स आणि छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या स्मार्ट सिटी बसचा समोरासमोर अपघात झाला. यात ४० भाविक आणि सिटीबसमधील प्रवासी बचावले असून, अपघातात ट्रॅव्हल्सचालक किरकोळ जखमी असून, सिटी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या बाभळीच्या झाडांमध्ये अडकल्यामुळे ४० ते ४५ फूट खोल दरीत कोसळण्यापासून वाचली. कर्नाटकातून…

Read More

कर्जमाफी जीआरची पैठणला होळी; शासनाने फसवणूक केल्याचा आरोप:संघटनेकडून 50 हजारांची मर्यादा रद्द करण्याची मागणी‎

पैठण राज्य सरकारने जाहीर केलेला नवीन कर्जमाफीचा शासन निर्णय हा शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरुवारी पैठण बसस्थानक चौकात जीआरची होळी करण्यात आली. आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष माऊली मुळे यांनी केले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी सरकारच्या कर्जमाफी धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. महात्मा फुले कर्जमुक्ती योजना २०१९ चा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ ५० हजार…

Read More

86% विजेची गरज सौरऊर्जेतून; शिर्डी संस्थान आत्मनिर्भरतेकडे:91 लाख युनिट्सपैकी 78.8 लाख युनिट्सची निर्मिती स्वतः करणार

दररोज लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान आता ऊर्जेच्या बाबतीत “आत्मनिर्भर’ होण्याच्या उंबरठ्यावर आहे. संस्थानला विविध विभागांसाठी प्रतिवर्ष लागणाऱ्या एकूण ९१ लाख युनिट्स विजेपैकी तब्बल ८६ टक्के म्हणजेच ७८.८ लाख युनिट्स वीज एकट्या सौर ऊर्जेतून मिळणार आहे. सध्या पूर्ण झालेल्या दोन मुख्य रुफटॉप प्रकल्पांमधूनच संस्थानच्या वार्षिक २०.६५ कोटी रुपयांच्या वीज बिलात थेट…

Read More

तनपुरेंकडे पुण्यात 4 कोटींचे दोन फ्लॅट्स:एकूण स्थावर मालमत्तेचे चालू बाजार मूल्य 10 कोटी 82 लाख 5 हजार

अहिल्यानगर स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे कोट्यवधींच्या संपत्तीचे मालक आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर त्यांची संपत्ती १ कोटीने वाढली असून उत्पन्न घटल्याचे उमेदवारी अर्जासोबत त्यांनी सादर केलेल्या सत्यप्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे. प्राजक्त तनपुरे यांच्या मालकीच्या एकूण स्थावर मालमत्तेचे चालू बाजार मूल्य १० कोटी ८२ लाख ५ हजार रुपये इतके आहे. यामध्ये…

Read More