Headlines

श्रीराम व हरिहर संस्थानची 12 एकर जमीन हडपण्याचा घाट:संस्था अध्यक्षांची महसूलकडे तक्रार, महामार्गावर माेक्याची जागा‎

. भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या टिळक रोडवरील श्रीराम व हरिहर संस्थानची (मोठे श्रीराम मंदिर) रिधोरा परिसरात असलेली जमीन हडपण्याचा प्रकार होत असल्याची तक्रार संस्थेच्या अध्यक्षा सुमन विजय अग्रवाल यांनी महसूल विभागाकडे केली आहे. हे प्रकरण सध्या बाळापूर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सुनावणीसाठी प्रलंबित आहे. यानिमित्ताने धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक संस्थांच्या जमिनी हडपण्यासाठी अकोल्यातील भूखंड माफियांची टोळी चर्चेत आली आहे….

Read More

आज अजितदादा आपल्यात नाहीत…:राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावूक, कार्यकर्त्यांना केले भावनिक आवाहन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला 27 वर्षे पूर्ण होत असताना यंदाचा वर्धापन दिन मात्र वेगळ्याच भावनांनी भारलेला आहे. जानेवारी महिन्यात बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकस्मात निधन झाल्यानंतर पक्षाचा हा पहिलाच वर्धापन दिन आहे. त्यांच्या जाण्याने केवळ पक्षालाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला होता. कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे, प्रत्येकाला आधार देणारे…

Read More

नेत्रदानाची जबाबदारी समाजातील प्रत्येकाने स्वीकारावी- सुरेश साबू:जागतिक नेत्रदान दिनानिमित्त पदाधिकाऱ्यांची नियोजन सभा‎

नेत्रदान हे अत्यंत मोठे आणि महान सामाजिक कार्य असून गेल्या १६ वर्षांपासून हरिना फाऊंडेशन या कार्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. आता या जनजागृती अभियानाची जबाबदारी समाजातील प्रत्येक घटकाने स्वीकारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन माहेश्वरी पंचायतचे अध्यक्ष सुरेश साबू यांनी केले. आगामी १० जून रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक नेत्रदान दिनानिमित्त हरिना फाऊंडेशनतर्फे विविध उपक्रमांची जोरदार तयारी सुरू…

Read More

बार्शीला विधानपरिषदेत नेतृत्व करण्याची चौथ्यांदा संधी शक्य:राजेंद्र राऊत यांच्या उमेदवारीमुळे सोलापुरातील भाजपला विधान परिषदेत प्रतिनिधित्व मिळण्याची अपेक्षा?‎

. विधान परिषदेच्या सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत भाजपकडून बार्शीचे राजेंद्र राऊत व राष्ट्रवादी काँग्रेस (श. प.) कडून कासेगाव (ता. पंढरपूर) येथील वसंतराव देशमुख यांच्यात दुरंगी सामना होत आहे. महायुतीच्या मतदारांची गोळाबेरीज पाहता राऊत यांचे पारडे जड दिसतेय. राऊत यांची निवड झाल्यास बार्शी तालुक्याला विधान परिषदेवर चौथ्यांदा प्रतिनिधित्व मिळेल. ते वरिष्ठ सभागृहात जाणारे तालुक्यातील…

Read More

दौंड हायवेवर मोठी कारवाई:11 लाखांची सिग्नलिंग सामग्री जप्त; रेल्वे मालमत्ता चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, "आरपीएफ''कडून राहुरीतील दोघांसह 4 अटकेत‎

भारतीय रेल्वेच्या मालमत्तेची चोरी करणाऱ्या एका मोठ्या संघटित टोळीचा रेल्वे सुरक्षा बलाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी ११ लाख ८ हजार ९१२ रुपयांची रेल्वे सिग्नलिंग सामग्री जप्त केली. याप्रकरणी चार आरोपींना बेड्या ठोकल्या. या टोळीला अटक केल्यामुळे रेल्वेचे होणारे मोठे आर्थिक नुकसान टळलेच, शिवाय रेल्वे वाहतुकीच्या सुरक्षेला निर्माण झालेला संभाव्य धोकाही टळल्याचे रेल्वे पोलिसांनी…

Read More

"एक कुटुंब-एक झाड' संकल्पनेतून अहिल्यानगर हरित करणार- बारस्कर:तपोवन रस्त्यावरील लक्ष्मीनगर परिसरात मोफत फळझाडे व देशी वृक्षांचे वाटप‎

संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी शेकडो वर्षांपूर्वी दिलेल्या वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे या अमूल्य संदेशातून प्रेरणा घेत, शहरात ‘एक कुटुंब – एक झाड’ हा संकल्प साकारण्यासाठी व्यापक जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अभियानांतर्गत नागरिकांना मोफत फळझाडे आणि देशी वृक्षांचे वाटप करून ‘हरित अहिल्यानगर घडवण्याचा संकल्प करण्यात आल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी…

Read More

दिव्य मराठी विशेष:ऑस्ट्रेलिया-पूर्व आशियाई ‘मालदिवी पाणभिंगरी’ संकटात, जायकवाडीचा गाळपेरा परदेशी पक्ष्यांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे अभ्यासकांचे मत

जगाच्या नकाशावर पक्षी स्थलांतराचा अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जाणारा परदेशी पाहुणा ‘मालदिवी पाणभिंगरी’ (ओरिएंटल प्रेटिनकॉल) सध्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलिया आणि पूर्व आशियातून दरवर्षी साधारणतः फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी भारतात दाखल होणाऱ्या या पक्ष्यांचे थवे सध्या जायकवाडी, ढेकू, गिरजा आणि सुखना जलाशय परिसरात विसावले आहेत. जायकवाडीच्या गाळपेरा भागात हे पक्षी नियमितपणे प्रजननासाठी येतात. मात्र, यंदा येथील…

Read More

जि.प. शाळेतील रखडलेल्या खोल्या बांधकामाचा पेच कायम:समग्र शिक्षा अभियानातून तीन खोल्यांचे काम पूर्ण, पहिला मजला अपूर्ण‎

शिवना येथील जिल्हा परिषद शाळेच्या नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम वर्षभरापासून रखडले आहे. खालच्या तीन वर्ग खोल्या समग्र शिक्षा अभियानातून पूर्ण झाल्या. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पहिल्या मजल्याचे मंजूर बांधकाम पूर्ण होणे बाकी आहे. यासंदर्भात दै दिव्य मर . वर्षभरापूर्वी मोडकळीस आलेल्या शाळा खोल्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली होती. संबंधित कंत्राटदाराने तळ मजल्याचे काम संथ गतीने पूर्ण केले…

Read More

महावितरणचे दुर्लक्ष:खुल्लोडमध्ये झुकलेले खांब, दुरवस्था झालेल्या डीपीमुळे जीवाला धोका, अधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्याचा आरोप, दुरुस्ती करण्याची केली मागणी‎

खुल्लोड येथील गट क्रमांक २४ मधील शेतात जुनी असलेली वीज वितरण डीपी तसेच मुख्य वीज वाहिनीचे खांब अत्यंत धोकादायक अवस्थेत झुकलेले असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. पावसाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर या परिसरात मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन त्वरित दखल घेण्याची मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात…

Read More

राजकारण:वचनावरून महायुतीत गुंता, नाशिक विधान परिषदेत भाजप बंडखोर गितेंच्या माघारीसाठी मुख्यमंत्री हस्तक्षेप करणार

व्यावहारिक जगात शब्द देणे म्हणजे वचनच मानले जाते. राजकारणात सर्वपक्षीय नेतेमंडळी असे शब्द देतात. त्यातील काही शब्द म्हणजे वचने पाळतात आणि काही मोडीत काढतात. त्यातून गुंता निर्माण होतो. त्याचाच अनुभव सध्या विधान परिषद, राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीमध्ये येत आहे. त्याची तीन उदाहरणे समोर आली आहेत. पहिले उदाहरण विधान परिषदेच्या उमेदवारीचे आहे. तेथे भाजपच्या नेत्यांनी गोकुळ गिते…

Read More