Headlines

एसटी बस – स्कॉर्पिओची समोरासमोर धडक:4 जण जागीच ठार, 4 जखमी; मुरबाड – माळशेज घाट मार्गावरील वैशाखरे येथील घटना

एसटी बस आणि स्कॉर्पिओच्या समोरासमोर झालेल्या एका धडकेत 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी मुरबाड – माळशेज घाट मार्गावरील वैशाखरे वळणावर घडली आहे. या घटनेत इतर 4 जण गंभीर जखमी झाले असून, त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, विठ्ठलवाडी आगारातील एक बस मंगळवारी सकाळी 8.30 च्या…

Read More

राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करा:वकील असीम सरोदे यांची मागणी; 'नसरापूर'च्या आरोपीला हालहाल करून मारण्याच्या मागणीवर आक्षेप

वकील असीम सरोदे यांनी नसरापूर प्रकरणातील आरोपीला हालहाल करून मारण्याची मागणी करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आरोपीला ठेचून मारा, हालहाल करून मारा, अशा मागण्या करणे म्हणजे समाजात बेकायदेशीरता पसरवण्याचा प्रयत्न आहे. त्यातून लोकांना गुन्हेगारी करण्यास प्रवृत्त करण्याचा प्रयत्न होतो. त्यामुळे पोलिसांनी एकतर संबंधितांना समज द्यावी किंवा त्यांच्यावर गुन्हा…

Read More

Sanjay Shirsats Operation Tiger Statement

येत्या काही महिन्यांत शिवसेना (शिंदे गट) पक्षात आणि राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची दाट शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवाळीपूर्वी आपल्या मंत्रिमंडळाची ‘भाकरी’ फिरवण्याच्या तयारीत असून, जे मंत्री पक्ष संघटना बळकट करण्यात अपयशी ठरले आह . राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’बाबत मंत्री संजय शिरसाट यांनी महत्त्वाची विधाने केली आहेत. शिरसाट म्हणाले…

Read More

ठाकरेंच्या खासदाराच्या पत्नीची विचारपूस करण्यासाठी एकनाथ शिंदे थेट रुग्णालयात:राजकीय चर्चा, ‘ऑपरेशन टायगर’ पुन्हा चर्चेत

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आणणारी घटना समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांच्या पत्नीची रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. पल्लवी पाटील यांचा नुकताच अपघात झाला असून त्या सध्या उपचार घेत आहेत. ही माहिती मिळताच शिंदे यांनी मंगळवारी थेट मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालय गाठत त्यांची भेट घेतली….

Read More

महिनाभरात शेतकरी कर्जमाफीचा निर्णय होणार:पिकनुकसानीची भरपाईही मिळणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची महत्त्वाची माहिती

“राज्यातील कर्जमाफीबाबतच्या सर्व माहितीचे संकलन पूर्ण झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत्या एक महिन्याच्या आत यावर अंतिम निर्णय घेतील,” अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली. पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्र सरकारने २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ जाहीर केली…

Read More

वादग्रस्त होर्डिंग धोरण पुन्हा येणार:प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू, भाजपच्या निर्णयानंतरही प्रस्ताव

पुणे शहरात वादग्रस्त ठरलेले होर्डिंग धोरण पुन्हा नव्याने आणण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू झाल्या आहेत. यापूर्वी स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले आणि अतिरिक्त आयुक्त प्रजीत नायर यांच्यात या धोरणावरून वाद झाला होता. भाजपने पक्षस्तरावर हे धोरण पुढे न नेण्याचा निर्णय घेतला असतानाही प्रशासकीय स्तरावर नव्याने प्रस्ताव तयार केला जात आहे. सभागृह नेते गणेश बिडकर यांनी…

Read More

धार्मिक कार्यासाठी कुणी पॅनकार्ड देतं का?:खोटं बोलण्याचा निगरगट्टापणा आणतात कुठून? चाकणकरांच्या दाव्यावर सुषमा अंधारे सवाल

समता नागरी सहकारी पतसंस्थेतील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॉन्डरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ED) प्रतिभा चाकणकर यांची प्रदीर्घ चौकशी केली. “धार्मिक कामाच्या नावाखाली आम्ही अशोक खरातला कागदपत्रे दिली आणि फसलो,” असा दावा प्रतिभा चाकणकर यांनी चौकशीदरम्यान केला आहे. मात्र, त्यांचा हा दावा हास्यास्पद असून “खोटं बोलण्यासाठी एवढा निगरगट्टापणा आणतात तरी कुठून?” अशा शब्दांत सुषमा अंधारे…

Read More

राऊतांनी पाकिस्तानात जाऊन निवडणूक लढवावी, त्यांच्यामुळेच उबाठा'ला अश्व लागले:ममता-स्टॅलिन घरी गेले, 'इंडिया' आघाडीत आता फक्त काँग्रेसच शिल्लक- नवनाथ बन

पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूच्या निकालानंतर राजकीय वातावरण तापले असून भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी ‘इंडिया’ आघाडीवर जोरदार निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी आघाडीला बाजूला सारून निवडणूक लढवली, मात्र या निकालांनी आघाडीचे अस्तित्वच धोक्यात आणल्याचे त्यांनी म्हटले आहे. ममता बॅनर्जी आणि एम. के. स्टॅलिन हे उद्धव ठाकरेंचे जवळचे मित्र होते. मात्र, जनतेने या…

Read More

संभाजीनगरमध्ये गॅस टंचाई:तापमान 40 च्या पुढे असताना रणरणत्या उन्हात सिलिंडरसाठी रांगा, अनेकांच्या तब्बल 35 किमीवरून रोज फेऱ्या

छत्रपती संभाजीनगरमधील लोकांना पुन्हा गॅस टंचाईचा सामना करावा लागतोय. शहराचे तापमान तब्बल 40 अंशाच्या पुढे जात आहे. मात्र, अशा रणरणत्या उन्हात लोकांना दिवसभर गॅस सिलिंडरसाठी ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केलाय. सरकार आणि प्रशासनाने लवकरात लवकर गॅस पुरवठा सुरळित करावा. सिलिंडर घरपोच द्यावे, अशी मागणी होतेय. अमेरिका आणि इराण युद्धामुळे शहरात…

Read More

हिंगोलीत अंगावर हळद लागण्यापूर्वीच भावी नवरदेवाची आत्महत्या:सेनगाव तालुक्यातील वाघजाळी गावावर शोककळा

सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथे अंगावर हळद लागण्यापुर्वीच भावी नवरदेवाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी ता. 5 सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. तर एकुलता एक मुलगा गेल्याने गांधीले कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथील आनंद हरिभाऊ…

Read More