Headlines

वारकरी संप्रदायावर शरद पवारांचे भाष्य:चळवळीत प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी होत असल्याचे म्हणत चिंता व्यक्त

शरद पवार यांनी वारकरी संप्रदायाबाबत महत्त्वपूर्ण आणि चर्चेत येईल असे विधान केले आहे. महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या स्मरणिकेत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांची घुसखोरी होत असल्याचा आरोप त्यांनी केला असून, या प्रवृत्तीमुळे चळवळीचा मूळ प्रबोधनात्मक हेतू धोक्यात येत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली….

Read More

धोका:नागरी वस्तीसह साचलेल्या कचरा ढिगाऱ्यांचा महावितरणाला फटका, महावितरणसोबतच परिसरातील नागरीकांनाही करावा लागते गैरसोय‎

Marathi News Local Maharashtra Amravati The Garbage Piles Accumulated Along With The Urban Settlements Are A Blow To The Mahavitaran, Along With The Mahavitaran, The Citizens Of The Area Also Have To Suffer Inconvenience. अमरावती2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अमरावती शहरात अलीकडे कचरा साचण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नागरी वस्तीसह शहरातील मुख्य बाजारपेठ, मुख्य रस्त्यांवरही…

Read More

"माझ्या मरणाने गरिबांचे हित होत असेल, तर खुशाल जीव घ्या!":मृत्यू समोर उभा असतानाही मारेकऱ्यांचे हृदयपरिवर्तन करणारे महात्मा जोतिबा फुले

दिवसभराचे काम आटपून रात्रीच्या वेळी एक व्यक्ती झोपली होती. साधारण मध्यरात्रीचीच वेळ होती ती. नेमके तेव्हाच त्यांच्या घरात काहीतरी आवाज झाला आणि त्यांना जाग आली. घरात लावलेल्या समईच्या प्रकाशात त्यांना दोन अंधुक अशा आकृत्या दिसल्या. त्यांनी मोठ्याने विचारले, “कोण आहे रे तिकडे?” त्यावर त्यातील एकाने म्हटले, “आम्ही तुमचा निकाल लावायला आलो आहोत.” दूसरा व्यक्ती म्हणाला,…

Read More

नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण लवकरच:पंकजा मुंडेंची घोषणा; सांडपाणी सोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी नदी सुशोभीकरणापेक्षा तिच्या प्रदूषणमुक्तीवर अधिक भर देण्याची भूमिका मांडली आहे. राज्यातील वाढते जलप्रदूषण रोखण्यासाठी आणि उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी लवकरच स्वतंत्र ‘नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी पुण्यात सांगितले. आकुर्डी येथील पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) मुख्यालयात आयोजित विशेष बैठकीत त्या बोलत होत्या….

Read More

पुणे प्रदूषण वाढले: RMC, हॉटमिक्स प्लांट शहराबाहेर हलवणार:स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची घोषणा, नागरिकांच्या आरोग्यासाठी निर्णय

पुणे शहराच्या वायू प्रदुषणात वाढ होत आहे. यामुळे पुणेकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात अनेक भागात खाजगी तसेच महापालिकेचे आरएमसी प्लांटस् , डांबर प्लांटस् (हॉटमिक्स प्लांट) आहेत. यामुळे प्रदुषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा विचार करुन प्रामुख्याने महापालिकेचे आरएमसी प्लांट आणि डांबर प्लांट शहराबाहेर हलविण्यासाठी प्रशासनाने काम करावे. तसेच शहरात प्रदूषण नियामक मंडळाच्या…

Read More

आंबेडकर जयंती मिरवणुकीसाठी महापौरांचे महत्त्वाचे निर्देश:पिण्याचे पाणी, मोबाईल टॉयलेट्ससह सर्व सुविधा पुरवण्याचे आदेश

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी निघणाऱ्या मिरवणुकीदरम्यान भाविकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे निर्देश महापौर समीर राजूरकर यांनी दिले आहेत. मिरवणूक मार्गावर पिण्याच्या पाण्याची आणि मोबाईल टॉयलेट्सची व्यवस्था करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. महानगरपालिकेतर्फे आंबेडकर जयंती मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत…

Read More

पोलिसच बनले पोलिसांचे वैरी!:गुप्तधनाच्या तपासादरम्यान अकोला पोलिसांचा बुलढाणा पोलिसांवर हल्ला, गुन्हा दाखल

बुलढाणा जिल्ह्यातील तामगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुप्तधन प्रकरणाच्या तपासासाठी गेलेल्या बुलढाणा पोलिसांवर अकोला पोलिस दलातील दोन कर्मचाऱ्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन जिल्ह्यांच्या पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये झालेल्या या थेट संघर्षामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, या हल्ल्यात दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. याप्रकरणी दोषी कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस दलातील…

Read More

भारतीय स्टेट बँकेकडून निधी पुरवठ्याचा अभाव:हळद खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प, व्यापारी महासंघाची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

हिंगोलीच्या भारतीय स्टेट बँकेकडून इतर बँकांना निधीचा पुरवठा होत नसल्याने बाजार समिती अंतर्गत हळद व इतर शेतीमाल खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प झाले असून या प्रकरणात आता तातडीने लक्ष घालून बँकेला आवश्‍यक सूुचना देण्याची मागणी व्यापारी महासंघाने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडे शुक्रवारी ता. १० केली आहे. यासंदर्भात व्यापारी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष अनिल नैनवाणी, प्रशांत सोनी, पवन…

Read More

साध्या थकव्याचे रूपांतर दुर्मिळ कॅन्सरमध्ये:नाशिकच्या 55 वर्षीय शेतकऱ्याची मृत्यूशी झुंज यशस्वी; 14 सेंमी आकाराचा आढळून आला ट्यूमर

अनिल कदम यांचा व्यवसाय सर्वाधिक खडतर कष्टांची मागणी करणारा अर्थात शेतीचा होता. त्यामुळे नोव्हेंबर २०२५ मध्ये त्यांना थकवा जाणवायला लागला तेव्हा हे कामामुळेच होत असणार असाच त्यांच्या कुटुंबातल्या सर्वांचा समज झाला. ही लक्षणे बळावल्यावर, त्यांना उलट्या सुरू झाल्यावर तसंच गिळताना त्रास होऊ लागल्यावर मात्र त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि नाशिकच्या या ५५…

Read More

मोलमजुरी करणाऱ्या माऊलीची लेक साक्षी जपानमध्ये धावणार:प्रतिकूल परिस्थितीवर मात करत "एशियन क्रॉस कंट्री''साठी निवड‎

जिद्द आणि चिकाटी असेल तर आभाळही ठेंगणे होते, हे पारनेर तालुक्यातील कन्येने सिद्ध करून दाखवले आहे. ६० व्या राष्ट्रीय क्रॉस कंट्री स्पर्धेत रौप्यपदक पटकावून पारनेर महाविद्यालयाच्या साक्षी भंडारी हिने थेट जपानमध्ये होणाऱ्या ‘एशियन क्रॉस कंट्री’ स्पर्धेचे तिकीट निश्चित केले आहे. तालुक्यातील अळकुटी येथील मोलमजुरी करणाऱ्या आईची लेक आता आंतरराष्ट्रीय धावपट्टीवर भारताचा तिरंगा फडकवण्यासाठी सज्ज झाली…

Read More