महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर:बंडखोरी करत अर्ज दाखल करणाऱ्यांनी माघार घ्यावी, रवींद्र चव्हाण यांची विनंती
महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र, असे असूनही महायुती म्हणून आम्ही एकत्र निवडणूक लढवू आणि जास्तीत जास्त जागा जिंकू असे महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर महायुतीने संयुक्त पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना रवींद्र चव्हाण…