मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात:एलपीजी टँकरवर कार आदळली, महिलेचा जागीच मृत्यू; दोन चिमुकल्यांसह तिघे जखमी
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला. नातुनगर धरण परिसरात भरधाव वेगातील झायलो कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एलपीजी गॅस टँकरला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर दोन लहान मुलांसह तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून महामार्गावरील वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला….