Headlines

'याचाही संतोष देशमुख करा':हरिनाम सप्ताहाचा हिशोब मागणाऱ्या कीर्तनकारावर गेवराईत जीवघेणा हल्ला, लोखंडी रॉडने मारहाण

गेवराई येथील स्वानंद सेवा गुरुकुलचे संचालक कीर्तनकार कैलास आनंदे यांच्यावर गावातील अखंड हरिनाम सप्ताहाचा हिशोब विचारल्याच्या कारणावरून काही व्यक्तींनी लोखंडी रॉड, केबल वायर आणि लाकडी दांड्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आनंदे हे आळंदीला जात असताना जातेगाव रोडवर आरोपींनी त्यांना अडवून ही बेदम मारहाण केली असून, हा सर्व धक्कादायक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात…

Read More

जलसंकट टळले, मजीप्रा कंत्राटदारांचे आंदोलन मागे:आमदार संजय खोडके यांच्या मध्यस्थीने प्रश्न सुटला

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील (मजीप्रा) कंत्राटदारांनी गेल्या तीन दिवसांपासून सुरू केलेले काम बंद आंदोलन गुरुवारी सायंकाळी मागे घेतले. आमदार संजय खोडके यांच्या यशस्वी मध्यस्थीमुळे हे आंदोलन थांबले असून, अमरावती शहरातील संभाव्य पाणीसंकट टळले आहे. आमदार खोडके यांनी कंत्राटदारांना त्यांच्या प्रलंबित रकमा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले. त्यांनी वरिष्ठांशी चर्चा केली असून, येत्या आठवडाभरात कंत्राटदारांना त्यांची देयके…

Read More

लोकसहभागातून शेत पांदण रस्ते, जलपुनर्भरणाची कामे:अमरावती जिल्ह्यात एनजीओंकडून अर्ज आमंत्रित

अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेत पांदण रस्ते व जलपुनर्भरण योजना’ राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत लोकसहभागातून शेत पांदण रस्ते आणि जलपुनर्भरणाची कामे करण्यासाठी इच्छुक अशासकीय संस्थांकडून (एनजीओ) अर्ज मागवण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी हे आवाहन केले आहे. या कामांसाठी शेतकरी लोकसहभाग, ग्रामपंचायत स्वनिधी आणि जिल्हा नियोजन समितीचा निधी वापरला जाईल….

Read More

जनगणना कामात असूनही बदल्या करा:कर्मचारी संघाची शासनाकडे मागणी, नंतर रुजू होण्याची तयारी

जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनी जनगणनेच्या कामात असूनही आपल्या बदल्या करण्याची मागणी केली आहे. जनगणना पूर्ण झाल्यावर नव्या ठिकाणी रुजू होण्याची त्यांची भूमिका आहे. कर्मचाऱ्यांच्या या भूमिकेमुळे शासन आणि प्रशासनासमोर एक नवा पेच निर्माण झाला आहे. सध्या जिल्हा परिषदेत विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे, ज्याची अंतिम मुदत ३१ मे आहे. याच दरम्यान, शासनाने जनगणनेचे काम…

Read More

ताडोबातील वाघांच्या संरक्षणासाठी 2300 भटक्या कुत्र्यांची नसबंदी:वनविभागाचे 'मिशन व्हॅक्सिनेशन'; संसर्गजन्य रोगांचा धोका टाळला

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील वाघ आणि इतर वन्यप्राण्यांना संसर्गजन्य रोगांपासून वाचवण्यासाठी वन विभागाने एक महत्त्वाची मोहीम यशस्वी केली आहे. ताडोबाच्या बफर क्षेत्रात भटक्या कुत्र्यांमुळे वन्यजीवांना ‘कॅनाईन डिस्टेंपर’ आणि ‘रेबीज’ सारख्या जीवघेण्या आजारांचा धोका निर्माण झाला होता. हा धोका कमी करण्यासाठी २०२५-२६ या वर्षात तब्बल २,३६५ भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. ताडोबाच्या गाभा…

Read More

पगार थकल्याने सुरक्षारक्षकाची आत्महत्या:सिंहगड कॉलेज संस्थापक, विश्वस्तांवर गुन्हा दाखल

सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचार्‍याने तब्बल ४२ महिन्यांचा पगार थकल्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याप्रकरणी आता सिंहगड संस्थेच्या संस्थापकांसह विश्वस्तांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पगार न दिल्याने आर्थिक विवंचना आणि मानसिक तणावातून संबंधित कर्मचार्‍याने आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे संस्थापक मारुती निवृत्ती नवले, सेक्रेटरी…

Read More

पुण्यात रेडझोनच्या नवीन इंजिनिअरिंग आणि एआय हबचे उद्घाटन:उत्पादन क्षेत्राच्या डिजिटलायझेशनला मिळणार गती, संशोधनाला चालना

देशातील तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्राचे प्रमुख केंद्र असलेल्या पुण्यात ‘रेडझोन’ या अग्रगण्य तंत्रज्ञान कंपनीने आपल्या नवीन ‘इंजिनिअरिंग आणि एआय हब’चे उद्घाटन केले. या विस्तारामुळे कंपनीच्या भारतातील कामकाजाला नवी गती मिळणार असून, उत्पादन तंत्रज्ञान आणि प्रॉडक्ट डेव्हलपमेंटमधील संशोधनाला मोठी चालना मिळेल. पुण्यातील हे अत्याधुनिक केंद्र प्रामुख्याने प्रॉडक्ट इंजिनिअरिंग, क्लाउड टेक्नॉलॉजी, इंडस्ट्रियल डेटा सिस्टिम्स आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स…

Read More

Raj Thackeray Demands Dharmendra Pradhan Resignation Over NEET Controversy

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ‘NEET’ परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि त्यानंतर निर्माण झालेल्या गोंधळावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘NEET’ परीक्षेचा पेपर लाखो रुपयांना विकला गेला आणि त्याची मुळे महाराष्ट्रात सापडल्याचे समोर येत असताना, केंद्र . राज ठाकरे यांनी म्हटले की, ‘NEET’ परीक्षा सुरू झाल्यापासूनच त्यांनी त्याला विरोध केला होता. 2016 मध्ये देशभर एकच…

Read More

फडणवीस सरकारचे 14 मोठे निर्णय:सिंधुरत्न योजना वाढवली, संत्रा अनुदान योजना बंद; कोकण, नाशिक, पुणे आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज 14 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यातील पायाभूत सुविधा, शेती, शिक्षण, आरक्षण, जलसंधारण आणि वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित अनेक मोठ्या निर्णयांना या बैठकीत मंजुरी देण्यात आली. कोकणातील विकासाला चालना देणारी सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 पुढील तीन वर्षांसाठी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला, तर बांग्लादेशला निर्यात होणाऱ्या संत्र्यांसाठी…

Read More

पुण्यात गुलाबो गॅंगचे मोदी सरकारविरोधात अनोखे आंदोलन:सोन्याची खरेदी टाळण्याच्या आवाहनावर 'झालमोरी बेचो' घोषणा

केंद्र सरकारने नागरिकांना पुढील एक वर्ष सोन्याची खरेदी न करण्याचे आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर, मंगळवारी पुण्यात ‘गुलाबो गॅंग’ आणि ‘बिटिया फाउंडेशन’च्या वतीने अनोखे उपहासात्मक आंदोलन करण्यात आले. लक्ष्मी रोडवरील शगुन चौक आणि सराफी पेढ्यांच्या परिसरात “झालमोरी बेचो, सोना मत बेचो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांचा निषेध करण्यासाठी आंदोलक महिलांनी हातात…

Read More