Headlines

पुणे विषारी दारू प्रकरणातील प्रत्येक गुन्हेगाराला कठोर शासन होईल:गिरीश महाजनांचे आश्वासन, पीडित कुटुंबियांची घेतली भेट

पुण्यातील दापोडी व फुगेवाडी या परिसरात विषारी दारूच्या सेवनामुळे अनेक नागरिकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुःखद घटना घडली असून याबाबत मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबीयांची आज आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी भेट घेऊन सांत्वन केले आहे. तसेच विषारी दारूच्या सेवनाने अत्यवस्थ झालेल्या रुग्णांची यशवंत स्मृती रुग्णालय येथे भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची माहिती घेऊन संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना आवश्यक…

Read More

किशोर रिठे यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार:'सातपुड्याचा सातबारा' ग्रंथासाठी शरदचंद्र मनोहर भालेराव स्मृती पुरस्काराने सन्मान

अमरावती येथील ज्येष्ठ निसर्ग व वन्यजीव अभ्यासक किशोर रिठे यांना महाराष्ट्राची आद्य साहित्य संस्था, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा प्रतिष्ठित शरदचंद्र मनोहर भालेराव स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिर नाट्यगृहात आयोजित एका समारंभात अभिनेता हृषीकेश जोशी यांच्या हस्ते त्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. सन २०२५ मधील विविध साहित्य प्रकारातील सर्वोत्कृष्ट साहित्यकृतींसाठी हे पुरस्कार देण्यात आले….

Read More

पुणे विषारी दारू प्रकरण:गुलाबो गँगचा आक्रोश; पर्वती पायथा परिसरात बेकायदेशीर दारू विक्रीविरोधात महिलांचे आंदोलन

पुणे शहरातील विषारी दारू प्रकरणानंतर १५ हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर, गुलाबो गँग आणि पायल तिवारी बिटिया फाउंडेशनने पर्वती पायथा परिसरात बेकायदेशीर दारू विक्रीविरोधात ‘हल्लाबोल’ आंदोलन केले. शनिवारी शनी मंदिराजवळील कथित दारू विक्री केंद्रासमोर झालेल्या या आंदोलनात महिलांनी तीव्र संताप व्यक्त करत प्रशासन आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की, विषारी…

Read More

रघुनाथ येमूल यांची निर्दोष मुक्तता:हायकोर्टाने केले सर्व आरोप रद्द; घरगुती हिंसाचार प्रकरणात मोठा दिलासा

पुण्यातील उद्योजक नाना गायकवाड यांच्या घरगुती हिंसाचार प्रकरणात आरोपी असलेले रघुनाथ राजाराम येमूल (गुरुजी) यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने येमूल यांची निर्दोष मुक्तता केली असून, त्यांच्यावरील महाराष्ट्र नरबळी व अघोरी प्रथा आणि काळी जादू प्रतिबंधक कायदा, २०१३ च्या कलम ३(२) अंतर्गत असलेले सर्व आरोप रद्द केले आहेत. न्यायमूर्ती शिवकुमार दिगे यांच्या…

Read More

काँग्रेसमुक्त भारत म्हणजे काँग्रेस नेत्यांना पक्षात घेणे का?:सुप्रिया सुळे यांचा भाजपला सवाल; प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशावरही केले भाष्य

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या ‘काँग्रेसमुक्त भारत’ संकल्पनेची खिल्ली उडवली आहे. काँग्रेसमुक्त भारत म्हणजे सर्व काँग्रेस नेत्यांना भाजपमध्ये घेणे आहे का? असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी भाजपवर निशाणा साधला. तसेच प्राजक्त तनपुरे यांनी आपल्याशी संपर्क साधूनच भाजपमध्ये…

Read More

जरांगेंच्या आंदोलनामागे राजकीय हेतू असल्याचा लक्ष्मण हाकेंचा आरोप:म्हणाले- मराठा मंत्रालयाची मागणी अवास्तव; आंदोलनालाही इशारा

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापले असताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मोठी भूमिका जाहीर केली आहे. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी 10 वाजल्यापासून आमरण उपोषण सुरू केले आहे. काल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप नेते प्रसाद लाड यांनी जवळपास दीड तास चर्चा करूनही कोणताही तोडगा न निघाल्याने…

Read More

गहाळ झालेले 10 लाख रुपयांचे 60 मोबाईल मुळ मालकांना परत:हिंगोली जिल्ह्यातील पोलिस दलाची कामगिरी; शोध मोहिम यशस्वी

हिंगोली जिल्हयात गहाळ झालेल्या मोबाईलची शोध मोहिम हाती घेऊन जिल्हा पोलिसांनी तब्बल १० लाख रुपये किंमतीचे ६० मोबाईल शोधून मुळ मालकांना परत केले आहे. शनिवारी ता. ३० एका विशेष कार्यक्रमात पोलिस अधिक्षक निलाभ रोहन यांच्या हस्ते मोबाईल देण्यात आले आहेत. हिंगोली जिल्हयात मागील काही दिवसांत मोबाईल चोरीच्या घटना घडल्या आहेत. विशेषतः आठवडी बाजारात खरेदीसाठी आलेल्या…

Read More

Shahu Maharaj Backs Jarange Patil; Govt Faces Warning

काँग्रेस खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी शनिवारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला. सर्व मराठे हे कुणबी आहेत आणि सर्व कुणबी हे मराठे आहेत. मनोज जरांगे पाटील व सरकार यांच्यात काय सुरू आहे हे आम्हाला माहिती आहे. पण सरकार मर . मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून आंतरवाली सराटीत भर उन्हात उपोषण सुरू…

Read More

मनोज जरांगेंच्या उपोषणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया:मराठा आरक्षणावर सरकारची भूमिका केली स्पष्ट

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. कडक उन्हात सुरू असलेल्या या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. सध्या मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे मनोज जरांगे पाटील…

Read More

माझा लढा सत्तेसाठी नव्हे, तर शेतकऱ्यांसाठी- गडाख:सोनईत हजारो शेतकऱ्यांची उपस्थिती, चांगल्या चाललेल्या संस्थेत विरोधकांनी राजकारण आणू नये‎

माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी उभी केलेली आणि शेतकऱ्यांची कामधेनू ठरलेली मुळा संस्था आम्ही सर्वांच्या साथीने समर्थपणे चालवत आहोत. गेल्या ५ वर्षांपासून सहकारी साखर कारखानदारी अनेक अडचणींना सामोरी जात असतानाही, मोठ्या कष्टाने व काटकसरीने मुळा कारखाना सुस्थितीत सुरू आहे. माझा लढा सत्तेसाठी नसून केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी केले….

Read More