जामखेड-पाटोदा महामार्गाचे काम रखडल्याने साकत घाटात मृत्यूचा प्रवास:अहिल्यानगर-बीड जिल्ह्याला जोडणारा शॉर्टकट बनला धोक्याचा
जामखेड-पाटोदा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडल्यामुळे वाहनचालक आणि नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. महामार्गाचे काम अपूर्ण असल्याने जामखेडहून पाटोद्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना साकत घाट मार्गाचा पर्यायी वापर करावा लागत आहे. मात्र, हा पर्यायी मार्गही आता अत्यंत दुरवस्थेत असल्याने वाहनचालकांना दररोज आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. या खराब रस्त्यामुळे अपघातांचे…