दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:सत्ताधारी आमदारांना 830 तर, विरोधकांना फक्त 70 कोटी, आमदार विरोधी पक्षांचे, शिक्षा मात्र शेतकऱ्यांना
जो सत्तेत तोच शक्तिमान याचा प्रत्यय राज्यातील २९ मतदारसंघांतील शेतकऱ्यांना आला आहे. ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने’त सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघांवर ३ कोटींपासून थेट १८.८२ कोटींपर्यंतच्या निधीची उधळण करण्यात आली. तर विरोधी पक्षातील आमदारांच्या पदरात मात्र प्रत्येकी २.५० कोटींचा दिला आहे. या राजकीय कुरघोडीत शिक्षा मात्र शेतकऱ्यांना मिळाली आहे. विरोधी आमदार असलेल्या भागात निधीअभावी कमी कामे…