Headlines

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:सत्ताधारी आमदारांना 830 तर, विरोधकांना फक्त 70 कोटी, आमदार विरोधी पक्षांचे, शिक्षा मात्र शेतकऱ्यांना

जो सत्तेत तोच शक्तिमान याचा प्रत्यय राज्यातील २९ मतदारसंघांतील शेतकऱ्यांना आला आहे. ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने’त सत्ताधारी आमदारांच्या मतदारसंघांवर ३ कोटींपासून थेट १८.८२ कोटींपर्यंतच्या निधीची उधळण करण्यात आली. तर विरोधी पक्षातील आमदारांच्या पदरात मात्र प्रत्येकी २.५० कोटींचा दिला आहे. या राजकीय कुरघोडीत शिक्षा मात्र शेतकऱ्यांना मिळाली आहे. विरोधी आमदार असलेल्या भागात निधीअभावी कमी कामे…

Read More

केतन अग्रवाल मृत्यू प्रकरण:एसआयएफएफची जलद चौकशीची मागणी, संस्थेने निष्पक्ष तपास आणि कठोर कारवाईची भूमिका मांडली

लोहगड परिसरातील केतन अग्रवाल यांच्या मृत्यू प्रकरणात निष्पक्ष, पारदर्शक आणि जलद चौकशीची मागणी सेव्ह इंडियन फॅमिली फाउंडेशन (एसआयएफएफ)ने केली आहे. दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि न्यायप्रक्रियेला विलंब होऊ नये, असेही संस्थेने म्हटले आहे. एसआयएफएफने केतन अग्रवाल यांच्या कुटुंबाप्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. संस्थेने आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींविरोधातील…

Read More

एकनाथ शिंदेंकडून ऑपरेशन टायगरच्या चर्चांना पूर्णविराम:म्हणाले – मी एकदाच ऑपरेशन केले, आता साध्या गोळीवर लोक माझ्याकडे येतील

“मला आता कोणत्याही ‘ऑपरेशन’ची गरज नाही. जे एकदा करायचे होते, ते मी करून दाखवले आहे आणि ते लोकांच्या चांगलेच लक्षात आहे. आता तर साध्या गोळीवरही लोक माझ्याकडे येतील,” अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना पूर्णविराम दिला. पंढरपूर येथे आयोजित एका भव्य सोहळ्यात भगिरथ भालके आणि अनिल सावंत यांच्या पक्षप्रवेशानंतर उपमुख्यमंत्री बोलत होते….

Read More

सिद्धिविनायक मंदिराचा होणार कायापालट:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडला नव्या आराखड्याचा मास्टरप्लॅन

मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपती मंदिराचा लवकरच कायापालट होणार असून मंदिर परिसराला अत्याधुनिक आणि भव्य रूप देण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन करण्यात आले. या विकास आराखड्यामुळे मंदिर परिसर अधिक आकर्षक, सुरक्षित आणि भाविकांसाठी सुलभ होणार असल्याची माहिती देण्यात आली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोशल…

Read More

अमरावतीजवळ डबा पार्टीस गेलेल्या भावंडांसह चार जणांचा तलावात बुडून मृत्यू:घातखेडा तलावातील गाळात एकामागाेमाग चाैघेही अडकले

अमरावतीमधील खोलापुरी गेट परिसरातील दहा मुले-मुली रविवारी शहरापासून १० किमी अंतरावरील घातखेडा तलावाजवळ डबा पार्टीसाठी गेले होते. जेवणानंतर पोहण्यासाठी पाण्यात उतरलेल्या १२ वर्षीय मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात एकामागोमाग चौघेजण तलावातील गाळात अडकले. पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला. सोनाली नरेंद्र जोशी (१६), आदित्य ऊर्फ मानव नरेंद्र जोशी (१३), पायल बबलू पंडित (२१), यश गजानन काकणे (१३, सर्व…

Read More

लंडनमध्ये कुटुंबासोबत वेळ घालवतेय अनुष्का शर्मा:पती विराटने मुलगा अकायला पाठीवर घेतले; अभिनेत्री आरामशीर अंदाजात दिसली

अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा पती विराट कोहली सध्या लंडनमध्ये कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. नुकतेच अनुष्का, विराट आणि त्यांचा मुलगा अकाय यांचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. या फोटोंमध्ये विराट आपला मुलगा अकायला खांद्यावर घेऊन फिरताना दिसत आहे. अनुष्का देखील या आउटिंगमध्ये तिच्या कुटुंबासोबत आणि मित्रांसोबत खूप आरामशीर मूडमध्ये दिसली. बऱ्याच काळापासून लाइमलाइटपासून…

Read More

जिच्या हत्येच्या आरोपात वडील-भाऊ तुरुंगात, ती जिवंत परतली:शीर कापलेल्या आणि जळालेल्या मृतदेहाला महाराष्ट्र पोलिसांनी शिवानीचा मानले होते

ज्या तरुणीच्या हत्येच्या आरोपाखाली वडील आणि भाऊ तुरुंगात आहेत, ती अचानक जिवंत परत आली. तिने 27 मे रोजी रात्री बऱ्हाणपूर जिल्ह्यातील खकनार पोलीस ठाण्यात जाऊन सांगितले – साहेब! मी जिवंत आहे…माझ्या वडील आणि भावाला सोडून द्या. खकनार पोलीस ठाण्याचे प्रभारी अभिषेक जाधव यांनी सांगितले की, शिवानी 24 एप्रिल रोजी बेपत्ता झाली होती. कुटुंबीयांनी खूप शोध…

Read More

काळानुसार शेतकऱ्यांनी आता शाश्वत शेती पद्धत स्वीकारावी:नेप्तीत खरीप हंगाम पूर्वतयारी बैठक, शेतकऱ्यांना मार्गदर्शन

प्रतिनिधी|अहिल्यानगर आजच्या बदलत्या हवामान परिस्थितीत पारंपरिक शेती सोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे आहे. संतुलित खत व्यवस्थापन आणि कीड नियंत्रण यावर भर दिल्यास उत्पादनात निश्चित वाढ होऊ शकते. शेतकऱ्यांनी आता शाश्वत शेती पद्धती स्वीकारावी असे आवाहन सहायक कृषी अधिकारी रावसाहेब नवले यांनी केले. तालुक्यातील नेप्ती येथील मारुती मंदिरात कृषी विभागाच्यावतीने खरीप हंगाम पूर्वतयारी नियोजन…

Read More

CM शुभेंदु अधिकारी म्हणाले- बंगालमध्ये UCC लागू होणार:लँड जिहाद, लव्ह जिहाद, सक्तीच्या धर्मांतरावर कायदा आणणार; घुसखोरांना परत पाठवणार

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी सांगितले की, त्यांचे सरकार राज्यात समान नागरी संहिता (UCC) लागू करेल. लँड जिहाद, लव्ह जिहाद आणि सक्तीच्या धर्मांतराविरोधात कठोर कायदाही आणला जाईल. ते म्हणाले की, जे लोक बेकायदेशीरपणे भारतात आले आहेत. देशाच्या संस्कृती किंवा राष्ट्रीय सुरक्षेविरुद्धच्या कारवायांमध्ये सामील आहेत, त्यांना राज्यात राहू दिले जाणार नाही. बेकायदेशीर घुसखोरांची ओळख पटवून…

Read More

India Economy to Grow Despite Middle East Crisis; Inflation Expected in 2027

नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) ने भारताच्या जीडीपी वाढीबद्दल नवीन आकडेवारी जाहीर केली आहे. IMF नुसार, मध्य पूर्वेतील सध्याच्या तणावामुळेही भारतीय अर्थव्यवस्था पूर्वीच्या अंदाजित वेगापेक्षा अधिक वेगाने प्रगती करेल. संस्थेने आर्थिक वर्ष 2026-27 साठी भारताच्या विकास दराचा अंदाज वाढवून 6.5% केला आहे. यापूर्वी जानेवारीत प्रसिद्ध झालेल्या आपल्या अहवालात IMF ने हा दर…

Read More