कौंदर येथील सप्ताहाची काल्याने सांगता:नवले महाराज यांच्या सुश्राव्य काल्याच्या कीर्तनाने भाविकांना मंत्रमुग्ध केले
प्रतिनिधी | दावरवाडी “भक्ताच्या अंतःकरणात जर दृढ विश्वासाचे आणि भक्तीचे बळ असेल, तर त्याची बुद्धी विचलित न होता स्थिर होते. हीच स्थिर बुद्धी माणसाला हरीच्या चरणी लीन करते. ज्याच्या हृदयात ईश्वरी नामाचा प्रकाश आहे, त्याला संपूर्ण चराचरात ईश्वराचेच रूप दिसते,’ असे प्रतिपादन कीर्तनकार कृष्णा महाराज नवले यांनी केले. पैठण तालुक्यातील कौंदर येथे शन्नैश्वर जयंतीनिमित्त आयोजित…