Headlines

सत्तेची वाट:पाच निवडणुका लढले, दोन वेळा ठाकरे ब्रँडवर लोकसभेत; आता शिंदेंच्या वाटेवर

शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिंदे शिवसेनेतील प्रवेशाची चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचली असताना त्यांच्या गेल्या १६ वर्षांच्या राजकीय प्रवासाकडे पुन्हा एकदा लक्ष वेधले जात आहे. विशेष म्हणजे, वाकचौरे यांनी आतापर्यंत पाच निवडणुका लढवल्या, त्यातील दोन्ही संसदीय विजय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या छत्राखालीच मिळवले. आता ते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत राजकीय नशीब आजमावण्याच्या तयारीत…

Read More

सलग 300 रविवार शहरात राबवले स्वच्छता अभियान:धर्मवीर युवा प्रतिष्ठानचा सलग ३०० रविवार स्वच्छतेचा विक्रम

धर्मवीर युवा प्रतिष्ठान, नालेगाव यांच्यावतीने गेल्या सहा वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या स्वच्छता अभियानाने रविवारी ऐतिहासिक टप्पा गाठला. सलग ३०० व्या रविवारी भिंगार येथील बेलेश्वर मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत मंदिर परिसरातील सुमारे पाच ते सहा टन कचरा, प्लास्टिक, झुडपे आणि गवत हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला. आयुक्त यशवंत डांगे म्हणाले, धर्मवीर युवा…

Read More

वैज्ञानिक पुरावे न्यायालयीन प्रक्रियेत विश्वासार्ह:पोलिसांना तपासाचे धडे, बदलत्या गुन्ह्याच्या स्वरुपानुसार तपासाची पद्धत अपग्रेड‎

गुन्ह्यांची उकल करण्यासाठी आणि गुन्हेगारांना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढवण्यासाठी, पोलिस विभागाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अलीकडे गुन्ह्यांचे स्वरुप बदलले आहेत. इंटरनेट, मोबाईल, सोशल मिडीया, डिजीटल व्यवहार, सीसीटीव्ही फुटेज या सर्व बाबींचे तपास . शहरातील विद्याभारती महाविद्यालयाच्या परिसरात २१ मे रोजी ग्रामिण पोलीस विभागाच्यावतीने एका विशेष ‘फॉरेन्सिक कार्यशाळेचे’ आयोजन करण्यात आले होते. आधुनिक काळातील गुन्ह्यांचे…

Read More

शिवरायांविषयी वादग्रस्त वक्तव्यावर धीरेंद्र शास्त्रींचा माफीनामा:शिवप्रेमी मोठ्या मनाचे असतात, माफ करतील- चंद्रशेखर बावनकुळे

नागपूरमधील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आता माफीनामा सादर केला आहे. “माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला. ज्यांच्यापासून आम्ही प्रेरणा घेतो, त्यांचा अवमान करण्याचा विचार स्वप्नातही येऊ शकत नाही,” असे म्हणत धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या विधानामुळे दुखावलेल्या भावनांबद्दल माफी…

Read More

राजापेठेत व्यापारी संकुलाच्या जागेवर महापालिकेचा कचरा डेपो:हमरस्त्यावर दुर्गंधी; नागरिक, नगरसेवकांचा तीव्र विरोध

महापालिका प्रशासनाने राजापेठ येथे नवीन कचरा डेपो सुरू केला आहे. अमरावती शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या जागेवर व्यापारी संकुल उभारून पालिकेला उत्पन्नाचा नवा स्रोत मिळू शकला असता. मात्र, त्याच जागेवर कचरा डेपो सुरू केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. हा नवीन कचरा डेपो राजापेठ पोलीस ठाणे, मनपाचे व्यापारी संकुल आणि झोन कार्यालयाच्या अगदी…

Read More

रुग्णवाहिकेला चालक नाही अन् रस्ता खराब:मृत्यूशी झुंजणाऱ्या महिलेला दुचाकीवर नेले, उपचारादरम्यान दुर्दैवी अंत; गडचिरोलीतील घटना

गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात अजूनही रस्त्यांची बिकट परिस्थिती असल्याचे समोर आले आहे. तसेच दळणवळणाचीही दुरावस्था दिसून येत आहे. याचाच फटका एका महिलेच्या जिवावर बेतला आहे. वेळेवर उपचार तसेच रुग्णवाहिका न मिळाल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या महिलेला वाचवण्यासाठी तिला दुचाकीवरून आरोग्य केंद्रात नेण्याची वेळी आली होती. त्यानंतर या महिलेला पुढील उपचारासाठी…

Read More

SpaceX IPO on Nasdaq | Musk Worlds First Trillionaire?

न्यूयॉर्क6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक जगातील सर्वात श्रीमंत व्यावसायिक एलॉन मस्क यांची रॉकेट कंपनी स्पेसएक्स आज, 12 जून रोजी अमेरिकन शेअर बाजार नॅसडॅकवर सूचीबद्ध होईल. गुरुवारी कंपनीने आपल्या आयपीओची अंतिम किंमत 135 डॉलर निश्चित केली आहे. 1.77 ट्रिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 168 लाख कोटी रुपयांच्या मूल्यांकनावर होणाऱ्या या लिस्टिंगनंतर एलॉन मस्क जगातील पहिले ट्रिलिनियर बनू शकतात….

Read More

राज्यात पुन्हा 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा:ठाकरे गटातील अनेक जण आमच्या संपर्कात, एकनाथ शिंदे योग्य वेळी ठरवतील – संजय शिरसाट

ठाकरे गटाचे काही खासदार आणि आमदार राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या वृत्ताने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना उधाण आले आहे. या संभाव्य राजकीय भूकंपावर शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी मोठे सूचक विधान केले आहे. “आमच्या संपर्कात सध्या अनेकजण आहेत. जेव्हा ऑपरेशन टायगर करायचे, तेव्हा…

Read More

हिंगोलीत जागा शासनाची आणि नागरिकांची पक्की घरे:125 जणांना जमीन मिळाली कशी? याबाबत कागदपत्रे सादर करण्याचे आदेश

हिंगोली शहरातील उच्चभ्रू वसाहती भागात जमिनीचे पीआर कार्ड शासनाच्या नावाचे असताना त्यावर नागरिकांनी घरे उभे केल्याची चित्र आहे यावरून उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी 125 जणांना नोटीस बजावले आहेत. या प्रकरणात कागदपत्रे सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत हिंगोली शहरात महसूल विभागाच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम जोरात सुरू केले जाणार आहे त्यानुसार जिल्हाधिकारी राहुल गुप्ता…

Read More

मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर उद्रेक होईल:सरकारच्या बुडाखाली आग लावणारे आंदोलन असेल, रविकांत तुपकरांचा सरकारला इशारा

“माझे पाच दिवसांचे अन्नत्याग आंदोलन कोणत्याही आमदारकी किंवा खासदारकीच्या स्वार्थासाठी नव्हते, तर राज्यातील पिचलेल्या बळीराजाला न्याय मिळवून देण्यासाठी होते. मंत्री गिरीश महाजन यांच्या शब्दाला मान देऊन आणि मुख्यमंत्र्यांच्या सकारात्मक बैठकीच्या आश्वासनानंतर मी उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. मात्र, सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा किंवा आम्हाला गृहित धरण्याचा प्रयत्न केला, तर गावागावांतील शेतकरी हातात गोफण घेऊन रस्त्यावर…

Read More