Headlines

Kangana Ranaut Slams Rahul Gandhi Marriage Rumors; Calls Politics Shameful

4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बॉलिवूड अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशातील मंडीच्या खासदार कंगना रणौत राहुल गांधींसोबत लग्नाच्या अफवांवर संतापल्या. खरं तर, एका मीम पेजने राहुल गांधी आणि कंगना रणौत यांच्या नावाने एक आक्षेपार्ह आणि बनावट पोस्ट शेअर केली होती. यावर कंगनाने तीव्र नाराजी व्यक्त करत ट्रोलर्सना उत्तर दिले आहे. ‘राजकारणात महिलांसाठी प्रतिष्ठा नाही’ मीम पेजने कंगना…

Read More

पाणीटंचाई व घरकुल आढावा बैठकीस गैरहजर राहणे भोवले:तीन ग्रामसेवक तडकाफडकी निलंबित, सीईओ विवेक गायकवाड यांचे आदेश

हिंगोली पंचायत समितीमध्ये आयोजित पाणीटंचाई आढावा बैठक व घरकुल योजनेच्या बैठकीस गैरहजर राहणाऱ्या तीन ग्रामसेवकांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून त्यांच्या निलंबनाचे आदेश बुधवारी तारीख 29 जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी काढले आहे. या कारवाईमुळे ग्रामसेवक संघटनेत एकच खळबळ उडाली आहे. हिंगोली जिल्ह्यात सध्या पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. या…

Read More

तडवळच्या कारखान्याने बाराबाकी येथे पाठवलेली साखर बनारसमध्ये विकली:बनावट कागदपत्रांद्वारे साखर वाहतूक, 18.47 लाखांचा गंडा‎

शुगर फॅक्टरीची साखर वाहतूक करतो म्हणून दोघा अज्ञातांनी बनावट वाहन कागदपत्रे, वाहनाचा बनावट क्रमांक आणि फास्टॅगचा वापर करून तब्बल १८.४७ लाखांची साखर लंपास केली होती. विजयनगरच्या ट्रान्स्पोर्टमार्फत तडवळ (ता. अक्कलकोट) येथील ओंकार कारखान्याची साखर बाराबकी (उत्तर प्रदेश) येथील बिस्कीट कंपनीस पोहोचवतो म्हणून ट्रान्स्पोर्ट मालकाचा विश्वास संपादन करून हा डल्ला मारला होता. अक्कलकोट दक्षिण पोलिसांत फेब्रुवारी…

Read More

आता असेल ‘मराठी’ बाणा तरच मिळणार रिक्षा-टॅक्सीचा परवाना:1 मेपासून रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी सक्ती, असा निर्णय घेणारे महाराष्ट्र देशातील तिसरे राज्य

येत्या १ मे म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून राज्यातील सर्व रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठी भाषा बोलता, लिहिता येणे सक्तीचे करण्यात आले आहे. मराठी लिहिता-वाचता येणार नाही त्यांचे परवाने थेट रद्द होतील, असे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले. मराठी सक्तीचा नियम यापूर्वीही होता. पण चालकाला समज देऊन सोडून दिले जात होते. भाषा सक्तीसाठी परवाना रद्दचा निर्णय घेणारे…

Read More

विजय यांनी 24 तासांत ज्योतिषाला OSD पदावरून हटवले:सहयोगी-विरोधकांनी विरोध केला होता; अभिनेत्याच्या CM बनण्याची भविष्यवाणी केली होती

तामिळनाडूमध्ये फ्लोअर टेस्ट पास केल्यानंतर काही तासांतच मुख्यमंत्री विजय यांनी ज्योतिषी राधन पंडित यांना विशेष कर्तव्य अधिकारी (OSD) पदावरून हटवले. विजय यांनी त्यांना पदावरून हटवण्याच्या २४ तास आधीच ही जबाबदारी दिली होती, परंतु विरोधक आणि मित्रपक्षांच्या विरोधामुळे त्यांना हा निर्णय मागे घ्यावा लागला. राधन हे दीर्घकाळापासून विजय यांचे जवळचे मानले जातात. त्यांनी विजय मुख्यमंत्री होतील…

Read More

भातकुलीतील बोरखडी, इस्माइलपुर ठरले:स्वगणना पूर्ण करणारे जिल्ह्यातील पहिले गाव

अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील बोरखडी बुजुर्ग आणि इस्माईलपूर या दोन गावांनी १०० टक्के स्वगणना पूर्ण करून जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. ही दोन्ही गावे स्वगणना पूर्ण करणारी जिल्ह्यातील पहिली गावे ठरली आहेत. भारत सरकारच्या जनगणना विभागाने महाराष्ट्र दिनापासून (१ मे) स्वगणना सुरू केली आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नागरिकांना स्वगणना पूर्ण करण्याचे आवाहन केले होते. या…

Read More

महिला आरक्षणाचे डमरू वाजवून कोणाला फसवताय?:जुन्या ट्वीटची आठवण करून देत संजय राऊतांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर घणाघात

पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांसारख्या संवैधानिक पदांवर बसलेल्या व्यक्तींनी जनतेशी सत्य बोलण्याची शपथ घेतलेली असते. मात्र, महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर सत्ताधारी सातत्याने जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. “२०२३ मध्येच संसदेत नारी शक्ती अधिनियम मंजूर झाला आणि १६ एप्रिल रोजी त्याची अधिसूचनाही निघाली, मग आता पुन्हा…

Read More

भोंदू मनोहर भोसलेच्या पापाचा घडा भरला!:शेतकऱ्याला 41 हजारांना लुटले, फसवणूक केल्याप्रकरणी करमाळ्यात तिसरा गुन्हा दाखल

भोंदू मनोहर भोसलेच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली असून, मुतखडा पूर्णपणे बरा करण्याचे आमिष दाखवून एका शेतकऱ्याची 41 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यासह तीन सहकाऱ्यांविरुद्ध करमाळा पोलिस ठाण्यात तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करमाळा तालुक्यातील घोटी येथील फिर्यादी शेतकरी दिलीप अजिनाथ राऊत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मार्च 2025 पासून सुरू असलेल्या मुतखड्याच्या त्रासावर वैद्यकीय…

Read More

सोहराबच्या भूमिकेवर रणवीर म्हणाला- त्याला फक्त अटेंशन हवे:रजत कपूरच्या चित्रपटात वास्तविक जीवनाशी संबंधित पात्रे, विनय पाठक म्हणाले- बदल आवश्यक आहे

‘एव्हरीबडी लव्हज सोहराब हांडा’ या चित्रपटाबद्दल रजत कपूर, विनय पाठक आणि रणवीर शौरी यांनी दैनिक भास्करशी संवाद साधला. रजत कपूर यांनी चित्रपटात अभिनय करण्यासोबतच तो लिहिला, दिग्दर्शित केला आणि अप्लॉज एंटरटेनमेंटसोबत त्याची निर्मिती केली आहे. त्यांनी सांगितले की सोहराब हांडा हे असे पात्र आहे जे प्रत्येकाचे लक्ष वेधून घेते. रणवीर शौरी आणि विनय पाठक यांनी…

Read More

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी:कर्जमाफी योजनेला EC ची मंजुरी, आचारसंहिता काळात योजना राबवण्याचा मार्ग मोकळा

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. विधानपरिषद निवडणुकीमुळे लागू झालेल्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफीची प्रक्रिया रखडण्याची चर्चा सुरू होती. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने या योजनेला मंजुरी दिल्याने कर्जमाफीच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे 30 जूनपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात ‘दिलासा’ पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्रात सध्या विधान परिषदेची धूम सुरू आहे. त्यामुळे राज्यात निवडणूक…

Read More