कापूस बियाणे लुटीवरील केंद्राचे उत्तर म्हणजे वेळकाढूपणा:शेतकरी नेते विजय जावंधिया यांचा आरोप; तांत्रिक आकडेवारीने वेळ मारून नेल्याचा आरोप
भारतातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची बियाण्यांच्या नावाखाली मोठी आर्थिक लूट होत असल्याचा गंभीर आरोप शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते विजय जावंधिया यांनी केला आहे. या संदर्भात त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून जाब विचारला होता. मात्र, त्यावर केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून मिळालेले उत्तर अत्यंत निराशाजनक, मूळ प्रश्नांना बगल देणारे आणि केवळ वेळकाढूपणाचे आहे, असा घणाघात जावंधिया…