Headlines

पाणीटंचाईचे लोण आता मेळघाटच्या पायथ्याशी; अचलपुरातही पाणीटंचाई:चंद्रभागा धरणावरून येणाऱ्या पाण्याचा दाब कमी‎




प्रतिनिधी | अचलपूर चंद्रभागा धरणावरून पाण्याचा दाब कमी झाल्याने मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या परतवाडा-अचलपुर या जुळ्या शहरातही गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शहराच्या टंचाईग्रस्त भागात नगरपालिकेतर्फे टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. चंद्रभागा धरणावरून येणाऱ्या पाण्याचा दाब सध्या प्रचंड कमी झाला आहे. परिणामी अचलपूर शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. जलवाहिनीत कमी दाबाने पाणी येत असल्याने शहरातील अनेक भागांचा नियमित पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. नगरपालिकेच्या माहितीनुसार, कालव्यातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह कमी झाल्याने देवगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रातून येणाऱ्या पाण्याने जलकुंभ पूर्ण क्षमतेने भरता येत नाहीत. त्यामुळेच काही प्रभागांमध्ये अत्यल्प दाबाने पाणीपुरवठा होत आहे, तर काही भागात दोन ते तीन दिवसांपासून पाणीपुरवठा चक्क बंद असल्याची परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर अचलपूर नगरपालिकेने तातडीने उपाययोजना करत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. ज्या भागात पाण्याची तीव्र टंचाई आहे, त्या परिसरात टँकर पाठवून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी जलसंपदा विभागाशी समन्वय साधून आवश्यक तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी मुख्याधिकारी धीरज गोहाड, अभियंता मनिष शर्मा, जलसंपदा अभियंता चिरायु मनोहर, नगरसेवक राज पाटील यांनी धरण स्थळी भेट देऊन आवश्यक तांत्रीक बाबी जाणून घेतल्या. त्याचप्रमाणे देवगांव येथील जलशुध्दीकरण केंद्रावरील तांत्रीक बाबी जाणून घेत सबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती उपाययोजना करण्याबाबत सुचना केल्या. तर दुसरीकडे पाणी समस्येवर काम सुरू असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.तर काही भागात दोन ते तीन दिवसांपासून पाणीपुरवठा चक्क बंद असल्याची परिस्थिती आहे. प्रशासनाकडून उपाययोजनेवर भर चंद्रभागा धरणावरून येणाऱ्या पाण्याचा दाब कमी झाल्यामुळे तात्पुरती पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नागरिकांना कमी त्रास व्हावा यासाठी पालिकेकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. जलसंपदा विभागाशी सतत संपर्क ठेवून तांत्रिक अडचणी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या भागात पाणीपुरवठा पूर्णपणे बंद आहे, त्या भागांना प्राधान्याने पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे. ब्राम्हणसभा सह इतर भागातील पाणीटंचाईसाठी लवकरच कायमस्वरुपी तोडगा काढल्या जाईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *