Headlines

विधान परिषदेच्या नवनिर्वाचित 10 आमदारांचा शपथविधी:सभापती राम शिंदे यांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ; भाजपचे सर्वाधित 6 आमदार

महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्विवार्षिक आणि पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडून आलेल्या १० नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा आज विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात दिमाखात पार पडला. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी या सर्व नवनियुक्त आमदारांना सदस्यत्वाची शपथ दिली. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील महत्त्वाचे सदस्य उपस्थित होते. विधान परिषदेच्या एकूण…

Read More

पुण्यातील दुर्घटनेनंतर राज्य सरकारचे कठोर पाऊल:विषारी दारूच्या दुर्घटनांना चाप; राज्यात मिथेनॉलच्या खासगी वितरणावर बंदी

पुण्यातील दापोडी आणि हडपसर परिसरात २८ मे रोजी मिथेनॉलमिश्रित गावठी दारूचे सेवन केल्याने १५ जणांचा बळी गेला. या धक्कादायक घटनेनंतर राज्य सरकारने अखेर कठोर पाऊल उचलण्याची तयारी सुरू केली आहे. गावठी आणि बनावट दारूमध्ये सर्रास वापरल्या जाणाऱ्या मिथेनॉलच् . मिथेनॉल (मिथाइल अल्कोहोल) हा पेट्रोलियमजन्य रासायनिक पदार्थ प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी परवानाधारक पद्धतीने विकला जातो. सध्या यावर…

Read More

विधान परिषद निवडणूक: भाजपमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच:काँग्रेसची 22 मे रोजी मुंबईत बैठक, महायुतीकडे 251 जागा, मविआकडे 152

विधान परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षात उमेदवारीसाठी तीव्र रस्सीखेच सुरू आहे. तर काँग्रेसने आपला उमेदवार निश्चित करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली २२ मे रोजी मुंबईत बैठक बोलावली आहे. या बैठकीला जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ नेत्यांना निमंत्रित करण्यात आले आहे. पक्षीय बलाबलानुसार, भारतीय जनता पक्षाकडे सर्वाधिक १५० मतदार…

Read More

पंढरपूर विकास आराखड्याच्या कामास गती द्या:वारकऱ्यांना अडचणी येणार नाही याची काळजी घ्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

आषाढी वारी काळात निघणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळण्यासाठी दोन्ही पालखी मार्गावरील पालखीतळे अधिक चांगली व सुविधायुक्त करण्यात यावीत, वारकरी भाविकांना अडचणी येऊ नयेत याची दक्षता घ्यावी तसेच पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना व स्थानिक नागरिकांना पायाभूत सुविधा मिळाव्यात यासाठी पंढरपूर विकास आराखड्याच्या कामास गती…

Read More

साताऱ्यात अवकाळी पावसाचा तडाखा:विज पडून 18 मेंढ्यांचा मृत्यू; जिल्हा रुग्णालयात झाडे कोसळली, महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

सातारा जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केले. वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि काही भागांत गारांसह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती, पशुधन आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी नागरिकांची तारांबळ उडाली असून प्रशासनाकडे नुकसानभरपाईची मागणी करण्यात येत आहे. तालुका सातारा येथील कोंडवे गावात विजेचा तडाखा बसून १८ मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी…

Read More

महिलेची 21 लाखांची फसवणूक:विवाह संकेतस्थळावरील ओळखीने बसला गंडा

पुण्यात विवाहविषयक संकेतस्थळावर झालेल्या ओळखीमुळे एका महिलेची २१ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपीने विवाहाचे आमिष दाखवून महिलेकडून पैसे घेतले आणि परत करताना खेळण्यातील बनावट नोटा देऊन पळ काढला. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात एका ३२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार,…

Read More

पंजाब आणि चंदीगडमध्ये भूकंपाचे धक्के:रात्री 10:04 वाजता जमीन हादरली, लोक घरातून बाहेर पडले

पंजाब आणि चंदीगडमध्ये शुक्रवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. रात्री सुमारे 10 वाजून 4 मिनिटांनी आलेल्या धक्क्यांमुळे अनेक लोक आपापल्या घरातून बाहेर पडले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.3 नोंदवली गेली. भूकंपाचे केंद्र हिमाचल प्रदेशातील धर्मशालाजवळ असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, सध्या कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. दोन महिन्यांपूर्वीही पंजाब, चंदीगड आणि हिमाचलमध्ये भूकंप…

Read More

वेरूळला 51 जोडप्यांच्या हस्ते होणार अभिषेक:सोहळ्यासाठी कोल्हापूरहून आणल्या सिंहासनारूढ शिवरायांच्या 51 मूर्ती‎

वेरूळ स्वराज्याची संकल्पभूमी व पितृतीर्थ श्रीक्षेत्र वेरूळ येथील मालोजीराजे भोसले गढीवर ३५२ वा शिवराज्याभिषेक सोहळा शनिवार (६ जून) रोजी उत्साहात साजरा होणार असल्याची माहिती स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी दिली. शहाजीराजे भोसले स्मारकासमोर सकाळी ८ वाजता या सोहळ्याचे आयोजन केले असून या वेळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील ५१ मान्यवर जोडपी सपत्नीक…

Read More

पांडुरंगाच्या भक्तीत लीन झाल्यावर जाती,कुळाचे बंधन नष्ट होते- रामदास महाराज:शिऊर येथील संत शिवाई मंदिरात निळोबा महाराज गाथा पारायणाची सांगता‎

देवाची अनन्य भक्ती करताना व पांडुरंगाच्या भक्तीत लीन झाल्यावर संतांचे सांसारिक जाती व कुळाचे बंधन पूर्णपणे नष्ट होते. ईश्वरभक्तीत एवढी तल्लीनता असते की त्यांना समाज किंवा नात्यागोत्यांनी दिलेल्या लौकिक दर्जाची किंवा भेदाभेदाची कोणतीही पर्वा नसते, असे प्रतिपादन रामदास महाराज पवार यांनी शिऊर येथे केले. संत शिवाई मंदिरात अधिक मासानिमित्त श्री संत निळोबा महाराज गाथा पारायण…

Read More

जिल्ह्यात 2.42 लाख विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, 15 ते 20 मे या कालावधीत पाठ्यपुस्तके पोहोचणार; जिल्ह्यातील शाळांमध्ये वाटप‎

यंदाच्या शैक्षणिक सत्र २०२६ – २७ मध्ये बुलडाणा जिल्ह्यातील २,१४१ शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या एकूण दोन लाख ४२ हजार ७५५ विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे शाळा स्तरावर वितरण करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तरीय शिक्षण विभागाच्या वतीने बालभारती पोर्टलवर पुस्तकांची मागणी एप्रिल मध्ये नोंदवली आहे. पुस्तका अभावी शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहू नये,…

Read More