Headlines

अक्कलकोटमध्ये स्वामीनामाचा गजर लिखित नामजप ग्रंथांची निघाली दिंडी:विश्वशांतीसाठी प्रार्थना, राज्यभरातून आलेल्या ग्रंथांचे स्वामी चरणी अर्पण‎

श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन ते पुण्यतिथी महोत्सवाचे औचित्य साधून अक्कलकोट नगरीत ‘ओम श्री स्वामी समर्थ’ नामाचा महाघोष ऐकायला मिळाला. समर्थ नगरी परिवाराच्या वतीने राज्यभर राबवण्यात आलेल्या लिखित नामजप सोहळ्यातील ग्रंथांची बुधवारी भव्य दिंडी मिरव . बुधवारी सायंकाळी ५ वाजता श्री खंडोबा मंदिर येथे या सोहळ्याला प्रारंभ झाला. सुधाकर महाराज इंगळे, सैदप्पा इंगळे, वनिताताई…

Read More

कर्जमाफीचे काय झाले; आमदार ‎सत्तारांचा राज्य सरकारला प्रश्न‎:मुख्यमंत्र्यांना पत्र देऊनही स्पष्टीकरण नसल्याचा दावा‎

नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी ३१ मार्च‎‎रोजी कर्ज भरले‎‎नसल्यामुळे आता ते‎‎थकबाकीदार झाले आहेत.‎‎ कर्जमाफीची तारीख‎‎ जून ऐवजी सप्टेंबर ‎‎ठेवल्यामुळे ‎मराठवाड्यातील १० लाख अतिवृष्टग्रस्त ‎शेतकरी या कर्जमाफीपासून वंचित राहणार‎ असल्याची माहिती माजी कृषीमंत्री अब्दुल‎ सत्तार यांनी दिली. जाहीरनाम्यात दिलेल्या‎ कर्जमाफीच्या वचनाचे काय झाले, असा प्रश्न ‎शेतकरी विचारत असल्याचेही त्यांनी‎ सांगितले.‎ कर्जमाफीबाबत अद्याप निकषच स्पष्ट‎करण्यात आले नाहीत. त्यामुळे…

Read More

परळी वैजनाथच्या 301.54 कोटींच्या विकास आराखड्याला मंजुरी:पंकजा मुंडेंनी मानले फडणवीसांचे आभार; तीर्थक्षेत्राच्या विकासाला गती

बीड जिल्ह्यातील पवित्र परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. परळी वैजनाथ परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी 301.54 कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे परळी परिसराचा मोठ्या प्रमाणात कायापालट होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली…

Read More

वादळाने वीज यंत्रणेचे नुकसान; पुरवठा खंडित, शहरातही फटका:मध्यरात्री शहरात तर तिवसा परिसरात दुपारी हलक्या पावसाची हजेरी‎

मागील तीन ते चार दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाला आहे. त्या बदलामुळे उष्णतेच्या चटक्यांपासून अमरावतीकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र शुक्रवारी ८ मे रोजी मध्यरात्री झालेल्या वादळामुळे शहरासह जिल्ह्यातील काही भागात वीज यंत्रणेला फटका बसला होता. त्यामुळे संबधित ठिकाणचा वीजपुरवठा खंडीत झाला होता. दरम्यान शनिवारी ९ मे रोजी दुपारी तिवसा, गुरूदेवनगर, खोलापूर भागात वादळामुळे काही नुकसान…

Read More

महालक्ष्मी सरसमध्ये हिंगोलीच्या बचत गटांवर लक्ष्मी प्रसन्न:मसाल्यांसह हळद पावडरला ग्राहकांची मोठी पसंती, आता रविवारपर्यंत खरेदीची संधी

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियानातंर्गत मुंबईत सुरु असलेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनामध्ये हिंगोलीच्या बचतगटांना लक्ष्मी प्रसन्न झाली असून 12 दिवसांत तब्बल 10 लाखांची उलाढाल झाली आहे. या शिवाय तुरडाळ, हळद लोणच्याची ऑर्डर देखील मिळाली आहे. तर आता या प्रदर्शनाची मुदतही रविवारपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने खरेदी विक्रीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यात उमेद अभियानांतर्गत स्थापन…

Read More

‘रामायण: पार्ट वन’ ची प्रदर्शनाची तारीख बदलू शकते:दावा – चित्रपट दिवाळी 2026 च्या एक आठवडा आधी 30 ऑक्टोबर रोजी येऊ शकतो

रणबीर कपूर अभिनीत ‘रामायण: पार्ट वन’ हा चित्रपट दिवाळी 2026 (8 नोव्हेंबर) च्या एक आठवडा आधी प्रदर्शित होऊ शकतो. खरं तर, बॉलिवूड हंगामाच्या एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, ‘रामायण: पार्ट वन’ आता 30 ऑक्टोबर 2026 रोजी प्रदर्शित होऊ शकतो. यापूर्वी तो दिवाळी 2026 ला प्रदर्शित करण्याची योजना होती. रिपोर्टनुसार, निर्मात्यांना हा चित्रपट दिवाळीच्या…

Read More

शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; ब्रीच कँडीमध्ये वैद्यकीय तपासण्या सुरू:तब्येत बिघडली का? सूत्रांनी दिली महत्त्वाची माहिती

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असले तरी, प्राथमिक माहितीनुसार काळजी करण्यासारखी कोणतीही परिस्थिती नसल्याचे सांगण्यात येत आहे. नियमित वैद्यकीय तपासणीसाठीच शरद पवार रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्या काही महत्त्वाच्या…

Read More

कांतारा मिमिक्री वाद:कर्नाटक उच्च न्यायालयाने रणवीर सिंहचे माफीपत्र स्वीकारले, 4 आठवड्यांच्या आत चामुंडेश्वरी मंदिरात जाऊन माफी मागावी लागेल

कांतारा चित्रपटात दाखवलेल्या देवतेला भूत म्हटल्याने कायदेशीर अडचणीत सापडलेल्या रणवीर सिंहला कर्नाटक उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने अभिनेत्याचे माफीपत्र स्वीकारले आहे, मात्र अभिनेत्याने 4 आठवड्यांच्या आत चामुंडेश्वरी मंदिरात जाऊन माफी मागावी अशी अट ठेवली आहे. 25 एप्रिल रोजी रणवीर सिंगने प्रतिज्ञापत्रात माफीपत्राचा समावेश केला होता. तेव्हा न्यायालयाने यावर विचार करण्यासाठी वेळ…

Read More

एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘मसुदा समिती’ स्थापन:80 लाख एकल महिलांना होणार लाभ, स्वतंत्र धोरण आणणारे महाराष्ट्र देशातील पहिलेच राज्य

राज्यातील विधवा, घटस्फोटित, परितक्त्या आणि अविवाहित अशा एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, कायदेशीर, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक प्रश्नांना न्याय देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या महिलांच्या सर्वंकष सक्षमीकरणासाठी सरकारने “एकल महिला धोरण मसुदा समिती” स्थापन केली आहे. असे स्वतंत्र धोरण आणणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य ठरणार आहे. “साऊ एकल महिला समिती”चे राज्य…

Read More

सेनगावमध्ये भररस्त्यात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लंपास:पोलिसांकडून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल

सेनगाव शहरात सोमवारी रात्री साडेसात वाजता बसस्थानक परिसरात एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मनी मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी सेनगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्योती व्यंकटेश खुनेर (वय 30, रा. गंगाखेड) या गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्या माहेरी सेनगाव येथे आल्या आहे. सोमवारी रात्री 7:30 वाजेच्या…

Read More