Headlines

मुव्ही रिव्ह्यू – ‘बंदर’:बॉबी देओलची दमदार कामगिरी, पण कमकुवत पटकथा आणि असंतुलित दृष्टिकोन चित्रपटाला मागे खेचतो

अनुराग कश्यपच्या चित्रपटांकडून नेहमीच अपेक्षा असते की ते सोपे प्रश्न विचारणार नाहीत. ‘बंदर’ हा चित्रपटही अशाच एका विषयावर आधारित आहे, ज्यावर दीर्घकाळ चर्चा होऊ शकते. एका उतरत्या कलाकारावर आणि गायकावर लागलेला गंभीर आरोप, सोशल मीडियाचे न्यायालय आणि तुरुंगातील जग. हे सर्व ऐकायला खूपच रंजक वाटते. पण अडचण तेव्हा सुरू होते जेव्हा चित्रपट एका गुंतागुंतीच्या विषयाला…

Read More

आसाममधील एका मतदान केंद्रावर आज पुन्हा मतदान:बंगालमध्ये मोदींच्या 3 सभा; PM मुर्शिदाबाद हिंसाचारातील पीडित कुटुंबालाही भेटतील

असममधील श्रीभूमी जिल्ह्यात करीमगंज (उत्तर) विधानसभा मतदारसंघातील २३९-बेबीलँड हाय इंग्लिश स्कूल मतदान केंद्रावर आज पुन्हा मतदान होणार आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होईल. भाजप आणि काँग्रेस समर्थकांमध्ये झालेल्या संघर्षांनंतर पुन्हा निवडणुकीचा आदेश देण्यात आला आहे. या जागेसाठी १४ उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान मोदींच्या तीन सभा होणार आहेत. सर्वात आधी…

Read More

गंगापूर बाजार समितीमध्ये कांद्याला प्रति क्विंटल 4500 रुपयांचा भाव:दररोज 500 वाहनांची गर्दी; शेजारी नेवासा, येवला तालुक्यातून येतोय कांदा‎

मागील काही दिवसांपासून गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये कांद्याला कमाल ४५०० ते सरासरी ३४५१ रुपयांचा भाव मिळत असल्यामुळे तालुक्यासह परिसरातील शेतकरी दररोज ४०० ते ५०० वाहनांच्या माध्यमातून कांदा विक्रीसाठी आणत आहे. यासंदर्भात माहिती देताना सभापती अर्चना कृष्णा सुकासे यांनी सांगितले की, गंगापूर मार्केटमध्ये शेतकऱ्यांना मिळत असलेल्या समाधानकारक भावामुळे शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात कांदा…

Read More

"मांगी''च्या पाण्यासाठी रोखला रस्ता‎:पावसाळी अधिवेशनानंतर बैठक घेऊन तोडगा काढू

करमाळा तालुक्यातील मांगी तलावातील पाणी हळगाव (ता. जामखेड) येथील कृषी विद्यापीठाला देण्याच्या शासन निर्णयाविरोधात सोमवारी मांगी येथे ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करत निषेध व्यक्त केला. शासनाने काढलेला जीआर तत्काळ रद्द न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा या वेळी देण्यात आला. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी पाणी आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे अशा…

Read More

40 दिवसांत 4 फुटांचे झाले बाबा बर्फानी:अमरनाथ यात्रेचा दुसरा दिवस, 23 मे रोजीच्या पहिल्या फोटोत आकार 7 फूट होता

अमरनाथमध्ये तयार होणाऱ्या पवित्र शिवलिंगाचा आकार कमी होऊन केवळ 4 फूट राहिला आहे. 23 मे रोजी BSF जवानांनी जारी केलेल्या फोटोमध्ये शिवलिंगाचा आकार तब्बल 7 फूट होता. 29 जून रोजी पहिल्या पूजेच्या दिवशीही हिमलिंगाची उंची 5 फुटांपेक्षा जास्त होती. 3 जुलै रोजी समोर आलेल्या फोटोमध्ये हिमलिंग केवळ 4 फुटांचे दिसत आहे. त्याची रुंदीही कमी झाली…

Read More

साधनेला वैराग्याची झालर आवश्यक ती भाग्याची प्रतीक- संजय महाराज:श्रीराम महाराज मेहुणकर जन्मशताब्दीनिमित्त अंत्री मलकापूरला आयोजन‎

समस्त संतांनी वैराग्याला भाग्याचे प्रतीक मानले आहे. वैराग्य हे भाग्यशाली व्यक्तीलाच प्राप्त होते, असे तुकोबाराय म्हणत. कारण कोणत्याही साधनेचा मुख्य पाया वैराग्यच आहे. साधना कोणतीही करा. कशाचीही करा. त्याला वैराग्याच्या झालरची आवश्यकता असते. तरच त्या साधनेचे आपण अधिपती होऊ शकू. संप्रदायातील सर्वात मोठी तपश्चर्या वैराग्य आहे. म्हणून संतांसाठी वैराग्य हे भाग्याचे परिचायक आहे. ते संतसंगतीमुळे…

Read More

Bank Strike Update | UFBU 5-Day Banking Protest & PLI Scheme Controversy

काही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक देशभरातील बँक कर्मचारी आणि अधिकारी सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये संपावर जाऊ शकतात. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने त्यांच्या दोन प्रमुख मागण्यांसाठी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात टप्प्याटप्प्याने देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. बँक युनियन्सची मुख्य मागणी म्हणजे आठवड्यातून 5 दिवस कामाला मंजुरी देणे आणि सरकारने लागू केलेली नवीन परफॉर्मन्स-लिंक्ड इन्सेंटिव्ह (PLI)…

Read More

Sujat Ambedkar Attacks Sharad Pawar; Claims Alliance With BJP Since 2014

भारतीय जनता पक्ष जेव्हापासून सत्तेत आला आहे, तेव्हापासून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम मोठ्या प्रमाणावर केले जात आहे. ‘फोडा आणि राज्य करा’ ही ब्रिटिशांच्या काळातील पॉलिसीच भाजपा राबवत आहे, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबे . सुजात आंबेडकर म्हणाले की, 2014 मध्ये उद्धव ठाकरे यांना मजबूर करून भाजपासोबत जाण्यास शरद पवारांनीच…

Read More

महत्त्वपूर्ण घोषणा:राज्य एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5% वाढ, घरभाडे भत्त्याच्या थकबाकीसाठी 100 कोटींची तरतूद

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) सुमारे ८६ हजार कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी राज्य सरकारने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता ५३ टक्क्यांवरून थेट ५८ टक्के करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रतापराव सरनाईक यांनी केली. याशिवाय, कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्याच्या थकबाकीसाठी १०० कोटी रुपयांची…

Read More

गडचिरोलीतील मायनिंगवर आदित्य ठाकरेंचा स्फोटक आरोप:टायगर कॉरिडॉर उद्ध्वस्त करण्याचा डाव; वन विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

गडचिरोली जिल्ह्यात प्रस्तावित असलेल्या खाण प्रकल्पावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. गडचिरोलीतील काही भागांमध्ये आपल्या जवळच्या उद्योगपतींना लाभ मिळावा यासाठी खाणकाम प्रकल्पांना परवानगी दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. विशेष म्हणजे हा प्रकल्प संरक्षित वाघ मार्गिकेच्या परिसरात येत असल्याचा दावा करत त्यांनी हा निर्णय तातडीने रद्द करण्याची…

Read More