Headlines

पैठण एमआयडीसीमधील केमिकल कंपनीमध्ये स्फोट; 2 कामगार भाजले:अक्रवीस लाइफ सायन्स प्रा. लिमिटेडमधील घटना, जीवितहानी नाही‎

पैठण एमआयडीसी परिसरातील अक्रवीस लाइफ सायन्स प्रा. लि. या केमिकल कंपनीत सोमवारी दुपारी ३ वाजता रिअॅक्टर फुटल्याची घटना घडली. या दुर्घटनेत कंपनीतील दोन कामगार गंभीररीत्या भाजले. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीतील उत्पादन प्रक्रियेदरम्यान अचानक रिअॅक्टरमध्ये स्फोट झाला. यावेळी मोठ्या प्रमाणात केमिकल उडाले. ते कामगार स्वामी कणसे…

Read More

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाईकवरून विधानभवनात दाखल:गडकरींकडूनही ताफ्यात 50 टक्के कपात; इंधन बचतीसाठी मोठं पाऊल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीबाबत केलेल्या आवाहनानंतर राज्यातील सत्ताधारी नेत्यांकडूनही त्याची अंमलबजावणी सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज स्वतः बाईक चालवत विधानभवनात दाखल झाले. मुख्यमंत्री बाईकवरून विधानभवनात पोहोचल्याने राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य नागरिकांमध्येही या निर्णयाची मोठी चर्चा रंगली. इंधन बचत आणि अनावश्यक ताफे कमी करण्याच्या उद्देशाने त्यांनी हा…

Read More

अर्थमंत्र्यांचा इशारा:भारतीय बँकांपुढे एआयचे सायबर संकट, आता बँकांना तातडीने नवी सुरक्षा यंत्रणा उभारावी लागेल

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बँकांच्या प्रमुखांसोबत एका उच्चस्तरीय बैठकीत अँथ्रोपिकच्या ‘क्लाऊड मिथोस’शी संबंधित संभाव्य धोक्यांवर चर्चा केली. त्या म्हणाल्या, ही शक्तिशाली कृत्रिम बुद्धिमत्ता कोणत्याही यंत्रणेत अनधिकृत प्रवेश (हॅक) करू शकते. त्यामुळे या क्षेत्रावरील कोणत्याही सायबर हल्ल्याची ओळख पटवून त्यावर त्वरित कारवाई करू शकेल, अशी नवी सुरक्षा यंत्रणा तातडीने उभी करावी लागेल. पुण्याच्या भारतीय स्टेट बँकेच्या…

Read More

कन्नडच्या रुग्णालयात दररोजची ओपीडी 500 अन् खाटा फक्त 50:उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव 7 वर्षांपासून धूळखात‎

शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांसाठी महत्त्वाचा असलेला उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव ७ वर्षांपासून शासनदरबारी धुळखात पडला आहे. लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे आणि राजकीय इच्छाशक्तीअभावी हा प्रस्ताव प्रलंबित असून, कन्नडकरांना अद्ययावत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. रुग्णालयात रोजची रुग्णसंख्या ५०० आहे. खाटा केवळ ५० आहेत. त्यामुळे अनेकांना उपचारासाठी मोठ्या शहरात धाव घ्यावी लागत आहे. कन्नड रुग्णालय सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावर…

Read More

निदा खान प्रकरणी आश्रय देणाऱ्यांवर कारवाईची शिवसेनेची मागणी:नाशिक लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपीला मदत केल्याचा आरोप

नाशिक येथील महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण आणि बळजबरीने धर्मांतरण प्रकरणी मुख्य आरोपी निदा खान हिला आश्रय देणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेने (शिंदे गट) पोलीस आयुक्तांकडे केली आहे. शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यासह नगरसेवकांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या संदर्भात निवेदन दिले. या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान सुमारे ४० दिवस फरार होती….

Read More

आरक्षणाची सवलत घेणाऱ्यांना आता खुल्या प्रवर्गाचे दरवाजे बंद:महाराष्ट्र सरकारकडून आरक्षणाचे नवीन धोरण जाहीर; भरती प्रक्रियेत होणार बदल

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारी नोकरीतील आरक्षणासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, ज्या उमेदवारांनी आरक्षणाची सवलत घेतली आहे, त्यांना आता खुल्या प्रवर्गातील जागांवर दावा सांगता येणार नाही. केंद्र सरकार आणि गुजरात राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनेही हे आरक्षणाचे नवे धोरण निश्चित केले असून, या निर्णयामुळे राज्य सरकारी नोकरभरतीच्या प्रक्रियेत मोठे बदल होणार आहेत. राज्य सरकारने…

Read More

महाराष्ट्र दिनी संविधान चौकात काळे फुगे सोडले:विधानसभेवर काळा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न; 10 जण अटकेत

महाराष्ट्र दिनानिमित्त नागपुरात विदर्भ राज्य आंदोलन समितीने (विराआस) तीव्र निदर्शने केली. संविधान चौकात काळे फुगे सोडून आणि विधानसभेच्या गेटवर काळा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न करून ‘महाराष्ट्र निषेधदिन’ साजरा करण्यात आला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलन मोडीत काढले आणि 10 कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन सीताबर्डी पोलीस ठाण्यात नेले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मुकेश मासुरकर, ज्योती खांडेकर, गिरीश तितरमारे, तारेश…

Read More

नागपूर पोलिसांचा सायबर गुन्हेगारांना दणका:नागरिकांचे साडेचार कोटी रुपये आणि २३२ मोबाईल केले परत!

नागपूर पोलिसांनी सायबर गुन्हेगारांना मोठा दणका दिला आहे. सायबर फसवणुकीत गमावलेले नागरिकांचे तब्बल ४ कोटी ४९ लाख २४ हजार २६६ रुपये आणि चोरीला गेलेले २३२ मोबाईल आज त्यांना परत करण्यात आले. नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित एका विशेष कार्यशाळेत पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या हस्ते ही रक्कम आणि मोबाईल परत करण्यात आले. या…

Read More

India Crime Rate Drops 6% in 2026; NCRB Report

नवी दिल्ली1 तासापूर्वी कॉपी लिंक देशभरात 2024 मध्ये नोंदवलेल्या गुन्ह्यांच्या संख्येत 6 टक्क्यांनी घट झाली आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो (NCRB) नुसार, 2023 मधील 62.41 लाख प्रकरणांच्या तुलनेत 2024 मध्ये 58.85 लाख प्रकरणे नोंदवली गेली. ही माहिती बुधवारी जारी केलेल्या अहवालात देण्यात आली. अहवालानुसार, गुन्हेगारीचा दर म्हणजेच प्रति एक लाख लोकसंख्येमागे नोंदवलेल्या प्रकरणांची संख्याही कमी…

Read More

156 गावांत जलजीवनची कामे 4 वर्षांपासून अर्धवट‎:योजना मोठी, पण अंमलबजावणी विलंबाने; 3 गावांत काम जागीच‎

गेल्या तीन ते चार वर्षांपासून कन्नड तालुक्यातील जलजीवन मिशनचे काम रखडले आहे. लोकप्रतिनिधी आणि ठेकेदारांच्या दुर्लक्षामुळे पाणीटंचाईने जनता होरपळत आहे. तालुक्यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत २१२ गावांपैकी १७६ गावांत पाणीपुरवठ्याची कामे २०२२ मध्ये सुरू करण्यात आली आहेत. कामे सुरू होऊन चार वर्षे उलटून गेली तरी कामे प्रगतिपथावरच आहेत. तीन गावांत तर काहीच काम झालेले नाही. २९…

Read More