Headlines

Mahavitran Emergency: Call 1912 for Power Outage or Accident

पावसाळ्याला सुरुवात झाल्याने वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसामुळे विद्युत दुर्घटनांचा धोका वाढला आहे. तुटलेल्या विजेच्या तारा, कोसळलेले खांब, ट्रान्सफॉर्मर, फिडर पिलर आणि शॉर्टसर्किटमुळे अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे . महावितरणने दिलेल्या माहितीनुसार, अतिवृष्टी आणि वादळामुळे विजेच्या तारा तुटणे, खांब कोसळणे, ट्रान्सफॉर्मरमध्ये ठिणग्या पडणे किंवा शॉर्टसर्किट होणे अशा घटना घडू शकतात. अशा…

Read More

विधान परिषदेसाठी भाजपचा पहिला उमेदवार ठरला:अमरावतीतून प्रवीण पोटे पाटलांना उमेदवारी जाहीर, उद्या भरणार अर्ज

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ विधान परिषद जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, महायुतीमध्ये जागावाटपाचा पेच अद्याप कायम असतानाच भाजपने आपला पहिला उमेदवार जाहीर केला आहे. अमरावती मतदारसंघातून भाजपने प्रवीण पोटे पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले असून, ते उद्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राज्याचे महसूलमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या…

Read More

वीटभट्टीवरील मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागते:विभागीय आयुक्तांनी समस्या ऐकून उपाययोजना करण्याचे दिले निर्देश

रोजगाराच्या शोधात मेळघाटातून अमरावती परिसरातील वीटभट्ट्यांवर आलेल्या आदिवासी आणि कोरकू मजुरांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. शासकीय नियमांनुसार वीटभट्टीवरच शिक्षणाची सोय उपलब्ध असणे आवश्यक असताना, ती पुरेशी उपलब्ध नसल्याने मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्यासाठी वीटभट्टीवर काम करणाऱ्या मुला-मुलींनी थेट विभागीय आयुक्त नयना गुंडे यांची भेट घेतली. अविनाश बेलसरे,…

Read More

ज्येष्ठ समाजसेवक जनार्दनपंत बोथे यांना पद्मश्री पुरस्कार:राष्ट्रपतींच्या हस्ते ‌नवी दिल्लीत सोमवारी सन्मान

श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ जनार्दनपंत बापूराव बोथे यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाला असून सोमवार, २५ मे रोजी नवी दिल्लीत एका विशेष सन्मान सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान शिक्षण संस्थेची स्थापना : १९७२ मध्ये ‘राष्ट्रसंत श्री…

Read More

खरातने सांगितले मित्र जिवंतय, पण दुसऱ्याच दिवशी मृतदेह सापडला:शिवाजी सहाणेंनी सांगितला किस्सा; दमानियांच्या आरोपांवर स्पष्टीकरण

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणात नाव जाहीर केल्यानंतर माजी आमदार शिवाजी सहाणे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना खरातची भविष्यवाणी कशी फोल ठरली, याचा खुलासा केला आहे. आपला एक मित्र बेपत्ता असताना त्याच्या शोधासाठी आपण खरातशी संपर्क साधला होता. त्यावेळी खरातने तो मित्र सुखरूप असल्याचे सांगितले होते, मात्र दुर्दैवाने दुसऱ्याच दिवशी त्या…

Read More

पुणे शहरात अपघातांचे सत्र:4 ठार, 3 गंभीर जखमी; पुणे-सातारा महामार्ग, बाणेर, केसनंद, खराडी येथे वेगवेगळ्या घटना

पुणे शहरात गेल्या काही दिवसांत वेगवेगळ्या भागांत झालेल्या रस्ते अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनांमध्ये एका तीन वर्षांच्या बालकासह एकूण तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हे अपघात पुणे-सातारा रस्ता, बाणेर, पुणे-अहिल्यानगर रस्ता (केसनंद) आणि खराडी या परिसरांमध्ये घडले आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून अधिक तपास सुरू आहे. पुणे-सातारा…

Read More

गांगुली म्हणाले- मी युसूफ पठाण यांना खासदारकी सोडायला सांगितले नाही:ममता बॅनर्जींनी माझ्यामार्फत कोणताही राजकीय संदेश पाठवला नाही

भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली म्हणाले की, मी ममता बॅनर्जींच्या सांगण्यावरून टीएमसी खासदार आणि माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांना राजीनामा देण्यास सांगितले नाही. ते म्हणाले की, माध्यमांनी अशा अफवांवर आणि अंदाजांवर विश्वास ठेवू नये. 4 जून रोजी बंगालमधील ‘आनंदबाजार पत्रिका’ या वृत्तपत्राने दावा केला होता की, माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी सौरवला सांगितले आहे…

Read More

बंगालमध्ये सीमेवर कुंपण घालण्यासाठी BSF पोहोचली:स्थानिक म्हणाले- आता शांतपणे झोपू शकू, बांगलादेशी आमची पिके कापू शकणार नाहीत

पश्चिम बंगाल सीमेचा 600 किलोमीटरचा एक भाग असा आहे, जिथे बांगलादेशसोबतची सीमा पूर्णपणे खुली आहे. कोणतेही कुंपण नाही. येथे काही दिवसांपूर्वी जेव्हा बीएसएफची टीम सीमा मोजण्यासाठी पोहोचली, तेव्हा गावकर्‍यांनी मिठाई वाटली. हा मुर्शिदाबाद जिल्ह्यातील जलंगी बाजारात शून्य रेषेवर वसलेले सकारपाडा गाव आहे. 4 हजार लोकसंख्या आणि 2500 मतदार. यापैकी 95% लोक शेतीवर अवलंबून आहेत. गावाचे…

Read More

आचारसंहितेचा अडथळा नाही:शेतकरी कर्जमाफी 30 जूनपूर्वी होणार, CM फडणवीस सकारात्मक निर्णय घेतील – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफीची घोषणा 30 जूनपर्यंत अंमलात येणार आहे. सध्या विधानपरिषद निवडणुकीची घोषणा झाली आहे. त्यासाठीची आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे या काळात शेतकरी कर्जमाफी होणार नाही, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, या सर्व चर्चांवर पडदा टाकत कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी मोठी आणि दिलासादायक माहिती…

Read More

संभाजीनगरमध्ये गुन्हेगारीचा कळस:सपासप वार करून अल्पवयीन आरोपीचा 'भाई' स्टाईलने पळ, हत्येचा थरारक VIDEO समोर

घराच्या ओट्यावर बसून तरुणांना वाईट संगतीपासून दूर राहण्याचा सल्ला देणे एका ५० वर्षीय व्यक्तीच्या जीवावर बेतले आहे. मुकुंदवाडी परिसरात एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने चाकूने सपासप वार करून रोहिदास दत्तू खकाळ (वय ५०) यांची अत्यंत निर्घृण हत्या केली. बुधवारी (८ जुलै) मध्यरात्री घडलेल्या या थरारक घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून, आता या हत्याकांडाचा अंगावर काटा…

Read More