महायुतीच्या प्रत्येक मंत्र्याच्या खात्यात भ्रष्टाचार:जनतेला फसवण्याचे नवे फंडे शोधण्यात सरकार व्यस्त, आमदार भास्कर जाधवांची खोचक टीका
महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या प्रत्येक मंत्र्यांच्या खात्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाचेच आमदार सुहास कांदे जे काही बोलले असतील, त्यामध्ये 100 टक्के तथ्य आहे, असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी केला आहे. सरकारच्या भ्रष्ट कारभारावर बोट ठेवत त्यांनी सध्याच्या सत्ताधाऱ्यांना सत्तेचा प्रचंड अहंकार आल्याची टीका केली. आमदार भास्कर जाधव…