Headlines

पुढील वर्षापासून 62% लोकांसाठी गृह-ऑटो कर्ज कठीण:नवीन नियम लागू होतील, 730 पेक्षा कमी सिबिल स्कोअर असलेल्यांना अडचण येईल

आरबीआयचा नवीन नियम ‘ईसीएल डायरेक्शन-2026’ 1 एप्रिल 2027 पासून लागू होणार आहे. यानुसार, जर एखाद्या ग्राहकाने कर्जाचे दोन हप्ते (ईएमआय) भरण्यास चुकला, तर बँकांना 12 पट जास्त रक्कम बाजूला ठेवावी लागेल. बाजूला ठेवण्याचा अर्थ असा आहे की बँकेच्या ताळेबंदातून (बॅलन्स शीट) इतके रुपये कमी होतील, म्हणजेच यामुळे बँकांचा नफा सुमारे 42,000 कोटी रुपयांनी कमी होऊ…

Read More

पाणी‎ तुंबण्याची समस्या सुटली‎:शशीविहारमध्ये पाईप नाल्याच्या कामाला सुरूवात

शहरातील शशीविहार व सराफनगर परिसरात पावसाळ्यात पाईप नाला चोकअप झाल्यामुळे पावसाचे व सांडपाणी घरांमध्ये शिरण्याच्या समस्येने नागरिक हैराण झाले होते. या पार्श्वभूमीवर आमदार विलास भुमरे यांच्या निर्देशानंतर नगराध्यक्ष विद्या भूषण कावसानकर यांच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना हाती घेत शशी विहार येथे नव्या मोठ्या पाईप नाल्याच्या कामास सुरुवात केली आहे. शशीविहार परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक…

Read More

विजय आज तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार:60 वर्षांनंतर गैर-द्रविड पक्षाचा मुख्यमंत्री; TVK ची काँग्रेससह 5 पक्षांशी युती

तमिलागा वेत्री कझगम (TVK) चे प्रमुख आणि अभिनेते ते नेते बनलेले सी. जोसेफ विजय तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री असतील. विजय आज सकाळी 10 वाजता चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये राज्याचे 9वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. काँग्रेस खासदार राहुल गांधी शपथविधी सोहळ्यात उपस्थित राहतील. विजय यांनी शनिवारी राजभवनात पोहोचून राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांना TVK, काँग्रेस, CPI,…

Read More

आदिवासी मुलींच्या तस्करीचे मोठे रॅकेट!:कथित ऑडिओ क्लिपमधून धक्कादायक वास्तव उघड; कठोर कारवाईची मागणी

राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच, यवतमाळ जिल्ह्यात आदिवासी मुलींच्या तस्करीचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा खळबळजनक आरोप भाजपने केला आहे. एका कथित व्हायरल ऑडिओ क्लिपचा हवाला देत भाजप जिल्हाध्यक्षांनी हा गंभीर दावा केल्याने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, या कथित रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्याचे…

Read More

उमरखेडला बजरंग दल कार्यकर्त्याची गोवंश तस्करांकडून दगडाने ठेचून हत्या:तस्करांचा रक्तरंजित थरार सीसीटीव्हीत कैद; 2 संशयित ताब्यात

गोवंश तस्करी रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याची तस्करांनी दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री घडली. गजानन मारोती सुरोशे (रा. वडद-मुडाणा, ता. महागाव) असे या मृत गोरक्षकाचे नाव असून या घटनेमुळे यवतमाळ जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी वेगाने कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरून एका बोलेरो…

Read More

एसआयआरच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी आक्रमक:निवडणूक आयोगाची घेतली भेट; कोणत्याही पात्र मतदाराचे नाव वगळू नये, आदित्य ठाकरेंची मागणी

मतदार यादीतून नावे वगळण्याच्या प्रक्रियेबाबत (एसआयआर) देशभरात निर्माण झालेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर माहिती देताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांच्यासोबतची चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगत, महाराष्ट्रातील आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये कोणत्याही पात्र मतदाराचे नाव वगळले…

Read More

संगमनेरचा पहिला " पद्मश्री' शहरात येताना अंगावर काटा आला:पद्मश्री हा केवळ रघुभाऊंचा नाही, तर तमाशा क्षेत्रातील प्रत्येक कलावंताचा गौरव- आमदार तांबे‎

ज्या दिवशी दूरदर्शनवर रघुभाऊंना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा झाली, तो क्षण संपूर्ण संगमनेरकरांच्या छाती अभिमानाने फुगवणारा होता. संगमनेरला मिळालेला हा पहिला पद्मश्री मान आहे. आज जेव्हा प्रत्यक्ष पद्मश्री पदक संगमनेरच्या भूमीत येताना पाहिले, तेव्हा खरोखर अंगावर काटा उभा राहिला,” अशा शब्दांत आमदार सत्यजीत तांबे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. संगमनेरच्या सांस्कृतिक इतिहासातील सुवर्ण आणि…

Read More

भगवान शिव हेच सर्व सृष्टीचे मूळ, परमात्म्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे:अधिक मासानिमित्त संत गजानन महाराज मंदिरात भक्तिला उधाण‎

भगवान शिव हे सृष्टीचे मूळ आहेत. भगवान परमात्म्यावर श्रद्धा ठेवली पाहिजे. अंत:काळी भगवानाचे नामस्मरण झाले तरी कुकर्म नष्ट होतात.आयुष्यभर संसारात अडकलेल्या माणसाला अंत:काळी देव आठवणार कसा? असा मार्मिक प्रश्न विचारत स्नेहगंगाश्री आळंदीकर माई यांनी भक्ता . नामस्मरणात मोठी ताकद आहे. मुखामध्ये देवाचे नाव घेण्यासाठी पूर्वजन्मीचे पुण्य लागते. ज्यांनी जन्मोजन्मी भजन केले त्यांनाही शेवटच्या क्षणी देव…

Read More

राज्यात संरक्षण उत्पादन उद्योगाला चालना:महाराष्ट्राच्या 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेत संरक्षण उत्पादनाचा मोलाचा वाटा- शुभम गुप्ता

पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शुभम गुप्ता यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राला 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठण्यासाठी संरक्षण उत्पादन क्षेत्र महत्त्वाची भूमिका बजावेल. राज्यात संरक्षण उत्पादन उद्योगाला चालना देऊन नवसंशोधन, संशोधन आणि स्वदेशीकरणाला प्रोत्साहन देण्यावर भर दिला जात आहे. यामुळे देशाच्या संरक्षण क्षमतेत वाढ होण्यासोबतच राज्यातील उद्योग, उद्योजक आणि स्टार्टअप्ससाठी नवीन संधी उपलब्ध…

Read More

173 Men Listed for Benefits; TMC Leaders Returning Cut Money

Marathi News National Nadia Womens Scheme Scam: 173 Men Listed For Benefits; TMC Leaders Returning Cut Money कोलकाता10 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पश्चिम बंगालमध्ये सत्तापरिवर्तन झाल्यानंतर आता गावागावात नेत्यांकडून अवैध वसुली किंवा कट-मनी, म्हणजेच लाचेचा हिशेब मागितला जात आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये तृणमूलशी संबंधित स्थानिक नेत्यांवर सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या नावाखाली लाच घेतल्याचे आरोप समोर येत…

Read More