Headlines

सरकारने म्हटले – पेट्रोल-डिझेल आणि एलपीजीची कमतरता नाही:पंतप्रधान मोदींनी यांचा वापर कमी करण्यास सांगितले होते

पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या संकटामुळे सरकारने देशात इंधनाच्या तुटवड्याच्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. सरकारने सोमवारी नागरिकांना आश्वासन दिले की, देशात पेट्रोल, डिझेल किंवा एलपीजीची कोणतीही कमतरता नाही. हे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रविवारी इंधनावरील अवलंबित्व कमी करण्याच्या आणि बचत करण्याच्या आवाहनानंतर एक दिवसाने आले आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी…

Read More

भारतीय बटर चिकन जगातील टॉप 6 चिकन पदार्थांमध्ये:भारतीय पाककृती जगात 13वी सर्वोत्तम, बटर गार्लिक नान जगातील नंबर-1 ब्रेड

भारतीय पदार्थ बटर चिकन सध्या चर्चेत आहे. अलीकडेच न्यूझीलंडच्या एका मंत्र्याने न्यूझीलंड आणि भारत यांच्यातील प्रस्तावित मुक्त व्यापार कराराला ‘बटर चिकन त्सुनामी’ असे संबोधले. पण राजकारणापासून दूर राहून बोलायचे झाल्यास, ग्लोबल फूड गाइड टेस्टएटलसने एप्रिल २०२६ मध्ये प्रकाशित केलेल्या शीर्ष १०० चिकन पदार्थांच्या यादीत, भारताचे बटर चिकन सहाव्या स्थानावर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ग्लोबल फूड…

Read More

साताऱ्यात अवकाळी पावसाचा तडाखा:विज पडून 18 मेंढ्यांचा मृत्यू; जिल्हा रुग्णालयात झाडे कोसळली, महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

सातारा जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत जनजीवन विस्कळीत केले. वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि काही भागांत गारांसह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती, पशुधन आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. अनेक ठिकाणी नागरिकांची तारांबळ उडाली असून प्रशासनाकडे नुकसानभरपाईची मागणी करण्यात येत आहे. तालुका सातारा येथील कोंडवे गावात विजेचा तडाखा बसून १८ मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी…

Read More

नायब तहसीलदारांना जेसीबीला लटकवत 4 किलोमीटर फरफटत नेलं:मुरूम माफियांची दहशत वाढली; नागपुरात कायद्यालाच खुलं आव्हान

नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यात अवैध मुरूम उत्खननाविरोधातील कारवाईदरम्यान महसूल विभागाच्या अधिकाऱ्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे संपूर्ण प्रशासन हादरले आहे. बोरी नाईक परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर उत्खननावर धाड टाकण्यासाठी गेलेल्या नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे यांना मुरूम माफियांनी थेट चालत्या जेसीबीला लटकवत तीन ते चार किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर महसूल आणि पोलिस…

Read More

जीवनामधील संकटांचा सामना करण्याचा संदेश रामायणाने दिला:डॉ. विश्वास यांचे प्रतिपादन, श्रीराम कथा सोहळ्याला भाविकांचा प्रतिसाद‎

आजची तरुण पिढीच नव्हे तर एकूणच समाजमन एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) या मायावी समस्येशी संघर्ष करत आहे. या तंत्रज्ञानाने अनेकांचे काम हिरावून घेतले गेले आहे. चुकीच्या व्हिडिओद्वारे समाजमन कलुषित केले जात आहे पण या धोक्यातून वाचण्याचा उपाय राम कथेत आहे. तरुण पिढीने किंबहुना सर्वांनीच रामचरित मानस वाचले तर रामायण काळातील मायावी शक्तींना प्रभू श्रीरामांनी कसे नेस्तनाबूत…

Read More

अशोक खरातला 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी:SIT आता चौथ्या गुन्ह्यात घेणार ताबा; भोंदू खरात आज कोर्टापुढे हात जोडून उभा राहिला

महिला लैंगिक शोषण व आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी तुरुंगाची हवा खाणाऱ्या भोंदू अशोक खरातला आज कोर्टाने 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोर्टाने त्याच्यावर दाखल तिसऱ्या गुन्ह्यात त्याला ही कोठडी दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करणारे विशेष तपास पथक आता त्याला चौथ्या गुन्ह्याप्रकरणी ताब्यात घेणार आहेत. सरकारी वकिलांनी या प्रकरणी त्याच्या पोलिस कोठडीची मागणी केली…

Read More

बुडणाऱ्या क्रूझमध्ये प्रवासी लाईफ जॅकेट शोधत राहिले:MPत अपघातात 9 जणांचा मृत्यू, बचावकार्य 2 तास उशिरा; राज्यात क्रूझ सेवा बंद, चौकशी समिती स्थापन

मध्य प्रदेशातील जबलपूर क्रूझ अपघातात आतापर्यंत 9 लोकांचे मृतदेह सापडले आहेत. तीन मुलांसह 4 लोक अजूनही बेपत्ता आहेत, ज्यांचा शुक्रवार संध्याकाळपर्यंत कोणताही शोध लागला नव्हता. मुसळधार पावसामुळे शुक्रवारी शोधमोहीम थांबवावी लागली होती. शनिवारी सकाळी 5 वाजल्यापासून पुन्हा एकदा शोधमोहीम सुरू केली जाईल. अपघातानंतर प्रशासनाने राज्यभरात क्रूझ चालवण्यावर बंदी घातली आहे. क्रूझ पायलट, हेल्पर आणि तिकीट…

Read More

धुरंधर फ्रँचायझीने चित्रपट उद्योगाला नवसंजीवनी दिली:कंगना म्हणाली- बॉलिवूड देशापासून दूर जात होता, रणवीरच्या चित्रपटाने आशा जागवली

अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतने ‘धुरंधर’ फ्रँचायझीचे जोरदार कौतुक केले आहे. तिने सांगितले की, या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीत नवचैतन्य निर्माण केले आहे. कंगनाच्या मते, गेल्या काही काळापासून बॉलिवूड प्रेक्षकांपासून दुरावले होते, पण रणवीर सिंह अभिनीत या चित्रपटाने लोकांना पुन्हा चित्रपटगृहांकडे आकर्षित केले आहे. ही फ्रँचायझी आता 3,000 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडणारी पहिली भारतीय चित्रपट मालिका…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडामोडी वाढल्या:पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; तिकडे परांजपे पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचे सुपुत्र खासदार पार्थ पवार यांनी शनिवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत उभयंतांत कोणती चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण त्यांच्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील बड्या नेत्यांची कथित नाराजी व पक्षाशी संबंधित इतर काही मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यातच सत्ताधारी…

Read More

विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 12 मेला मतदान त्याच दिवशी निकालही:महायुती विरुद्ध महाविकास आघाडी राजकीय गणित तापलं

महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली असून विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाने या निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला असून 12 मे 2026 रोजी मतदान पार पडणार आहे. त्याच दिवशी निकालही जाहीर केला जाणार असल्याने एका दिवसातच या निवडणुकीचा फैसला होणार आहे. सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदानाची वेळ…

Read More