Headlines

सुरक्षेवरून विधानसभेत राडा:बिश्नोई गँगच्या धमकीवरून वडेट्टीवार संतापले; म्हणाले- रोहित शेट्टीला 25 गार्ड, मग आमदाराला का नाही?

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज दोन अत्यंत संवेदनशील आणि गंभीर मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. काँग्रेसचे आमदार साजिद पठाण यांना कुख्यात ‘बिश्नोई गँग’कडून पुन्हा एकदा धमकी आल्याचा धक्कादायक प्रकार काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात मांडला. यासोबतच, लातूरमधील शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव नाकारण्यात आल्याने संतप्त झालेल्या विरोधकांनी थेट सभात्याग केला. ‘रोहित शेट्टीला 25…

Read More

लता मंगेशकर-आशा भोसले यांच्या स्मरणार्थ रुग्णालय उभारणार:भाऊ हृदयनाथ म्हणाले- पुण्यात आशियातील सर्वात मोठे रुग्णालय बनवण्याचा प्रयत्न

गायिका लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या स्मरणार्थ पुण्यात आशियातील सर्वात मोठे रुग्णालय उभारले जाईल. दोन्ही गायकांचे बंधू आणि संगीत दिग्दर्शक हृदयनाथ मंगेशकर यांनी सोमवारी ही माहिती दिली. हृदयनाथ मंगेशकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पुणे येथे त्यांच्या आई आणि लता मंगेशकर यांनी गरिबांच्या सेवेसाठी रुग्णालय उभारण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांनी सांगितले की, सुमारे 25…

Read More

Shah Rukh Khans Jawan 2 Villain Hunt Begins Post-King

1 तासापूर्वी कॉपी लिंक शाहरुख खान त्यांच्या ‘किंग’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर ‘जवान’च्या सीक्वलवर काम सुरू करतील. ‘जवान 2’ चे सुरुवातीचे काम पूर्ण झाले आहे. चित्रपटाची स्क्रिप्ट गेल्या अनेक महिन्यांपासून लिहिली जात होती, ती आता अंतिम करण्यात आली आहे. स्क्रिप्ट तयार झाली, आता खलनायकाचा शोध ‘जवान 2’ ची कल्पना बऱ्याच काळापासून विचाराधीन होती. इंडिया टुडेच्या…

Read More

नैसर्गिक तलाव अन् जलाशयांचे पुनरुज्जीवन करा:पावसावरील अवलंबित्व कमी करा; आमदार अमीत साटमांची BMCकडे मागणी

मुंबई शहरातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजप अध्यक्ष तथा आमदार अमित साटम यांनी बृहन्मुंबई महापालिकेने केवळ पावसावर असलेले अवलंबित्व कमी करण्यासाठी शहरातील सर्व नैसर्गिक तलाव आणि जलाशयांचे पुनरुज्जीवन करावे, तसेच त्या ठिकाणी रिव्हर्स ऑस्मोसिस (आरओ) प्रकल्प उभारून उपलब्ध पाण्याचा वापर करावा, अशी मागणी केली आहे. यासंदर्भात साटम यांनी आज महापौर रितू तावडे आणि महापालिका आयुक्त अश्विनी…

Read More

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पाणी, शिक्षण, आरोग्यावर भर:मनपाला 5 वर्षांच्या विकास आराखड्याचे निर्देश

अमरावती शहराच्या विकासासाठी पाणी, शिक्षण आणि आरोग्य या त्रिसूत्रीवर भर देण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. अमरावतीकरांना उत्तम दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी समन्वयाने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. महापालिकेच्या आढावा बैठकीत त्यांनी पुढील पाच वर्षांचा सविस्तर विकास आराखडा तयार करण्याचे आदेश दिले. शनिवारी दुपारी झालेल्या या बैठकीत अमरावती शहराचा…

Read More

लोकशाहीचा गळा आवळणाऱ्या आणीबाणीच्या आठवणींना उजाळा:डॉ. उपेंद्र कोठीकर यांच्यासह भाजपच्या अनेक दिग्गजांची कार्यक्रमाला उपस्थिती‎

२५ जून १९७५ हा भारताच्या लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस होता. ज्यावेळी सत्तेसाठी देशातील जनतेच्या स्वातंत्र्याला बेड्या घातल्या गेल्या, तो भीषण कालखंड देश कधीही विसरणार नाही, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. उपेंद्र कोठीकर यांनी केले. भारतीय जनता पार्टी वरूड – मोर्शी विधानसभा क्षेत्राच्या वतीने आयोजित आणीबाणीच्या ५१ व्या वर्षानिमित्तच्या विशेष स्मरण कार्यक्रमात ते बोलत…

Read More

त्रिमूर्ती संस्थेचे सचिव मनिष घाडगे यांचे निधन:शोककुल वातावरणात अंत्यसंस्कार

प्रतिनिधी | नेवासे फाटा त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाचे सचिव मनीष घाडगे यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी शोककुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. संस्थेच्या प्रांगणात झालेल्या अंत्यविधीला संस्थेच्या अध्यक्षा ॲड. सुमती घाडगे, त्यांच्या दोन्ही कन्या आणि जावई अनुपस्थित होते. मनीष घाडगे यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले, मात्र दुपारपर्यंत त्यांचा अंत्यविधी कुठे होणार, याबाबत संभ्रम कायम होता. मूळ गाव…

Read More

8 लोकांच्या मृत्यूच्या आरोपीची दिल्ली-जयपूरमध्ये मालमत्ता:कधीकाळी मजुरी करत होता, आज 5 राज्यांमध्ये कारखाने, वडील म्हणाले- माझा मुलगा बेपत्ता

जयपूरमधील फटाका कारखान्यात झालेल्या आगीत 8 लोकांच्या मृत्यूचा आरोपी फिरोज कधीकाळी स्वतः फटाका कारखान्यात मजूर म्हणून काम करत होता. दिल्ली-एनसीआरमध्ये फटाक्यांवर बंदी आल्यामुळे त्याची नोकरी गेली होती. त्यानंतर त्याने केवळ जयपूरमध्येच नव्हे, तर 5 वेगवेगळ्या राज्यांमध्ये फटाक्यांचे अवैध कारखाने उघडले. आगीच्या घटनेनंतर फरार झालेल्या फिरोजचा दिल्लीत एक आलिशान 3 मजली बंगला आहे. जयपूरमध्येही त्याने मालमत्ता…

Read More

पल्स पोलिओ मोहीम:फुलंब्री तालुक्यामध्ये 98% बालकांना पोलिओचा डोस, शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांसाठी लसीकरण‎

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत फुलंब्री तालुक्यात रविवारी शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांसाठी लसीकरण मोहीम यशस्वीरीत्या राबवण्यात आली. तालुक्यात एकूण १४ हजार १९० बालकांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी पहिल्याच दिवशी १३ हजार ८९३ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देण्यात आली. यामुळे पहिल्याच दिवशी तालुक्यात ९८% लसीकरणाचे उद्दिष्ट साध्य झाले असून उर्वरित बालकांना आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत…

Read More

हातउसन्या पैशांवरून एकावर खुनी हल्ला:पुणे पोलिसांनी तिघांना अटक केली

पुण्यात हातउसने पैशांवरून झालेल्या वादातून एकावर खुनी हल्ला करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने तिघांना अटक केली आहे. ही घटना ४ एप्रिल रोजी शंकरशेठ रस्त्यावरील धोबीघाट परिसरात घडली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये रेहान उर्फ खिमा फिरोज शेख (वय २०), गौरव गणेश गुजर (वय २०) आणि अतिक हारून अत्तार (वय २१, तिघे रा. काशेवाडी,…

Read More