Headlines

विधान परिषदेसाठी महायुतीत रस्सीखेच:जळगावात गुलाबराव पाटील मुलासाठी प्रयत्नशील, कोकणात आमदार दळवींच्या मुलीने भरला अर्ज

विधान परिषदेच्या 17जागांसाठी पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीत सत्ताधारी महायुतीमधील घटकपक्षांत उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. जळगावची जागा भाजपला सुटल्याचे स्पष्ट होताच शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील आपल्या मुलासाठी उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात तातडीने मुंबईला दाखल झाले. कोकणातील एकमेव जागेवरूनही शिवसेनेतच संघर्ष पेटला आहे. येथे आमदार भरत गोगावले आणि महेंद्र दळवी हे दोन्ही नेते आपापल्या मुलांसाठी तिकीट…

Read More

हिंगोली स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई:शेतकऱ्याचे हळदीचे कऱ्हे चोरणारा चोरटा गजाआड, 3 गुन्हे उघड, 1.98 लाखाचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सेनगाव तालुक्यातील खुडज शिवारातून मंगळवारी तारीख 30 एक आरोपीला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून एक लाख 98 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सेनगाव तालुक्यामध्ये मागील काही दिवसात शेतातील हळद व इतर धान्य चोरीला जाण्याचे प्रकार वाढले होते या प्रकारामुळे शेतकऱ्यांमधून भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा अप्पर…

Read More

तिसगाव धरणावर 300 हून अधिक शेतकऱ्यांच्या 300 केबल्स‌ चोरीला:घटनास्थळाजवळच केबल्स‌् जाळून तांबे लंपास; पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह‎

तीव्र पाणीटंचाईशी मुकाबला करणाऱ्या वणी परिसरातील शेतकऱ्यांना आता चोरांनी टार्गेट केले आहे. तांबे आणि पितळ या धातूंच्या गगनला भिडलेल्या किमतींचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी तिसगाव धरण परिसरात १५ दिवसांत तब्बल ३०० हून अधिक शेतकऱ्यांच्या ३०० पेक्षा जास् . चोरट्यांनी धरणाजवळीलच एका आडमार्गावर या सर्व केबल्स‌् एकत्र केल्या. तिथेच त्या जाळून त्यातील प्लास्टिक नष्ट केले आणि…

Read More

पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस:दुष्काळ, पाणीटंचाई आणि ‘ऑपरेशन टायगर’वरून सभागृहात खडाजंगीची शक्यता

महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी, विविध अध्यादेशांचे सादरीकरण आणि मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आजच्या कामकाजात राज्यातील दुष्काळ, पाणीटंचाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, वीजटंचाई तसेच विविध प्रलंबित मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) आणि शिंदे गटातील राजकीय घडामोडी, सहा खासदारांच्या पक्षांतराचा मुद्दा आणि ‘ऑपरेशन…

Read More

व्हॉट्सॲपच्या युझरनेम वैशिष्ट्यावर सरकारची बंदी:गोपनीयता वाढवणारे वैशिष्ट्य होते, चॅटिंग स्मार्ट झाली असती; थांबवण्याचे कारण जाणून घ्या

व्हॉट्सॲप लवकरच इंस्टाग्राम आणि टेलिग्रामप्रमाणे युझरनेम फीचर आणणार होते. यामुळे लोक मोबाईल नंबर शेअर न करता एकमेकांना मेसेज करू शकतील. मात्र, सुरक्षेच्या चिंतेमुळे सरकारने सध्या या फीचरच्या लॉन्चिंगवर बंदी घातली आहे. खरं तर, भारतात व्हॉट्सॲपचे सुमारे 90 कोटी युझर्स आहेत. यात अनेक अशी फीचर्स आहेत ज्याबद्दल बहुतेक युझर्सना माहिती नाही. ही फीचर्स प्रायव्हसी वाढवण्यापासून ते…

Read More

पाच वर्षांपासून रखडलेल्या वणी रस्त्यासाठी आंदोलन:खडी-दगडांवरून प्रवास त्रासदायक; ग्रामस्थ आक्रमक‎

दहीवी ते वणी या रस्त्याची गेल्या पाच ते सहा वर्षांपासून झालेली दूरवस्था आणि रखडलेले काम याविरोधात संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. रस्त्यावरील दगड उचलून हातात निषेधाच्या पाट्या घेत नागरिकांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली. रस्त्याचे काम तातडीने पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. दहीवी-वणी मार्गाचे काम गेल्या वर्षी सुरू करण्यात आले होते….

Read More

नारी शक्ती वंदन अधिनियम लोकसभेत पूर्ण बहुमताने पारित होणार:विकसित भारताला समर्पित, महिला प्रतिनिधित्वाचा आवाज बुलंद होईल – खासदार कुलकर्णी

राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी मंगळवारी सांगितले की, ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ विकसित भारताला समर्पित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताच्या निर्मितीत महिला शक्तीचा सक्रिय सहभाग असावे हे स्वप्न असून, या अधिनियमामुळे लोकसभेसह सर्व विधानसभांमध्ये महिला प्रतिनिधित्वाचा आवाज बुलंद होईल. लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणाऱ्या या अधिनियमाच्या…

Read More

‘आनंद तीर्थ-समवशरण’ भूमीवर क्षेत्र विशुद्धी विधी:उपाध्याय प्रवर प्रवीण ऋषीजी महाराजांच्या सान्निध्यात रंगणार सोहळा‎

महाराष्ट्र प्रवर्तक कुंदन ऋषीजी यांच्या सान्निध्यात, अर्हम विज्जा प्रणेते उपाध्याय प्रवर परमपूज्य प्रवीण ऋषीजी यांचा २०२६ मध्ये होणारा ‘समर्पण – सर्व कल्याण’ शिखर चातुर्मास सोहळ्याच्या तयारीचा शुभारंभ आनंदधाम परिसरात करण्यात आला. चातुर्मासासाठी उभारण्यात येणार असलेल्या ‘आनंद तीर्थ-समवशरण’ या मुख्य प्रवचन स्थळाच्या भूमीवर जैन परंपरेनुसार ‘क्षेत्र विशुद्धी’ हा मंगल विधी उत्साहात व भाविक वातावरणात झाला. हा…

Read More

दिल्लीला जाणार का? प्रश्नावर फडणवीसांचे मिश्किल उत्तर!:शेतकरी कर्जमाफी, बोगस बियाणे आणि मोशी दुर्घटनेवरही केले मोठे भाष्य

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांकडून सुरू असलेल्या ‘दिल्लीवारीच्या’ चर्चांना मिश्किल उत्तर दिले. यासोबतच राज्यातील पावसाची स्थिती, ऐतिहासिक शेतकरी कर्जमाफी, बोगस सोयाबीन बियाणे, नागपुरातील ॲग्रो कन्व्हेन्शन सेंटर आणि मोशी इमारत दुर्घटना अशा विविध महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी सविस्तर माहिती दिली. ‘मी परवाच…

Read More

Supreme Court Refuses Ban On CBSE Three Language Policy

नवी दिल्ली9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (14 जुलै) सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) च्या त्रि-भाषा धोरणावर बंदी घालण्यास नकार दिला. हे धोरण सध्याच्या 2026-27 सत्रापासून लागू करण्यात आले आहे. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांचे खंडपीठ या प्रकरणावर बुधवारी सुनावणी करणार आहे. याचिकाकर्त्यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे…

Read More