राजू शेट्टींचा सरकारवर गंभीर आरोप:म्हणाले- कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक, 'सात-बारा कोरा'चा दावा फोल
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारच्या अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेवर गंभीर टीका केली आहे. ही योजना शेतकऱ्यांची फसवणूक असून, ‘सात-बारा कोरा’ करण्याच्या दाव्याचा फुगा फुटल्याचे त्यांनी म्हटले. देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला राज्यातील शेतकऱ्यांचा सात-बारा पूर्णपणे कोरा करण्याची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात थकीत कर्जदारांना केवळ २ लाख रुपये आणि…