मुनगंटीवार उभे राहताच आणि धानोरकरांचा ‘वॉकआऊट’:चंद्रपुरात प्रोटोकॉलवरून मोठा वाद; लोकसभा अध्यक्षांकडे अधिकृत तक्रार
चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित हिराई महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात राजशिष्टाचाराच्या मुद्द्यावरून मोठा वाद उफाळून आला. शासकीय कार्यक्रमात नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी थेट मंचावरूनच नाराजी व्यक्त केली आणि कार्यक्रम अर्धवट सोडून ‘वॉकआऊट’ केले. या घटनेमुळे कार्यक्रमस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. या कार्यक्रमाला…