मुंबई पोलिसांचा मोठा निर्णय:नीट आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 23 जुलैपासून 15 दिवस जमावबंदी लागू
दिल्लीत ‘नीट’ पेपरफुटीविरोधात सुरू असलेल्या तीव्र आंदोलनाचे पडसाद आता मुंबईत उमटण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने अत्यंत मोठा निर्णय घेतला आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून आगामी २३ जुलै ते ६ ऑगस्ट या १५ दिवसांच्या कालावधीसाठी मुंबईत जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी एक परिपत्रक जारी करुन ही माहिती…