Headlines

पशुपक्ष्यांना चिमुकल्यांची साद अन् आजी-आजोबांशी गप्पा!:संगमनेर तालुक्यातील देवकवठे येथील विद्यालयात "मंथ ऑफ काइंडनेस''चा उपक्रम‎

समाजामध्ये सकारात्मकता वाढीस लागावी याकरता कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून जुलै महिना हा मंथ ऑफ काइंडनेस राबवण्यात येत आहे. या अंतर्गत रामाजी गेनुजी पा. कहांडळ विद्यालय देवकवठे येथील विद्यार्थ्यांनी आपल्या घराजवळ परिसरात व शाळेच्या प्रांगणात पशुपक्ष्यांना चिमण्यांना खाद्य टाकून परत गावाकडे फिरण्याची साद घातली. विद्यार्थ्यांनी मंथ ऑफ काइंडनेस हा अभिनव उपक्रम राबवला. यावेळी मुख्याध्यापक…

Read More

सोनोशीत फुगडी खेळत निघाली बालवारकऱ्यांची वारी:दिंडीतून दिला संस्कार अन् संस्कृतीचा संदेश; शिष्यवृत्ती-नवोदय पात्र विद्यार्थ्यांचा सन्मान‎

ज्ञान, संस्कार आणि संस्कृती यांचा संगम साधत पाथर्डी तालुक्यातील सोनोशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने आयोजित केलेला पायी दिंडी सोहळा समाज परिवर्तनाचा आणि संस्कारांची पेरणी करणारा प्रेरणादायी उत्सव ठरला. या दिंडीमुळे संपूर्ण सोनोशी गाव हरिनामाच्या गजरात . दिंडीत विद्यार्थ्यांनी लेझीम, टिपरी आणि टाळ नृत्याद्वारे वारकरी संस्कृतीचे जिवंत दर्शन घडवले. भारुड व विविध सादरीकरणांतून संतांचे विचार मांडत…

Read More

दुरवस्था:भिंगारच्या स्मशानभूमीत सुविधांचा अभाव, दुःखाच्या प्रसंगातही होताहेत हाल, सुविधांसाठी आंदाेलनाचा इशारा‎

भिंगार येथील ऐतिहासिक शुक्लेश्‍वर मंदिर परिसरातील स्मशानभूमीची अवस्था दिवसेंदिवस अत्यंत बिकट होत चालली आहे. या मूलभूत सुविधेकडे झालेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिकांना दुःखाच्या प्रसंगातही प्रचंड मनस्ताप आणि गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात येथे अंत्यविधी करणे म्हणजे मृताच्या नातेवाईकांसाठी एक मोठे आव्हान बनले आहे. ही स्मशानभूमी भिंगार पंचक्रोशीसह नागरदेवळे उपनगरातील नागरिकांसाठी अंतिम संस्काराचे प्रमुख…

Read More

आयशर-कारच्या अपघातात श्रीगोंद्यात नोकरीवर जाणाऱ्या चुलतभावांचा मृत्यू

जामखेड जामखेड-कर्जत रोडवरील पाटोदा गरडाचे गावाजवळील धोकादायक वळणावर रविवारी (१९ जुलै) पहाटे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास चारचाकी गाडी आणि आयशर टॅम्पो यांच्यात समोरासमोर धडक झाली. यात श्रीगोंदे येथे शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या दोन चुलतभावांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला. निखिल मोतीलाल बहुरे (श्रीगोंदा तहसील कार्यालयात महसूल…

Read More

आज सोने ₹756 आणि चांदी ₹3493 ने महाग:10 ग्रॅम सोने ₹1.42 लाखांवर आणि 1 किलो चांदीची किंमत ₹2.19 लाखांवर पोहोचली

सोन्या-चांदीच्या दरात आज वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदी 3,493 रुपयांनी वाढून 2,18,967 रुपयांवर पोहोचली आहे, जी शुक्रवारी 2,15,474 रुपयांवर होती. तर, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने 756 रुपयांनी वाढून 1,41,915 रुपयांवर आले आहे. यापूर्वी 17 जुलै रोजी ते 1,41,159 वर होते. या महिन्यात सोन्याचे दर 283 रुपयांनी…

Read More

उद्धव ठाकरेंच्या पक्षात कार्यकर्ते उरले नाहीत:म्हणून ते दुसऱ्यांच्या आंदोलनात जातात- गिरीश महाजनांचा टोला; संजय राऊतांवरही केली टीका

राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकमधील पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह संजय राऊत, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. ठाकरेंच्या आंदोलनांना प्रतिसाद मिळत नसल्याने इतरांच्या आंदोलनांना पाठिंबा देण्याची वेळ त्यांच्यावर आली असल्याचा टोला त्यांनी लगावला. तसेच मतदारसंघ पुनर्रचना, मतदार यादी विशेष पुनरावलोकन (SIR), पर्यावरण, शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांवरील कारवाई आणि इतर विविध…

Read More

दशकाच्या अंधाराला लागला अखेर पूर्णविराम:अंजनगाव सुर्जीतील 8 दिवे पुन्हा प्रकाशमान, युद्धपातळीवर दुरुस्ती‎

शहरातील विविध चौकांमध्ये बसविण्यात आलेले तब्बल आठ हायमास्ट दिवे गेल्या दहा वर्षांपासून बंद स्थितीत असल्याने शहरात अक्षरशः अंधाराचे सावट पसरले होते. विशेषतः सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात मुख्य रस्ते, चौक आणि वर्दळीच्या भागांमध्ये रात्रीच्या वेळी नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. अपघातांचा धोका वाढण्याबरोबरच सुरक्षेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, या समस्येची तातडीने दखल…

Read More

नातवासाठी बालरोगतज्ज्ञ शोधणे पडले महाग:63 वर्षीय वृद्धाची पावणेआठ लाखांची फसवणूक, विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुण्यात एका ज्येष्ठ नागरिकाची ऑनलाइन डॉक्टर अपॉइंटमेंट घेताना सायबर चोरट्यांनी पावणेआठ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. नातू आजारी असल्याने बालरोगतज्ज्ञांची अपॉइंटमेंट घेण्याचा प्रयत्न करत असताना हा प्रकार घडला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिक धानोरी भागात राहतात. त्यांनी संकेतस्थळावरून बालरोगतज्ज्ञांचा मोबाइल क्रमांक मिळवला होता,…

Read More

सर्वपक्षीय आंदोलनाचे फलित:भाजपच्या आंदोलनानंतर हैदतपूर, वडाळा टोल नाका तात्पुरता बंद, 25 कि.मी. परिसरातील नागरिकांना टोल सवलतीची मागणी‎

राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३ वरील हैदतपूर–वडाळा टोल नाक्यापासून २५ कि.मी. परिसरातील स्थानिक नागरिकांना टोल शुल्कात सवलत द्यावी. रस्त्यासह पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत टोल नाक्याची वसुली बंद करावी. या मागणीसाठी तालुका भाजपाच्या वतीने शनिवारी टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आले. अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत समाधानकारक तोडगा न निघाल्याने कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. रस्ता रोको आंदोलन सुरू केले. अखेर…

Read More

आदित्य ठाकरेंना भगवी टोपीही नको:उद्धव ठाकरे-राऊतांना बाजूला करून आदित्य ठाकरेंना पक्षाचे नेतृत्व हवे- नवनाथ बन

आदित्य ठाकरे यांनी काल शिवतीर्थावर भगवी टोपी काढून आंदोलन सुरू केले. यांनी यापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांचे विचार धुडकावून लावले, आणि आता यांना भगवी टोपी सुद्धा नको आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. आदित्य ठाकरेंना नेतृत्व करायचे असेल तर त्यांनी भगवी टोपी हाती घेतली पाहिजे. हिंदु्त्वाचे विचार ठेवले पाहिजे तर तुमचा पक्ष टिकेल….

Read More