Headlines

मुंबईत पुन्हा बेस्टचा भीषण अपघात:मानखुर्दमध्ये भरधाव बस दुभाजकाला धडकली, एका 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

मुंबईतील मानखुर्द परिसरात सायन-पनवेल महामार्गावर आज सकाळी बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेली बस थेट दुभाजकाला धडकल्याने एका ६५ वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या अपघातात बसचे चालक आणि वाहक देखील जखमी झाले असून, वारंवार होणाऱ्या अशा अपघातांमुळे मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. नेमका अपघात कसा घडला? आज (सोमवारी)…

Read More

Ayodhya Ram Mandir donation case Supreme Court hearing SIT status report CBI investigation Live updates

Marathi News National Ayodhya Ram Mandir Donation Case Supreme Court Hearing SIT Status Report CBI Investigation Live Updates अयोध्या2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी आज म्हणजेच सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांचे खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करेल. यापूर्वी, विशेष तपास पथकाने (SIT) रविवारी रात्री उशिरा…

Read More

Uddhav Thackeray Shivaji Park Protest; Mumbai Police Files 3 Cases

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर आयोजित केलेल्या आंदोलनानंतर मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आंदोलनाच्या आयोजनात नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण् . हे आंदोलन पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा तसेच विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर आयोजित करण्यात आले होते. सभेनंतर मोठ्या संख्येने…

Read More

‘ज्योतिबांचा लढा…पेटला लढा’ कार्यक्रम रंगला:आ. प्रवीण पोटे यांच्या जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन : मान्यवरांची उपस्थिती‎

सर्व शाखीय माळी महासंघ, अमरावतीच्या वतीने महाराष्ट्र राज्य स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत विजयाची हॅट्रिक साधणारे आ. प्रवीण पोटे यांच्या जाहीर सत्कार समारंभाचे आयोजन नुकतेच शेगाव नाका येथील अभियंता भवनात करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. गणेश खारकर होते. या सोहळ्यात प्रबोधनकार, गायक व भावस्वरांजली संचाचे प्रस्तुतकर्ता प्रा. मोहन इंगळे यांनी सादर केलेल्या ‘ज्योतिबांचा…

Read More

दिवसाला जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी 150 अर्ज:70 दाखल्यांनाच अधिकाऱ्यांची मंजुरी, दोन महिन्यांत 4 हजारांवर दाखले रखडले, विद्यार्थी, पालक त्रस्त‎

. शहरात दिवसाला जन्म-मृत्यूच्या दाखल्यांसाठी १५० अर्ज मनपा मुख्यालयात सादर केले जात असताना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून (डीएचओ) केवळ ७० दाखलेच एका दिवसात मंजूर होत आहेत. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून ४ हजारांवर दाखले प्रलंबित आहेत. परिणामी दाखले मिळण्याच्या संथगतीमुळे विद्यार्थी, पालक, सर्वसामान्यांची शैक्षणिक व इतर आवश्यक कामे खोळंबली आहेत. ते मनपा प्रशासनासह शासनाविरोधात सातत्याने संताप व्यक्त…

Read More

राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार:हवामान विभागाकडून येलो अलर्ट; मराठवाडा, विदर्भासह पुणे-साताऱ्यात मुसळधार पावसाचा अंदाज

राज्यात पावसाने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले आहे. भारतीय हवामान विभागाने पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवला असून, राज्याला पावसाचा ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता मिटली असली, तरी मुंबईसह उपनगरांमध्ये सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांचे आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. कमी दाबाचा पट्टा आणि ‘येलो अलर्ट’ बंगालच्या उपसागरात १.५…

Read More

अमरावतीमध्ये मध्यरात्री दुहेरी हत्याकांड:बसस्थानक परिसरात दोन तरुणांची निर्घृण हत्या; हत्येचे कारण अस्पष्ट

अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथे मध्यरात्री एका भीषण दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. वलगाव बसस्थानक परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी दोन तरुणांची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली आहे. या घटनेमुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस फरार आरोपींच्या मागावर आहेत. मध्यरात्रीचा थरार अन् दोन तरुणांचा अंत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजोग जोशी (वय २४) आणि ऋतिक पंडित…

Read More

छत्रपती संभाजीनगर जिल्हा बँकेचे अध्यक्षपद शिवसेनेला:विलास भुमरे अध्यक्ष, रामराव शेळके उपाध्यक्ष; दोन वर्षांसाठी फॉर्म्युला निश्चित

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी आमदार विलास भुमरे यांची निवड झाली आहे, तर रामराव शेळके उपाध्यक्ष बनले आहेत. अध्यक्षपदासाठी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात दोन-दोन-एक वर्षांचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. खासदार संदिपान भुमरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यानुसार, पहिल्या दोन वर्षांसाठी शिवसेनेला अध्यक्षपद मिळाले आहे. पुढील दोन वर्षे भाजप आणि…

Read More

जंतरमंतरवर आंदोलकांवर लाठीचार्ज:अनेकांची डोकी फुटली, बॅरिकेडिंग तोडून पार्लमेंट ठाण्यापर्यंत पोहोचले; दीपके म्हणाले- आम्हाला कुणीही रोखू शकत नाही

जंतर-मंतर येथे सोमवारी ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) निदर्शकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यात अनेक जण जखमी झाले असून काहींच्या डोक्याला दुखापत झाली आहे. सुमारे ३०,००० ते ३५,००० निदर्शक जंतर-मंतरपासून संसदेच्या दिशेने मोर्चा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेकांनी बॅरिकेड्स तोडून ‘पार्लमेंट स्ट्रीट’ पोलीस ठाण्यापर्यंत मजल मारली आहे; पोलिसांनी या मार्गावर बॅरिकेड्सचे अनेक स्तर उभारले आहेत. दिल्ली पोलीस…

Read More

गोसेखुर्दच्या उजव्या कालव्याचे काम ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करा:अन्यथा 50 हजार शेतकऱ्यांसह आंदोलन'; विजय वडेट्टीवारांचा इशारा

गोसेखुर्द धरणाच्या उजव्या कालव्याचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, अन्यथा 50 हजार शेतकऱ्यांसह तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिला. कालव्याच्या पाहणीदरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांसह ठेकेदारांवरही संताप व्यक्त केला. वडेट्टीवार म्हणाले की, गोसेखुर्द प्रकल्प हा चंद्रपूर, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा देणारा महत्त्वाचा प्रकल्प असून शेतकऱ्यांसाठी…

Read More