Headlines

आंबे गावात विजेच्या धक्क्यातून पतीला वाचवताना पत्नीचाही अंत:वटपौर्णिमेदिवशीच घाला, माेटार सुरू करण्यासाठी गेला होता शेतकरी‎

प्रतिनिधी | आंबे सात जन्माच्या सोबतीचे व्रत असणाऱ्या वटपौर्णिमेच्या दिवशीच आंबे गावात एक काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना सोमवारी घडली. सकाळच्या सुमारास शेती पंपाची मोटर बंद करताना विजेचा धक्का लागलेल्या पतीला वाचवण्याच्या प्रयत्नात पत्नीचाही दुर्दैवी मृत्यू झाला. विद्युत मोटारीला चिकटलेल्या पतीला वाचवायला गेलेल्या पत्नीलाही विजेने कचाट्यात घेतल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. वटपौर्णिमेच्या सणादिवशी सकाळच्या प्रहरी ६.३०…

Read More

'इठा' चित्रपटात इतिहासाची तोडफोड:विठाबाई नारायणगावकर कुटुंबीयांचा गंभीर आरोप, वादग्रस्त बाबींचा फेरविचार करण्याची मागणी

पुणे: ‘इठा’ चित्रपटाच्या टीझरमध्ये तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या मूळ इतिहासाची तोडफोड करून चुकीची माहिती दाखवल्याचा गंभीर आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. विठाबाईंचे नातू आणि राज्य शासनाच्या ज्येष्ठ कलावंत अनुदान समितीचे सदस्य धनंजय खुडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. चित्रपटात आवश्यक बदल न झाल्यास कायदेशीर कारवाई आणि अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला….

Read More

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी:कर्जमाफी योजनेला EC ची मंजुरी, आचारसंहिता काळात योजना राबवण्याचा मार्ग मोकळा

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. विधानपरिषद निवडणुकीमुळे लागू झालेल्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफीची प्रक्रिया रखडण्याची चर्चा सुरू होती. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाने या योजनेला मंजुरी दिल्याने कर्जमाफीच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे 30 जूनपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात ‘दिलासा’ पोहोचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्रात सध्या विधान परिषदेची धूम सुरू आहे. त्यामुळे राज्यात निवडणूक…

Read More

काळजाचा थरकाप!:जामनेरमध्ये पती-पत्नी ठार, चिमुकली बचावली; तर अक्कलकोटमध्ये एसटी-डंपरच्या धडकेत दोघांचा अंत

महाराष्ट्रात आज झालेल्या दोन वेगवेगळ्या भीषण रस्ते अपघातांत एकूण चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे झालेल्या अपघातात पती-पत्नीचा जागीच अंत झाला, तर सुदैवाने त्यांची एक वर्षाची चिमुकली यातून बचावली आहे. दुसरीकडे, सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट-गाणगापूर महामार्गावर बस आणि डंपरची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात अन्य दोघांचा मृत्यू झाला असून, या दोन्ही…

Read More

अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी सुरु:20 जूनपर्यंत मुदत, 22 ते 25 दरम्यान प्रत्यक्ष प्रवेश

अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी गुरुवार, १८ जूनपासून अमरावतीत सुरू झाली आहे. ही प्रक्रिया २० जूनपर्यंत चालणार आहे. यावर्षी अकरावीच्या सर्व शाखांचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने केले जात आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना थेट महाविद्यालयात प्रवेश घेता येणार नाही. या टप्प्यात नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी करता येणार आहे, तसेच नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना भाग-१ आणि भाग-२ मध्ये बदल करण्याची संधी मिळेल….

Read More

सुरांची मल्लिका आशा भोसले यांचे निधन:गरिबीत बहीण लतासोबत लपूनछपून शाळेत जायच्या, कधी रेकॉर्डिंगदरम्यान स्टुडिओतून बाहेर काढले गेले

सुरांची मल्लिका आशा भोसले यांचे आज ९२ व्या वर्षी निधन झाले. त्यांना शनिवारी रात्री छातीत संसर्ग झाल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आशा भोसले गेल्या ७० वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीचा भाग होत्या. त्यांनी अनेक भाषांमध्ये विक्रमी १२ हजार गाणी गायली. त्यांच्याशिवाय हिंदी चित्रपटसृष्टीची कल्पना करणेही कठीण आहे, मात्र एक काळ असा होता जेव्हा…

Read More

हिंगोलीत मोबाईलवरून वडिलांनी टोकले:16 वर्षीय मुलाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या, बिबथर गावावर शोककळा

कळमनुरी तालुक्यातील बिबथर येथे एका सोळा वर्षीय मुलाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मृतदेहावर शनिवारी ता. 16 सकाळी आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे किरकोळ कारणावरून राग आल्याने त्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबथर येथे गोविंद शिंदे…

Read More

Kalyan Kale Alleges Dhanashakti Win

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत महायुतीने २० पैकी १८ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. या विजयावर काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी गंभीर आरोप केला आहे. ही निवडणूक ‘धनशक्ती’च्या जोरावर जिंकली असून, मतदारांना कंटाळा येईपर्यं . रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून जिल्हा मध्यवर्ती बँकेत मतमोजणीला सुरुवात झाली. महायुतीने संचालक मंडळ निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले….

Read More

पापाराझींवर संतापली मौनी रॉय:कारच्या काचेतून व्हिडिओ बनवताना हात दाखवून म्हणाली- बंद करा, मैत्रिणींसोबत डिनरला गेली होती

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉय मंगळवारी रात्री पापाराझींवर नाराज झाली. खरं तर, मुंबईत मित्रांसोबत डिनर केल्यानंतर जेव्हा ती तिच्या गाडीत बसली, तेव्हा फोटोग्राफर्स सतत तिचा व्हिडिओ काढू लागले. यामुळे संतापून मौनीने हाताच्या इशाऱ्याने कॅमेरे बंद करण्यास सांगितले. व्हिडिओमध्ये दिसत आहे की मौनी रॉय तिच्या गाडीच्या सीटवर बसलेली आहे. तिने स्लीव्हलेस काळ्या रंगाचा पोशाख घातला आहे आणि…

Read More

पूरस्थितीमुळे देहू-आळंदीत गर्दी टाळा:वारकऱ्यांनी पुणे शहरातून पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे: डॉ. नीलम गोऱ्हे

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर देहू-आळंदी परिसरात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे वारकऱ्यांनी सध्या या ठिकाणी गर्दी करणे टाळावे, असे आवाहन शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले आहे. शक्य असल्यास, वारकऱ्यांनी पुणे शहरातून पालखी सोहळ्यात सहभागी व्हावे, असेही त्यांनी म्हटले. मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे पूल, रस्ते आणि वाहतूक व्यवस्था…

Read More