Headlines

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते संभाजी महाराजांच्या शिल्पाचे अनावरण:पुणे मनपाने उभारले 5 कोटींचे 'बुधभूषण' ग्रंथ रचनाकार शिल्प

पुणे महानगरपालिकेने उभारलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती शिल्पाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. शिवाजीनगर येथील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात उभारण्यात आलेल्या या ‘बुधभूषण’ ग्रंथ रचनाकार शिल्पासाठी ५ कोटी रुपये खर्च आला आहे. हे शिल्प १० फूट उंचीचे असून, छत्रपती संभाजी महाराज ‘बुधभूषण’ ग्रंथाची रचना करतानाचे हे जगातील पहिले कांस्य शिल्प आहे. महाराष्ट्रात…

Read More

भोंदू खरातच्या मालमत्तांची 2 गोण्या कागदपत्रे जप्त:ईडीचा फास, अधिकाऱ्यांना नाेटिसा, स्वतंत्र चाैकशीही

भोंदूबाबा अशोक खरात याच्याविरोधात गुन्ह्यांची मालिका सुरूच असून मंगळवारी त्याच्या पोलिस कोठडीत चौथ्यांदा वाढ झालेली असतानाच आता या बहुचर्चित प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाची (ईडी) एन्ट्री झाली आहे. ‘ईडी’ च्या विशेष १३ सदस्यीय पथकाने खरातचे नाशिकमधील निवासस्थान, सिन्नर (मिरगाव) येथील कार्यालये आणि पुण्यातील त्याच्या सीएच्या (सनदी लेखापाल) ठिकाणांवर सोमवार व मंगळवार असे दोन दिवस छापे टाकले आहेत….

Read More

मोहोळच्या मुख्य रस्त्यावर अनधिकृत हातगाड्यांचा राजथाट:मोहोळ शहरातील भर रस्त्यावरील अडथळ्यामुळे भीषण अपघाताची भीती

मोहोळ शहरासह तालुक्यातून विविध ठिकाणांवरून आलेले अनधिकृत फळविक्रेते आणि पालेभाजी विक्रेते भर रस्त्यावरच हातगाड्या लावून राजथाटात विक्री करत आहेत. यामुळे मुख्य रस्त्याला पूर्णपणे मंडईचे स्वरूप आले आहे. या गंभीर अडथळ्यावर पोलिस प्रशासन आणि नगरपरिषद प्रशासन पूर्णपणे डोळेझाक करत आहे. वारंवार मागणी होऊनही केवळ एक दिवसापुरती तात्पुरती कारवाई करण्याचे ढोंग केले जाते. या ढोंगामागे पोलिस प्रशासनाचे…

Read More

ईव्हीएमची 'अग्निपरीक्षा':इतिहासात पहिल्यांदाच होणार 'डायग्नोस्टिक टेस्ट', 2024 च्या निवडणुकीत 20,625 मतांनी खान पराभूत!

निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला आहे. मुंबईतील चांदिवली विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम (EVM) यंत्रांची 16 आणि 17 एप्रिल रोजी ‘डायग्नोस्टिक टेस्ट’ केली जाणार आहे. माजी मंत्री नसीम खान यांनी निवडणूक निकालाला कायदेशीर आव्हान दिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून, देशाच्या निवडणूक इतिहासात अशा प्रकारची ही पहिलीच तांत्रिक तपासणी…

Read More

आनंदोत्सव, घरांवर विद्युत रोषणाई, निळे झेंडे, लेक-जावयांचे आगमन:पुरणपोळीचा बेत, नवीन कपडे, लाडू, चकली, करंजी फराळाची तयारी, घराची रंगरंगोटी, आकाश कंदीलचा झगमगाट‎

प्रतिनिधी | सोलापूर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मंगळवारी (ता. १४ ) साजरी होत आहे. बाबासाहेबांच्या पुतळ्यास सुशोभीकरण, रोषणाई करण्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्री बारानंतर असंख्य अनुयायी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ नतमस्तक होण्यासाठी येतात. न्यू बुधवार पेठ, मिलिंद नगर, माता रमाबाई आंबेडकर नगर, मुकुंद नगर, फॉरेस्ट, कुमठा नाका, हब्बूवस्ती आदी परिसरातील घरात सफाई, रंगरंगोटीचे…

Read More

'ई-चलन' कारवाईतून मुक्त करा, अन्यथा आंदोलन:पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनचा वार्षिक सर्वसाधारण सभेतून सरकारला इशारा

पिंपरी चिंचवड बस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष दत्तात्रय भेगडे यांनी ‘इ-चलन’ कारवाईतून वाहतूकदारांना मुक्त करण्याची मागणी केली आहे. शासनाने यावर तोडगा न काढल्यास राज्यात पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. ही मागणी असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली. चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या ‘इ-चलन’ कारवाईविरोधात वाहतूकदारांनी यापूर्वी मुंबईतील आझाद मैदान आणि पुण्यातील आरटीओ कार्यालयावर आंदोलने केली आहेत. तरीही…

Read More

पुणे आरएमसी उद्योग उद्यापासून सुरू:प्रशासनाच्या सकारात्मक प्रतिसादानंतर मार्ग मोकळा; लवकरच हेल्पलाईन सेवा

पुणे जिल्ह्यातील रेडी मिक्स काँक्रीट (RMC) उद्योगासमोरील पेच अखेर सुटला आहे. पुणे आरएमसी असोसिएशनने उद्या, शनिवार, ९ मे २०२६ पासून जिल्ह्यातील सर्व आरएमसी प्लांट पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर हा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून आरएमसी उद्योगाला विविध तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणींचा सामना…

Read More

हंतोडा येथे वादळी पावसामुळे वीजपुरवठा खंडित:नागरिकांनी रात्र जागून काढली, महावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात नागरिकांचा तीव्र संताप

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील हंतोडा गावात सोमवारी सायंकाळी आलेल्या वादळी पावसामुळे वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला. यामुळे गावातील नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली. महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सोमवारी अमरावती जिल्ह्याचे तापमान ४६ अंश सेल्सिअसहून अधिक होते, त्यामुळे नागरिक दिवसभर उकाड्याने त्रस्त होते. सायंकाळी अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी…

Read More

हौसेला मोल नाही:कोल्हापूरच्या हौशी सासऱ्याने अधिक मासात जावयाला दिली दीड किलो चांदीची कोल्हापुरी चप्पल; किंमत काय?

जावयावर प्रेम किती असावे, याचे अनोखे उदाहरण कोल्हापुरात पाहावयास मिळाले आहे. येथील एका हौशी सासऱ्याने आपल्या परदेशात राहणाऱ्या जावयासाठी तब्बल दीड किलो चांदीची खास कोल्हापुरी चप्पल बनवून घेतली आहे. पारंपरिक कलाकुसर व आधुनिक थाट यांचा संगम असलेल्या चप्पलीची चर्चा सध्या येथील पंचक्रोशीत रंगली आहे. हिंदू संस्कृतीत अधिक मासाला अत्यंत पवित्र व धार्मिक महत्त्व आहे. या…

Read More

स्त्री शिक्षण, बहुजनांच्या उन्नतीसाठी महात्मा फुले यांचे विचार मार्गदर्शक:काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांचे जयंतीनिमित्त प्रतिपादन‎

महात्मा फुले यांनी समाजातील वंचित, शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. शिक्षण हेच खरे परिवर्तनाचे साधन आहे, हा त्यांचा विचार आजही तितकाच प्रेरणादायी आहे. एवढेच नव्हे तर स्त्री शिक्षण, शेतकरी आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी त्या . सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाचा दीप प्रज्वलित करणारे महान समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आज, शनिवारी…

Read More