Headlines

हळदीच्या शेतातून बेपत्ता झालेल्या तरुणाचा 10 किमी अंतरावर सापडला मृतदेह:गुरुवारी होणार होता विवाह, हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील घटना

सेनगाव तालुक्यातील वायचाळ पिंपरी येथील भावी नवरदेवाचा मृतदेह 10 किलो मिटर अंतरावर असलेल्या आडगाव शिवारातील एका विहीरीत मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे वायचाळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मृतदेहावर सोमवारी ता. 11 रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी की, सेनगाव तालुक्यातील वायचाळ पिंपरी…

Read More

लेखकाला न्याय देणारी गोष्ट: समीक्षा नव्हे, जीवनच!:सामाजिक बदलासाठी लेखन; मेघना पेठेंची स्पष्टाेक्ती‎

प्रतिनिधी | सोलापूर “प्रसिद्धीसाठी नव्हे, तर समाजपरिवर्तनासाठी मी लिहित गेले. मात्र समीक्षा कधीच माझ्या वाट्याला आली नाही. पुरुष समीक्षकांना महिला लेखिकेबद्दल काहीसा संकोच असतो. खऱ्या अर्थाने लेखकाला न्याय देणारी गोष्ट म्हणजे समीक्षा नव्हे, तर जीवनच असते,” असे स्पष्ट मत मराठी साहित्यातील ठाम आणि स्वतंत्र आवाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेघना पेठे यांनी व्यक्त केले. प्रिसिजन वाचन…

Read More

शेतकऱ्यांना हमीभावाचा मोठा दिलासा:महाराष्ट्राला 29.5 लाख क्विंटल अतिरिक्त धान खरेदीची मंजुरी; रब्बी हंगामातील धान खरेदीचे उद्दिष्ट थेट 89 लाख क्विंटलवर

राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. महाराष्ट्रासाठी रब्बी हंगामातील धान खरेदीचे उद्दिष्ट केंद्र सरकारने तब्बल 29.5 लाख क्विंटलने वाढवून दिले आहे. यामुळे यंदाच्या हंगामातील एकूण धान खरेदीचे उद्दिष्ट 59.5 लाख क्विंटलवरून थेट 89 लाख क्विंटलपर्यंत पोहोचले आहे. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एक्सवर पोस्ट करत ही माहिती…

Read More

जिल्हा सहकारी बँकेत निवडून आलेले 3नवे संचालक भाजपच्या तंबूत दाखल:अध्यक्षपद मिळवण्यासाठी शिंदेसेना, भाजपमध्ये रस्सीखेच सुरू

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीने २० पैकी १८ जागा जिंकल्या असून उबाठाचे आमदार अंबादास दानवे यांनीही महायुतीच्या पॅनलमधून विजय संपादन केला. २० पैकी १९ सदस्य महायुती पॅनलचे असल्याने बँकेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष महायुतीचे होणार यात दुमत नाही. अध्यक्षपदी मिळवण्याच्या तयारीत असलेल्या भाजपला ३ सदस्य आपल्याकडे खेचण्यात यश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे २ आणि अपक्ष…

Read More

CJP Protest Jantar Mantar | NEET Paper Leak; Demand Education Minister

नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक NEET पेपरफुटीच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे जंतर-मंतरवर आंदोलन सोमवारी तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. आंदोलक शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. आंदोलनाचे नेतृत्व CJP चे संस्थापक अभिजीत दीपके आणि त्यांचे समर्थक करत आहेत. त्यांनी व्हिडिओ जारी करत म्हटले की, हजारो लोक जंतर-मंतरवर येत आहेत आणि हे आंदोलन…

Read More

रिपोर्ट- सरकार इंधनाचे दर वाढवण्याच्या तयारीत:आयात कमी करण्यावरही विचार, PMO-RBIची बैठक झाली; तेल कंपन्यांना दररोज ₹1000 कोटींचा तोटा

केंद्र सरकार परकीय चलन साठा वाचवण्यासाठी आपत्कालीन उपाययोजनांवर विचार करत आहे. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा परिणाम आणि वाढत्या तेलाच्या किमतींच्या पार्श्वभूमीवर सरकार इंधनाच्या, म्हणजेच पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढवण्याचा विचार करू शकते. टीओआयच्या बातमीनुसार, याचा उद्देश वाढत्या तेलाच्या किमतींचा परिणाम नियंत्रित करणे आणि परकीय चलन साठ्यावरील दबाव कमी करणे हा आहे. अहवालात नमूद केले आहे की, पंतप्रधान…

Read More

शेतकऱ्यांवर मोठा अन्याय:उत्पादन खर्च 20 रुपये अन् खरेदी दर फक्त साडेबारा रुपये, लासलगावातून रोहित पवार आक्रमक

केंद्र सरकारने कांद्याची खरेदी प्रतिक्विंटल 1235 रुपये (12 रुपये 35 पैसे प्रतिकिलो) या अत्यंत तोकड्या दराने करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, हा खरेदी दर अत्यंत अपुरा असल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने केंद्र सरकारच्या या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून सरकारवर जोरदार टीका केली आहे. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार…

Read More

देवांशने 44 सेकंदात 24 देशांची चलने ओळखली:लाखांदूरच्या देवांशची 'इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये नोंद

भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील देवांश शिवशंकर कलंत्री याने डोळे बंद करून ४४ सेकंदात जगातील २४ देशांची चलने अचूक ओळखण्याचा विक्रम केला आहे. या कामगिरीमुळे त्याची ‘इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. देवांशने ‘मिड ब्रेन ॲक्टिव्हेशन’ तंत्राचा वापर करून हे कौशल्य आत्मसात केले. डोळ्यांवर पट्टी बांधलेली असतानाही, समोर ठेवलेली विविध देशांची नाणी आणि नोटा तो अचूकपणे…

Read More

दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट‎:पातोंड्यात महिन्यापासून नळ कोरडे; शेवाळयुक्त पाणी पिण्याचा धोका

अकोट तालुक्यातील पातोंडा गावात पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले आहे. ग्रामस्थांना आता जीव धोक्यात घालून दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. सुमारे ६०० लोकवस्ती असलेल्या या गावात गेल्या अनेक दिवसांपासून नळ कोरडे पडले आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे गावकऱ्यांचा संताप टोकाला पोहोचला आहे. खारपान पट्ट्यातील पातोंडा गावात आधीच क्षारयुक्त पाण्याचा गंभीर प्रश्न आहे….

Read More

नगर परिषद प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे मोर्शी कॉलनीत पाणी टंचाई:नागरिकांचे नगराध्यक्षांना साकडे; आंदोलनचा दिला इशारा‎

मोर्शी येथील नगर परिषद प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे कॉलनी परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. कॉलनी परिसरात सध्या अनियमित व अशुद्ध (गढूळ) पाण्याचा पुरवठा होत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांसह परिसरातील नागरिकांनी नगरपरिषद कार्यालयावर धडक देत एक निवेदन नगराध्यक्ष प्रतीक्षाताई गुल्हाने यांना सादर केले. दरम्यान येत्या पाच दिवसात कॉलनीवासियांना मुबलक आणि शुद्ध…

Read More