Headlines

आरोग्य अन् आनंदी जीवनासाठी आयुर्वेद सर्वोत्तम जीवनशैली:आयुर्वेदिक रिसेलर्स असोसिएशनचे राज्याध्यक्ष शेखर खोले यांचे प्रतिपादन

हजारो वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेले आयुर्वेद शास्त्र हे सुरक्षित, परिणामकारक आणि दुष्परिणाममुक्त आरोग्यपद्धती आहे. आयुर्वेदाच्या माध्यमातून अनेक आजारांपासून संरक्षण मिळू शकते आणि व्यक्ती सुदृढ, निरोगी व आनंदी आयुष्य जगू शकते. त्यामुळे आयुर्वेदाचा अधिकाधिक अंगीकार करून त्याचा समाजात व्यापक प्रसार आणि प्रचार करण्याचा तसेच नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय विशेष सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आला. आयुर्वेद…

Read More

वाडीतील 400 मीटर रस्त्याचे काम वर्षभर रखडले:कंत्राटदाराच्या दिरंगाईमुळे नागरिक त्रस्त, वाहतूक कोंडी

वाडी नगरपरिषद अंतर्गत येणाऱ्या ऍटोमिक एनर्जी डेपो रोडवरील ४०० मीटर लांबीच्या सिमेंट रस्त्याचे बांधकाम वर्षभरातही पूर्ण झालेले नाही. कंत्राटदाराच्या दिरंगाईमुळे आणि नगरपरिषदेच्या निष्क्रियतेमुळे स्थानिक रहिवासी, बँकांचे ग्राहक आणि शाळकरी मुले त्रस्त झाली आहेत. या अपूर्ण कामामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आमदार समीर मेघे यांच्या हस्ते ३० मे २०२५ रोजी या रस्त्याचे भूमिपूजन…

Read More

आता भारतातच बनवले जातील तेजस फायटर जेट इंजिन:यूएस कंपनी जीई एरोस्पेस आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स दरम्यान तांत्रिक करार पूर्ण

अमेरिकन संरक्षण कंपनी जीई एरोस्पेस आणि भारताची सरकारी कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) यांच्यात फायटर जेट इंजिन बनवण्याचा करार लवकरच पूर्ण होऊ शकतो. दोन्ही कंपन्यांनी लढाऊ विमानांसाठी एफ४१४ जेट इंजिनच्या सह-उत्पादनासंदर्भात तांत्रिक बाबींवर सहमती दर्शवली आहे. मंगळवारी कंपनीने सांगितले की, गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या चर्चेत आता मोठी प्रगती झाली आहे. जीई एरोस्पेस आणि एचएएल…

Read More

पुण्यात 37 सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई:लैंगिक अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना 15 दिवस ते 1 महिना कोठडीत टाकणार!

पुणे शहरात महिला आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. मागील 10 वर्षांतील गुन्हेगारी नोंदी तपासल्यानंतर शहरात 37 असे सराईत गुन्हेगार आढळले आहेत, ज्यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. या सर्व 37 गुन्हेगारांवर मंगळवारपासून प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे अतिरिक्त…

Read More

Protesters Attack CRPF Camp; 2 Dead in Retaliation

इंफाळ2 दिवसांपूर्वी कॉपी लिंक मणिपूरच्या बिष्णुपूर जिल्ह्यातील मोइरांग ट्रोंगलाओबी परिसरात सोमवारी रात्री उशिरा दहशतवाद्यांनी एका घरावर बॉम्ब फेकला. ज्यात 5 वर्षांच्या मुलाचा आणि सहा महिन्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, जेव्हा घरात बॉम्ब फुटला, तेव्हा मुले त्यांच्या आईसोबत बेडरूममध्ये झोपली होती. आई जखमी आहे. स्थानिक लोकांनी घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी सकाळी आंदोलन केले. परिसरात…

Read More

सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांना टोला:एका तालुक्याचा विकास म्हणजे महाराष्ट्राचा विकास नाही; कंत्राटदारांच्या अधिवेशनाची क्लिपही पाठवणार

कोल्हापूर जिल्ह्यातील विकासकामांच्या असमतोलावरून काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जिल्हा नियोजन समितीचा (डीपीडीसी) निधी केवळ सत्ताधाऱ्यांच्या मतदारसंघात खर्च केला जात असून विरोधी पक्षांच्या मतदारसंघांना जाणीवपूर्वक डावलले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. “एका तालुक्याचा विकास झाला म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राचा विकास झाला, असे होत नाही,” असा खोचक टोला त्यांनी वैद्यकीय शिक्षण…

Read More

केआरए ज्वेलर्सने माउलींच्या पालखीसाठी घडवला चांदीचा रथ:आधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेला, वजन 2.8 टन

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पालखी सोहळ्यासाठी केआरए ज्वेलर्सने शुद्ध चांदीचा एक आधुनिक रथ तयार केला आहे. परंपरा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा संगम साधत बनवलेला हा रथ 8 जुलै रोजी पालखी प्रस्थान सोहळ्यात दाखल होईल. या रथाचे वजन कमी केल्यामुळे यंदाच्या सोहळ्यात बैलांना रथ ओढणे अधिक सोपे होणार आहे. केआरए ज्वेलर्सचे विपुल अष्टेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रथाची…

Read More

‘भारत’ लिहिलेल्या 21 हजार तिळांद्वारे साकारला विठ्ठल:पंढरपुरात दुसऱ्या ‘अक्षर संमेलना’चा शुभारंभ; सूक्ष्म कलाकृती व चित्रनिर्मितीने रसिक मंत्रमुग्ध

सावळ्या विठुरायाच्या नगरीत आजपासून तीन दिवसीय दुसऱ्या ‘अक्षर संमेलना’चा अत्यंत उत्साहात आणि दिमाखात शुभारंभ झाला. राज्यभरातील अक्षरप्रेमी कलावंत, साहित्यिक आणि रसिकांच्या उपस्थितीने श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयाचा संमेलन परिसर गजबजून गेला आहे . या संमेलनाला पहिल्याच दिवशी पंढरपूर आणि परिसरातील नागरिकांनी, तसेच लांबून आलेल्या विठ्ठल भक्तांनी व कलाप्रेमींनी मोठी गर्दी केली. विद्यार्थ्यांसह अक्षरप्रेमी नागरिक, महिला, तरुण…

Read More

खरीप आढावा बैठकीत अंबादास दानवेंचा आक्रमक पवित्रा:खतटंचाई आणि बियाणे लिंकिंगवरून प्रशासनाला इशारा; कर्जमाफीवरूनही सरकारवर टीका

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात शुक्रवार, 15 मे रोजी खरीप हंगामपूर्व तयारी आढावा संपन्न झाली. या बैठकीत शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई, पीक कर्ज वितरणातील अडचणी आणि बियाण्यांच्या संभाव्य लिंकिंगप्रकाराचा मुद्दा उपस्थित करत खरीप हंगामात खतटंचाई आणि पीक कर्जाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो…

Read More

यूपीचा तरुण अमेरिकन हल्ल्यात ठार:होर्मुझमध्ये जहाजावर होते, वडिलांना म्हणाले होते – लवकर परतेन; पत्नी बेशुद्ध, आईच्या डोळ्यांतील पाणी थांबेना

उत्तर प्रदेशातील देवरिया येथील रहिवासी शिवानंद चौरसिया (३८) यांचा होर्मुज सामुद्रधुनीजवळ अमेरिकेच्या हल्ल्यात मृत्यू झाला. ते सिंगापूरच्या ‘एमटी सेत्तेबेल्लो’ जहाजावर होते. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी याची पुष्टी केली आहे. शिवानंद जहाजावर इंजिन फिटर होते आणि ९ महिन्यांपूर्वी परदेशात गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी जहाज होर्मुजजवळून जात असताना, अमेरिकेने हल्ला केला. त्यात शिवानंद यांचा मृत्यू…

Read More