Headlines

शिक्षणाला महत्व जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाने यश मिळेल:स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा केला सन्मान

प्रतिनिधी|अहिल्यानगर आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले असून स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रम यांच्या जोरावर यश संपादन करता येते, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. राजमुद्रा करिअर अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते….

Read More

'सर्व्हिसायटिस' वंध्यत्वाचे कारण ठरू शकतो:महिलांनी सर्व्हिक्सच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये, तज्ज्ञांचा इशारा

महिलांच्या आरोग्यामध्ये गर्भाशयाचे मुख म्हणजेच ‘सर्व्हिक्स’ अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, अनेकदा असामान्य स्त्राव, अनियमित रक्तस्त्राव किंवा ओटीपोटात होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष केले जाते. हे दुर्लक्ष ‘सर्व्हिसायटिस’ सारख्या गंभीर आजाराचे निमंत्रण ठरू शकते, असा इशारा प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुजाता उदय राजपूत यांनी दिला आहे. ‘सर्व्हिसायटिस’ म्हणजे काय? सर्व्हिक्स हा योनीमार्गाला गर्भाशयाशी जोडणारा भाग आहे. या…

Read More

धर्मांध शक्ती सत्तेत असल्याने महाराष्ट्रात बुवाबाजीला खतपाणी:विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर निशाणा; दाभोलकरांची काढली आठवण

धर्मांध शक्ती सत्तेत असल्यामु्ळे महाराष्ट्रात अघोरी विद्या, कर्मकांड व बुवाबाजीचे स्तोम माजल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. या प्रकरणी त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी स्वतःचे बलिदान देणाऱ्या दिवंगत नरेंद्र दाभोलकर यांची आठवण काढली आहे. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानानंतरही महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची अंमलबजावणी होत नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे, असे ते म्हणालेत. भोंदू…

Read More

आता पुन्हा 'पवार विरुद्ध पवार' लढाई नको:एकमेकांविरुद्ध लढलो त्याचं दु:ख, रोहित पवारांच्या विधानावर युगेंद्र पवारांचे मत

दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या जागेसाठी आज पोटनिवडणूक पार पडत आहे. या निमित्ताने गेल्या काही काळापासून दुभंगलेले पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र, असे असतानाच २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा ‘पवार विरुद्ध पवार’ असा सामना रंगण्याची शक्यता आमदार रोहित पवार यांनी वर्तवल्याने राजकीय वर्तुळात…

Read More

चांदी आज ₹1,214 ने वाढून ₹2.51 लाखांवर पोहोचली:सोने ₹347 ने वाढून ₹1.52 लाख, या वर्षी सोने 19 हजार रुपयांनी महागले

आज म्हणजेच 20 एप्रिल रोजी सोने-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 347 रुपयांनी वाढून 1.52 लाख रुपयांवर पोहोचला आहे. तर, एक किलो चांदीचा भाव 1,214 रुपयांनी वाढून 2.51 लाख रुपयांवर पोहोचला आहे. कॅरेटनुसार सोन्याची किंमत देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याची किंमत स्रोत: goodreturns 20…

Read More

weather MP rajasthan Maharashtra gujarat heatwave UP bihar Uttarakhand rain snowfall

Marathi News National Weather MP Rajasthan Maharashtra Gujarat Heatwave UP Bihar Uttarakhand Rain Snowfall भोपाळ/जयपूर/लखनऊ/पाटणा26 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशात दोन प्रकारचं हवामान पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज-अयोध्यासह 30 जिल्ह्यांमध्ये बुधवारी वादळामुळे 56 लोकांचा मृत्यू झाला. सर्वाधिक 17 मृत्यू प्रयागराजमध्ये आणि 16 मृत्यू भदोहीमध्ये झाले. येथे 80 KMPH वेगाने वादळ आले. राज्यातील बांदा शहरात तापमान…

Read More

जीवनामधील संकटांचा सामना करण्याचा संदेश रामायणाने दिला:डॉ. विश्वास यांचे प्रतिपादन, श्रीराम कथा सोहळ्याला भाविकांचा प्रतिसाद‎

आजची तरुण पिढीच नव्हे तर एकूणच समाजमन एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) या मायावी समस्येशी संघर्ष करत आहे. या तंत्रज्ञानाने अनेकांचे काम हिरावून घेतले गेले आहे. चुकीच्या व्हिडिओद्वारे समाजमन कलुषित केले जात आहे पण या धोक्यातून वाचण्याचा उपाय राम कथेत आहे. तरुण पिढीने किंबहुना सर्वांनीच रामचरित मानस वाचले तर रामायण काळातील मायावी शक्तींना प्रभू श्रीरामांनी कसे नेस्तनाबूत…

Read More

खरातने सांगितले मित्र जिवंतय, पण दुसऱ्याच दिवशी मृतदेह सापडला:शिवाजी सहाणेंनी सांगितला किस्सा; दमानियांच्या आरोपांवर स्पष्टीकरण

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणात नाव जाहीर केल्यानंतर माजी आमदार शिवाजी सहाणे यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना खरातची भविष्यवाणी कशी फोल ठरली, याचा खुलासा केला आहे. आपला एक मित्र बेपत्ता असताना त्याच्या शोधासाठी आपण खरातशी संपर्क साधला होता. त्यावेळी खरातने तो मित्र सुखरूप असल्याचे सांगितले होते, मात्र दुर्दैवाने दुसऱ्याच दिवशी त्या…

Read More

आमदार इद्रीस नायकवाडींनी राजीनाम्याच्या चर्चा फेटाळल्या:म्हणाले- अजितदादांनी विधानसभेच्या तयारीला लागायला सांगितले होते

राज्यपालनियुक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार इद्रीस नायकवाडी यांच्या राजीनाम्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा असून, पक्षानेच त्यांना राजीनामा देण्याचे निर्देश दिल्याचे बोलले जात आहे. मात्र, नायकवाडी यांनी या चर्चा फेटाळून लावत, पक्षाकडून किंवा कोणत्याही नेत्याकडून आपल्याला राजीनाम्याबाबत सांगण्यात आले नसल्याचे आणि उद्या होणाऱ्या पक्षाच्या बैठकीत आपण यावर चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना…

Read More

मुंबई-सातारा महामार्गावर कारला भीषण आग:स्वामीनारायण मंदिराजवळ दुर्घटना, सर्व प्रवासी सुखरूप; वाहतूक सुरळीत करण्याचे पोलिसांचे प्रयत्न

पुण्यातील सातारा-मुंबई महामार्गावर स्वामीनारायण मंदिराजवळ एका चारचाकी वाहनाला (क्रमांक MH 43-CG-4068) भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली. या आगीत संबंधित वाहन पूर्णपणे जळून खाक झाले असले तरी, वाहनातील सर्व प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने सुदैवाने कोणताही अनर्थ घडला नाही. दरम्यान, या घटनेमुळे महामार्गावर काही काळ विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. घटनेचे…

Read More