Headlines

नितीन गडकरींची इथेनॉलवरून सोशल मीडियावर बदनामी:युट्यूबर मनीष कश्यपसह चौघांवर गुन्हा दाखल

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याप्रकरणी बिहारच्या एका युट्यूबरला मोठा फटका बसला आहे. इथेनॉल निर्मितीच्या मुद्द्यावरून मंत्र्यांची बदनामी केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी युट्यूबर मनीष कश्यपसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नागपूर सोशल मीडिया सेलचे पदाधिकारी शिशिर त्रिपाठी, संपत पांडे आणि आदित्य जुमा यांनी…

Read More

बोगस बियाणे प्रकरणात 18 कंपन्यांवर कारवाईचा बडगा:30 जुलैपूर्वी कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात, कृषिमंत्र्यांची घोषणा; पावसाबाबतही दिली अपडेट

राज्यातील बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणात सरकारने कडक भूमिका घेतली असून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या 18 बियाणे कंपन्यांविरोधात कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी त्यांनी कर्जमाफी, पावसाची स्थिती, पिकांचे नुकसान आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत चर्चांवरही भूमिका स्पष्ट केली. भरणे म्हणाले की, राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी पेरलेले सोयाबीन बियाणे…

Read More

सुनेत्रा पवारांची अध्यक्षपदी निवड कायदेशीरच:सच्चिदानंद सिंह यांच्या नोटिशीवर सुनील तटकरेंचे स्पष्टीकरण, म्हणाले- पक्षात कोणताही असंतोष नाही

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार यांच्या झालेल्या निवडीला पक्षातूनच आव्हान देण्यात आल्याने खळबळ उडाली होती. मात्र, आता यावर पक्षाचे नेते सुनील तटकरे यांनी पहिली प्रतिक्रिया देत पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. ‘सुनेत्रा पवार यांची निवड पूर्णपणे कायदेशीर असून, सच्चिदानंद सिंह यांनी पाठवलेल्या नोटिशीत कोणतेही तथ्य नाही’, असा दावा तटकरे यांनी केला आहे. नेमके…

Read More

शत्रुघ्न सिन्हा यांनी फोटो काढताना चाहत्याला फटकारले:म्हणाले- हात खाली करा, चाहता अस्वस्थ होऊन बाजूला सरकला, यापूर्वीही असे केले होते

ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे, ज्यात त्यांनी एका चाहत्याला हात खाली करायला सांगितले. यानंतर तो चाहता अभिनेत्याच्या जवळून निघून गेला. खरं तर, हा व्हिडिओ आकांक्षा रंजन कपूर आणि चित्रपट निर्माता शरण शर्मा यांच्या वेडिंग रिसेप्शनचा असल्याचे सांगितले जात आहे. कार्यक्रमातून बाहेर पडताना शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत एका चाहत्याने फोटो…

Read More

दिव्यांगांवर टिप्पणी- कॉमेडियन समय रैनावर 3 लाख दंड:सुप्रीम कोर्टाने म्हटले- आम्ही स्वातंत्र्य दिले जेणेकरून सुधारणा होईल पण काही झाले नाही, आमची दिशाभूल केली

सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी स्टँड-अप कॉमेडियन आणि यूट्यूबर समय रैना, रणवीर अलाहाबादिया, विपुल गोयल, बलराज परमजीत सिंग घई, सोनाली ठक्कर, निशांत जगदीश तंवर यांच्यावर ३ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. न्यायालयाने दिव्यांगांवर केलेल्या वादग्रस्त टिप्पणीच्या प्रकरणात हा आदेश दिला आहे. याची सुनावणी CJI सूर्यकांत, जॉयमाल्या बागची आणि व्ही. मोहन यांच्या खंडपीठाने केली. खंडपीठाने म्हटले की, आमच्या…

Read More

मराठी साहित्याचा जागर!:नाशिकच्या ‘अक्षरबंध प्रतिष्ठान’तर्फे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांचे आयोजन; 30 जुलैपर्यंत प्रवेशिकांचे आवाहन

मराठी साहित्य क्षेत्रात सातत्याने दर्जेदार लेखन करून ते समृद्ध करणाऱ्या लिहित्या हातांचा सन्मान करण्यासाठी नाशिकच्या अक्षरबंध प्रतिष्ठानच्या वतीने द्विवार्षिक राज्यस्तरीय ‘अक्षरबंध’ साहित्य पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले आहे. या पुरस्कारांची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीण जोंधळे यांनी दिली. या राज्यस्तरीय उपक्रमांतर्गत दर दोन वर्षांनी आठ वेगवेगळ्या साहित्य प्रकारांतील उत्कृष्ट साहित्यकृतींचा गौरव केला जातो. पुरस्काराचे स्वरूप रोख ₹३,०००…

Read More

बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल 38.72 टक्के जाहीर:विज्ञान शाखेची आघाडी, मुलींनी मारली बाजी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जून-जुलै २०२६ मध्ये घेतलेल्या इयत्ता १२ वीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेचा एकूण निकाल ३८.७२ टक्के लागला आहे. राज्यभरातून १,०२,०५० विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी ३९,५१८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदाच्या निकालात मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ४३.८८ टक्के असून, मुलांच्या…

Read More

MPSC ऑनलाइन परीक्षा लादणार नाही:मुख्यमंत्र्यांचे आश्वासन, आंदोलन स्थगित

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा पद्धतीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत विद्यार्थी प्रतिनिधींची सकारात्मक बैठक झाली. या बैठकीनंतर विद्यार्थ्यांनी पुण्यात आयोजित केलेला मोर्चा तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ऑनलाईन परीक्षा पद्धत विद्यार्थ्यांवर लादली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. पोलिस प्रशासनाच्या समन्वयातून आयोजित ही बैठक सुमारे अर्धा तास चालली. यामध्ये एमपीएससीच्या परीक्षा पद्धती आणि…

Read More

Supreme Court Refuses Ban On CBSE Three Language Policy

नवी दिल्ली9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी (14 जुलै) सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) च्या त्रि-भाषा धोरणावर बंदी घालण्यास नकार दिला. हे धोरण सध्याच्या 2026-27 सत्रापासून लागू करण्यात आले आहे. भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांचे खंडपीठ या प्रकरणावर बुधवारी सुनावणी करणार आहे. याचिकाकर्त्यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे…

Read More

पंढरपुरात 15 दिवस मटण-मांस विक्रीवर कडक बंदी:आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा मोठा निर्णय

आषाढी वारीच्या निमित्ताने विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन पंढरीत दाखल होणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भाविकांच्या धार्मिक भावनांचा आदर करत, पंढरपूर शहर आणि नजीकच्या परिसरात १५ जुलै ते २९ जुलै असे सलग १५ दिवस मांस आणि मटण विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास थेट कारवाई सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री…

Read More