Headlines

लेफ्टनंट जनरल एनएस राजा सुब्रमणी असतील देशाचे नवे CDS:30 मे रोजी सध्याचे CDS अनिल चौहान निवृत्त होतील

भारत सरकारने एनएस राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) म्हणून नियुक्ती केली आहे. ते संरक्षण व्यवहार विभागाच्या सचिवांची जबाबदारीही सांभाळतील. सध्याचे CDS अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे. सुब्रमणी सध्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालय (NSCS) मध्ये लष्करी सल्लागार आहेत. यापूर्वी त्यांनी भारतीय सैन्यात व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ…

Read More

महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष:समता परिषदेचा ‘समता चित्ररथ’ नागपुरात दाखल; संविधान चौकात नागरिकांची मोठी गर्दी

क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती महोत्सवाचे औचित्य साधून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने तयार केलेला विशेष ‘समता चित्ररथ’ शनिवारी (16 मे) नागपूर शहरात दाखल झाला. रविवार, 17 मे रोजी सकाळी 9 वाजता हा चित्ररथ संविधान चौकात नागरिकांच्या दर्शनासाठी आणण्यात आला. यावेळी शिव-शाहू-फुले-आंबेडकरप्रेमी नागरिकांनी दर्शनासाठी आणि स्वागतासाठी मोठी गर्दी केली होती. केंद्र आणि…

Read More

कोणाची तरी 'वाट' लावण्यासाठीच खरात प्रकरण बाहेर काढले:शेतकऱ्याला नाही, पण खरातला पाणी मिळतंय – राज ठाकरे

नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण राज्याचे राजकारण ढवळून निघाले असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या प्रकरणावर पहिल्यांदाच आपली परखड प्रतिक्रिया दिली आहे. “हे प्रकरण म्हणजे कोणाची तरी वाट लावण्यासाठी जाणीवपूर्वक बाहेर काढलेली खेळी आहे,” असे सांगतानाच त्यांनी पत्रकारितेच्या बदलत्या स्वरूपावर आणि ‘विकल्या गेलेल्या’ यंत्रणेवरही जोरदार प्रहार केला. एका व्यंगचित्राच्या कार्यक्रमात बोलताना…

Read More

अमरावतीत पदपथांवर अतिक्रमण; पादचाऱ्यांना अडचण:महापालिकेच्या कारवाईनंतरही दुकानदार पुन्हा मांडतात बस्तान

अमरावती शहरातील पदपथ पादचाऱ्यांसाठी असले तरी, त्यांची स्थिती चिंताजनक आहे. अनेक ठिकाणी पदपथांवर दुकाने थाटल्याने पायी चालणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे पादचाऱ्यांनी चालायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील बहुतेक प्रमुख रस्त्यांच्या कडेला पदपथ तयार करण्यात आले आहेत. महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महामार्ग विकास प्राधिकरण यांसारख्या यंत्रणांनी रस्ते बांधताना…

Read More

बेगमपुऱ्याच्या इतिहासाची हेरिटेज वॉकमध्ये उलगडली पाने:थत्ते हौद ते कुंभारगल्ली : बेगमपुरा हेरिटेज वॉकमध्ये 250 हून अधिक नागरिकांची ऐतिहासिक सफर

ऐतिहासिक वारसा जपणे आणि नागरिकांमध्ये शहराच्या संस्कृतीबद्दल जनजागृती निर्माण करणे, या उद्देशाने रविवारी (१७ मे) सकाळी ‘बेगमपुरा हेरिटेज वॉक’चे अत्यंत उत्साहात आयोजन करण्यात आले होते. महानगरपालिका आणि ‘इन्टॅक’ यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जुन्या शहराच्या वेशीबाहेर वसलेल्या बेगमपुरा भागातील जिवंत इतिहासाचा अनुभव घेण्यासाठी तब्बल २५० हून अधिक सजग नागरिक या सफरीमध्ये…

Read More

राजस्थानमधील बाडमेरमध्ये तापमान 48°C च्या वर:बरेलीमध्ये वादळामुळे धावत्या गाड्यांवर झाडे-खांब कोसळले; बिहार-महाराष्ट्रात 10 मृत्यू

राजस्थानमध्ये मंगळवारी विक्रमी उष्णता होती. या हंगामात पहिल्यांदाच तापमान 48°C च्या वर पोहोचले. बाडमेर देशातील सर्वात उष्ण शहर ठरले, जिथे कमाल तापमान 48.3°C नोंदवले गेले. फलोदीमध्ये 46.4°C, जैसलमेरमध्ये 45.8°C, चित्तोडगडमध्ये 45.6°C आणि बिकानेरमध्ये 45°C तापमान होते. मध्य प्रदेशात दोन प्रकारचे हवामान दिसून आले. एकीकडे रतलाम सलग तिसऱ्या दिवशी राज्यातील सर्वात उष्ण शहर ठरले. येथे पारा…

Read More

Rupees All Time Low Vs Dollar; INR USD Exchange Rate 2026

नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतीय रुपया आज, म्हणजेच 30 एप्रिल रोजी, डॉलरच्या तुलनेत 95.20 च्या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. मध्यपूर्वेतील युद्ध आणि ऊर्जा पुरवठ्यातील अडथळ्यांमुळे ही घसरण झाली. परदेशी ब्रोकरेज फर्म बर्नस्टीननुसार, इराण युद्ध सुरू राहिल्यास रुपया 98 पर्यंत जाऊ शकतो. परदेशी गुंतवणूकदारांच्या (FPI) सततच्या विक्रीमुळे आणि जागतिक स्तरावर वाढलेल्या व्यापारी तणावामुळे रुपयात…

Read More

RTI कार्यकर्त्याची दगडाने ठेचून निर्घृण हत्या:मंडळ अधिकाऱ्याच्या डोळ्यांदेखत घडला थरार, विरारमधील घटनेने खळबळ

पालघर जिल्ह्यातील विरार पूर्व येथील शिरगाव परिसरात एका खदानीत आरटीआय कार्यकर्ते आत्माराम पाटील यांची दगडाने ठेचून अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. विशेष म्हणजे, हे भीषण हत्याकांड मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील यांच्या डोळ्यांदेखत घडले असून, हल्लेखोरांनी त्यांनाही जखमी करत त्यांच्या शासकीय वाहनाची मोठी तोडफोड केली आहे. याप्रकरणी खदान मालक महेश भोईर याचे…

Read More

रामायणाच्या पहिल्या भागात राम-रावण यांचा संघर्ष होणार नाही:रावणाची भूमिका साकारणारे यश म्हणाला- पहिल्या भागात रणबीरसोबत माझा कोणताही सीन नाही

नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटात रावणाची भूमिका साकारणारा अभिनेता यशने खुलासा केला आहे की, चित्रपटाच्या पहिल्या भागात त्याचा आणि राम बनलेल्या रणबीर कपूरचा कोणताही सीन एकत्र नसेल. यशने सांगितले की, पहिल्या भागात दोन्ही पात्रांना त्यांच्या-त्यांच्या राज्यांमध्ये दाखवले जाईल, त्यामुळे पडद्यावर कोणताही फेस-ऑफ (आमना-सामना) होणार नाही. रावणाचे स्वतःचे साम्राज्य असेल, रामाचे स्वतःचे अलीकडेच यश आणि चित्रपटाचे…

Read More

संभाजीनगरचा प्रोझोन माॅल रहेजा समूह खरेदी करणार:1300 कोटींचा व्यवहार, कोइम्बतूरच्या मॉलचाही समावेश

‘के रहेजा कॉर्प’ समूहाचा भाग असलेल्या ‘इनॉर्बिट मॉल्स’ने शहरातील ‘प्रोझोन मॉल’ खरेदी करण्याची तयारी केली आहे. रहेजा समूह संभाजीनगरसह कोइम्बतूर येथील मॉल खरेदी करणार असून हा व्यवहार १,३०० कोटी रुपयांचा आहे. ‘प्रोझोन रिअल्टी’ने शेअर बाजाराला या संदर्भात माहिती दिली आहे. तज्ज्ञांच्या मते, या व्यवहारामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात. तसेच ऑपरेशन्स व…

Read More