Headlines

पाणी पेटले!‎:उमरी, गुडधीवासीय आक्रमक, आंदाेलनासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पुढाकार‎

प्रतिनिधी | अकोला ग्रामीण भागाप्रमाणेच आता शहरातील पिण्याच्या पाण्याचा मुद्दा पेटला असून शुक्रवारी हद्दवाढ भागातील नागरिकांनी भरउन्हात रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले. २०-२५ दिवसांनीही पाणीपुरवठा होत नसून टँकरही नियमित येत नसल्याचे म्हणत महिलांनी महापालिकेच्या अभियंत्यांना धारेवर धरले. महिलांनी उन्हातच तीन ठिकाणी नादुरुस्त असलेल्या हॅन्डपंपपर्यंत अभियंत्यांनाही भर उन्हात पायी फिरवले. हॅन्डपंपांत पाइपच नसल्याने त्यातून पाणी आले नाही….

Read More

भगवान चवलेंनी माउंट धौलागिरी केले सर:जगातील सातवे उंच शिखर पादाक्रांत, अनेक अष्टहजारी शिखरेही समिट

पुण्यातील गिर्यारोहक भगवान चवले यांनी जगातील सातवे सर्वात उंच शिखर माउंट धौलागिरी यशस्वीरित्या सर केले आहे. १८ एप्रिल २०२४ रोजी त्यांनी हे शिखर पादाक्रांत केले. मुळशी तालुक्यातील टेमघर धरणाच्या पायथ्याशी असलेल्या लव्हार्डे येथील रहिवासी असलेले चवले हे एलआयसीमध्ये विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. धौलागिरी हे ८,१६७ मीटर (२६,७९५ फूट) उंचीचे शिखर पश्चिम-मध्य नेपाळमध्ये स्थित आहे….

Read More

धनुर्धर यशदीप भोगे, कुमकुम मोहोड भारतीय धनुर्विद्या संघात झाले दाखल:जपान येथील आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवड, सर्वत्र कौतुक‎

प्रतिनिधी | अमरावती जपानच्या ऐची-नागोया शहरात १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय रिकर्व धनुर्विद्या संघात अमरावतीचे आंतरराष्ट्रीय धनुर्धर यशदीप भोगे व कुमकुम मोहोड या दोघांचा समावेश झाल्यामुळे शहराच्या क्रीडा वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे. यशदीप पुरुष तर कुमकुम महिला संघाची सदस्य आहे. कुमकुमने नुकत्याच चीनमध्ये झालेल्या विश्वचषक…

Read More

शाळेत लावली कृत्रिम घरटी अन् अवतरली चिऊताई:वडगाव आनंद शाळेत पक्षी संवर्धनाचा आदर्श उपक्रम; चिऊताईने जिंकली चिमुकल्यांची मने‎

शाळेत लावली कृत्रिम घरटी अन् अवतरली चिऊताई:वडगाव आनंद शाळेत पक्षी संवर्धनाचा आदर्श उपक्रम; चिऊताईने जिंकली चिमुकल्यांची मने‎ Source link

Read More

प्रमुख रस्त्यांवर खड्डे कायम,‎ रस्ते पॅचिंगकडे मनपाचे दुर्लक्ष‎:आंदोलनाच्या इशाऱ्याचा नगरसेवकांना विसर‎

प्रतिनिधी | अहिल्यानगर मध्य शहर व उपनगरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर, अंतर्गत रस्त्यांवर अद्यापही खड्डे कायम आहेत. पावसाळा १५ दिवसांवर येऊन ठेपला आहे. तरीही महापालिकेने खड्डे बुजविण्यास सुरुवात केलेली नाही. सावेडी उपनगरातील भाजप नगरसेवकांनी दहा दिवसांपूर्वी महापालिकेला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशाऱ्याचा नगरसेवकांना विसर पडला आहे. परिणामी, नागरिकांना अद्यापही खड्ड्यांचे दणके सोसावे लागत…

Read More

‘तुमचं बरोबर आहे’ या मंत्राने कटू प्रसंग टळतात:मन करा रे प्रसन्न’ विषयावर डॉ. संजय उपाध्ये यांचे व्याख्यान‎

मनाचा थांग भल्याभल्यांना लागत नाही. संत तुकाराम, समर्थ रामदास, संत ज्ञानेश्वर अशा अनेक संतांनी मनाचे महत्त्व सांगितले आहे. आयुष्याच्या प्रवासात चढ-उतार येणारच. पण प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा मनाची प्रसन्नता ठेवता येते हे संतांनी दाखवून दिले आहे. स्वतःबद्दलचे अवास्तव भ्रम, अहंकार, द्वेष, मत्सर या गोष्टी मनाच्या आरोग्याला बाधक आहेत. ‘तुमचे बरोबर आहे’ हा महामंत्र लक्षात ठेवला तर…

Read More

मावसगव्हाणच्या शेतकऱ्यांनी केला शेताकडे जाणारा रस्ता काटेरी मुक्त:शेतकऱ्यांनी एकत्र येत प्रश्न स्वतःच्या पुढाकाराने सोडवला

प्रतिनिधी | लोहगाव प्रकल्पग्रस्त मावसगव्हाण गावापासून जवळच असलेल्या नाथसागर जलफुगवटा क्षेत्राकडे जाणारा रस्ता काटेरी झाडांपासून मोकळा करण्यात आला असून या कामासाठी मावसगव्हाण येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत नाथसागराच्या जलफुगवटा क्षेत्राकडे जाणाऱ्या रस्त्यालगत वाढलेल्या काटेरी झाडांचा प्रश्न स्वतःच्या पुढाकाराने सोडवला. हा रस्ता शेतकऱ्यांच्या शेतातील शेतीला पाणी देण्यासाठी विद्युत पंप चालू करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून अनेक दिवसांपासून काट्यांमुळे…

Read More

अमरावतीत रोज 64 जणांना श्वानदंश:मोकाट श्वानांसाठी निवारा केंद्र अद्यापही नाही

अमरावती जिल्ह्यात मोकाट श्वानांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दररोज सरासरी ६४ नागरिकांना श्वानदंश होत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. महापालिकेकडून भटक्या श्वानांसाठी निवारा केंद्र उभारणीला अद्याप गती मिळालेली नाही, त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. गेल्या आर्थिक वर्षात जिल्ह्यात एकूण २३,३९९ नागरिकांनी सरकारी रुग्णालयांमध्ये श्वानदंशावर उपचार घेतले आहेत. ही आकडेवारी केवळ सरकारी रुग्णालयांमधील असून, खाजगी…

Read More

वृंदावन दुर्घटना, शेवटच्या 7 मिनिटांची कहाणी:कीर्तन सुरू होते; नाव खांबाला धडकली आणि उलटली; 13 जणांचा मृत्यू, 3 जणांचा शोध सुरू

“मी स्वतः माझ्या कुटुंबाला बुडताना पाहत राहिलो आणि काहीही करू शकलो नाही. अपघातात मी माझा मुलगा, पत्नीसह कुटुंबातील 9 सदस्य गमावले. काही मिनिटांतच आनंदाने भरलेला प्रवास शोकात बदलला. आमचे जग उद्ध्वस्त झाले.” हे सांगताना, वृंदावनमधील नाव अपघातात आपल्या प्रियजनांना गमावलेले आणि स्वतः त्याच बोटीत असलेले विजय कुमार रडू लागतात. 10 एप्रिल रोजी हा अपघात झाला….

Read More

कामगार दिनी विद्युत भवनामध्ये लाईनमनच्या पुतळ्याचे अनावरण:‘गुणवंत कामगार’ पुरस्काराने केले सन्मानित‎

प्रतिनिधी| अकोला महाराष्ट्र दिन आणि जागतिक कामगार दिनाच्या औचित्याने महावितरण कंपनीच्या अकोला परिमंडळात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महावितरणचा कणा मानल्या जाणाऱ्या लाईनमनच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण विद्युत भवन येथे मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच परिमंडळातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ४५ तांत्रिक कर्मचाऱ्यांना ‘गुणवंत कामगार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्युत भवन येथे आयोजित…

Read More