Headlines

नागपुरात कॅफेच्या आड हुक्का पार्लरवर मध्यरात्री धाड:‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

नागपूर शहर पोलिसांनी ‘ऑपरेशन थंडर’ मोहिमेअंतर्गत मानवनगर परिसरातील ‘नेटफ्लिक्स अँड चिल कॅफे’वर मध्यरात्री धाड टाकून हुक्का पार्लरचा पर्दाफाश केला. या कारवाईत पोलिसांनी 82,995 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून 19 ग्राहकांवर कारवाई केली आहे. 9 आणि 10 मेच्या मध्यरात्री रंगला पंजाब रेस्टॉरंटजवळील या कॅफेवर छापा टाकण्यात आला. त्यावेळी सोहेल खान फिरोज खान (22) याच्यासह कर्मचारी आणि…

Read More

भाजपने पोलिंग एजंटही परीक्षा घेऊन तयार केले:काही भागांतून बाहेर पडून भाजप संपूर्ण राज्यात गेला; जनतेने 'बंगाली अस्मिते'ऐवजी 'डबल इंजिन' निवडले

बंगालने तृणमूल काँग्रेस (टीएमसी) च्या ‘बंगाली अस्मिता’ या कथानकाऐवजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘डबल इंजिन’च्या आश्वासनाला पसंती दिली. कमळाच्या वादळात तृणमूल अक्षरशः गवताच्या काड्यांप्रमाणे उडून गेली. भाजप दीर्घकाळापासून संघटनात्मक स्तरावर तयारी करत होती. मतदान प्रतिनिधी निवडण्यासाठी तोंडी आणि लेखी परीक्षाही घेण्यात आल्या होत्या. गेल्या सहा महिन्यांपासून पक्षाचे लक्ष दोन उद्दिष्टांसह जमिनीवरील नेटवर्कवर होते. पहिले, ग्रामीण भागातील…

Read More

राज्यात मुख्यमंत्रिपदासाठी आज सर्व्हे केला तर एकनाथ शिंदेंना जास्त पसंती:शिवसेना आमदार बच्चू कडूंचा मोठा दावा, म्हणाले- थेट जनतेच्या दरबारात जाऊ!

महाराष्ट्रात आज जरी कोणी मुख्यमंत्रिपदासाठी सर्व्हे केला, तरी जनतेच्या मनातून केवळ एकनाथ शिंदे यांचेच नाव समोर येईल. त्यांच्या सर्वसामान्यांशी असलेल्या बांधिलकीमुळेच मलाच काय, तर अवघ्या महाराष्ट्राला ते पुन्हा मुख्यमंत्री व्हावे असे वाटते. यासाठी देवाला साकडे घालण्याची गरज नाही, आम्ही आता थेट जनतेलाच साकडे घालू, असे शिवसेना आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी…

Read More

कर्नाटकात दोन हत्तींच्या लढाईत महिलेचा मृत्यू-VIDEO:हत्तींना अंघोळ करताना पाहत होती, खाली दबली; मुलासह दोन लोक थोडक्यात बचावले

कर्नाटकातील कोडगू (कुर्ग) जिल्ह्यातील दुबारे एलिफंट कॅम्पमध्ये सोमवारी दोन हत्तींच्या भांडणादरम्यान एका महिला पर्यटकाचा मृत्यू झाला. एका हत्तीला धक्का लागल्याने तोल गेला आणि तो महिलेच्या अंगावर पडला. यामुळे महिला दबून मरण पावली. तर एक पुरुष आणि त्याच्या मांडीवरचे एक बाळ थोडक्यात बचावले. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, तमिळनाडूची रहिवासी असलेली तुळशी (३३) इतर पर्यटकांसोबत नदीकिनारी उभी राहून हत्तींना…

Read More

सावत्र आईचा सवतीच्या मुलावर जडला जीव:नवरा देवदर्शनाला जाताच दोघेही जावयाच्या दुचाकीवरून झाले फरार; बीड जिल्ह्यातील घटना

वेगवेगळ्या गुन्ह्यांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या बीड जिल्ह्यात आता आई-मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी एक घडली आहे. या घटनेत एक महिला आपल्या सावत्र मुलासोबत फरार झाली असून, यामुळे सामाजिक व कौटुंबिक नैतिक मूल्यांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बीड जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी पत्नी माहेरी गेल्यामुळे एका व्यक्तीने आपल्या 13 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची गंभीर घटना घडली…

Read More

पुणे विमानतळावर दोन बांगलादेशी महिलांना अटक:गुवाहाटीला पळून जाण्याच्या तयारीत असताना खडक पोलिसांची कारवाई

पुणे विमानतळावर गुवाहाटीला पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन बांगलादेशी महिला आणि एका अल्पवयीन मुलाला खडक पोलिसांनी अटक केली आहे. पुणे शहर पोलिसांनी अवैधपणे वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांविरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत अवैधपणे राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. याच दरम्यान,…

Read More

अमरावतीत जिल्हा महिला सक्षमीकरण केंद्र सुरू:महिलांना एकाच छताखाली योजनांची माहिती व समस्या निराकरण

भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालयाच्या ‘मिशन शक्ती’ मोहिमेअंतर्गत अमरावती जिल्ह्यात ‘जिल्हा महिला सक्षमीकरण केंद्र’ उघडण्यात आले आहे. महिलांना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती एकाच छताखाली मिळावी, तसेच त्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे, हा या केंद्राच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश आहे. हे केंद्र अमरावती येथील जुन्या तहसील कार्यालयात, मुख्य पोस्ट ऑफिसच्या बाजूला स्थित आहे….

Read More

धामोडी पारधी बेड्याकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था:दीड किलोमीटरच्या रस्त्यामुळे नागरिकांना त्रास, प्रशासनाकडे दुरुस्तीची मागणी

दर्यापूर तालुक्यातील धामणा गावातील पारधी बेड्याकडे जाणाऱ्या दीड किलोमीटर रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. शासनाच्या ‘आदर्श गाव’ आणि ‘स्मार्ट सिटी’ सारख्या योजना असल्या तरी, या शंभर टक्के पारधी वस्ती असलेल्या गावाला मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. खराब रस्त्यांमुळे येथील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. धामणा गाव धामोडी ग्रामपंचायतीअंतर्गत येते. या गावाला जाण्यासाठी…

Read More

पॉस मशीनवरून एप्रिलचा डेटा गायब:तीन महिन्यांच्या धान्य वाटपात तांत्रिक अडचणी, अचलपुरातील नागरिक त्रस्त

राज्य शासनाने एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी वितरित करण्याचे नियोजन केले होते. मात्र, अचलपूर तालुक्यात राशनधारकांना केवळ दोन महिन्यांचाच धान्यसाठा मिळत आहे. यामुळे राशनधारक आणि स्वस्त धान्य दुकानदार यांच्यात संभ्रम आणि नाराजी निर्माण झाली आहे. रेशन दुकानदार आणि काही ग्राहकांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वस्त धान्य दुकानांच्या पॉस मशीनवरील एप्रिल महिन्याचा डेटा…

Read More

तीन वेळा मरता-मरता वाचला अक्षय कुमार:धोकादायक स्टंटचे किस्से सांगितले, म्हटले- 'इंटरनॅशनल खिलाडी'दरम्यान अर्धे शरीर कापले गेले असते

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आपल्या चित्रपटांमध्ये धोकादायक स्टंट स्वतःच करण्यासाठी ओळखला जातो. अलीकडेच एका संभाषणात त्याने तीन घटना आठवल्या, जेव्हा शूटिंगदरम्यान तो मृत्यूच्या अगदी जवळ पोहोचला होता. अक्षय म्हणाला की तो तीन वेळा अशा परिस्थितीत अडकला होता, जिथे त्याचा जीव जाऊ शकला असता. शुभांकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये अक्षयने सांगितले की, पहिली घटना ‘सैनिक’ चित्रपटादरम्यान घडली होती….

Read More