Headlines

तारीख पे तारीख… पण संभाजीनगरकरांना पाणी कधी?:अंबादास दानवेंचा सरकारला सवाल; मंत्री उदय सामंत म्हणाले- त्रुटींची चौकशी, स्वतंत्र समिती नेमणार

छत्रपती संभाजीनगर शहराच्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या बहुप्रतीक्षित पाणीपुरवठा योजनेवरून विधान परिषदेत जोरदार चर्चा झाली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते तथा आमदार अंबादास दानवे यांनी सरकारला धारेवर धरत, “तारीख पे तारीख… पण संभाजीनगरकरांना नेमकं पाणी कधी मिळणार?” असा थेट सवाल उपस्थित केला. यावर उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रकल्पातील त्रुटी मान्य करत स्वतंत्र चौकशी…

Read More

आमची अन् काँग्रेसची विलीनीकरणासंदर्भात कोणतीही चर्चा नाही:पक्षात कोणीही नाराज नाही, अन् असला तर बाहेर बोलणार नाही; चव्हाणांच्या दाव्यावर सुळेंचे उत्तर

पृथ्वीराज चव्हाण आणि माझी भेट काही झाली नाही. त्यांना आमचे कोणते खासदार भेटले आणि ते त्यांना अस्वस्थ वाटले माहिती नाही. आमच्या पक्षाचे 8 ही खासदार एक कुटुंब म्हणून काम करत असतो, आमच्यातील कोणी त्यांना भेटले असे मला वाटत नाही, पण ते राज्याचे मोठे नेते आहेत त्यांच्या कानावर काही आले असेल तर माझी नैतिक जबाबदारी आहे…

Read More

बच्चू कडूंचा सभागृहात संताप:'प्रश्न मांडण्यापेक्षा दोन कानफाडीत माराव्या वाटतात', सचिन अहिरांनी घेतला आक्षेप

विधान परिषदेत सामाजिक न्याय आणि दिव्यांग कल्याण विभागावरील चर्चेदरम्यान शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी प्रशासनाच्या कारभारावर जोरदार टीका करत संताप व्यक्त केला. दिव्यांग, अनाथ, एकल महिला आणि भिक्षेकरी यांच्या प्रश्नांकडे सरकार गंभीरपणे लक्ष देत नसल्याचा आरोप करताना त्यांनी, “कधी-कधी प्रश्न मांडण्यापेक्षा दोन कानफाडीत माराव्या वाटतात,” असे वक्तव्य केले. या विधानावर विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर…

Read More

मालेगाव SIR वरून किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप:'बांगलादेशींना हिंदू ठरविण्याचा अड्डा', 1.26 लाखांहून अधिक संशयास्पद मतदारांचा दावा

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिमेवरून मालेगावातील मतदार पडताळणी प्रक्रियेबाबत गंभीर आरोप केले आहेत. मालेगाव हे “बांगलादेशींना हिंदुस्थानी आणि हिंदू ठरविण्याचा अड्डा बनत आहे,” असा आरोप करत त्यांनी मोठ्या प्रमाणावर संशयास्पद मतदार आढळल्याचा दावा केला. सोमय्या म्हणाले की, अहिल्यानगर महापालिकेत जुन्या नोंदींमध्ये बदल करून सुमारे 15 हजार बेकायदेशीर जन्म…

Read More

Maharashtra CM & Deputy CM To Give Strong Reply To Opposition Charges Today

गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोपांनी गाजत असलेल्या राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. विरोधकांनी आतापर्यंत उपस्थित केलेले विविध प्रश्न, आरोप आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींवर आज राज्याचे म . दरम्यान, कालच्या कामकाजात नाशिक रिंगरोड भूसंपादन प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी, पिंपरी-चिंचवड कचरा डेपो दुर्घटना, ‘लोकराज्य’ मासिकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उलट्या छायाचित्रावरून झालेला गदारोळ आणि…

Read More

डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण; रमेश म्हात्रेंना रुग्णालयातून डिस्चार्ज:आज कोर्टात हजर करणार; दोन डॉक्टरांचे राजीनामे, निलंबनाची मागणी जोरात

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेले शिवसेना (शिंदे गट) नगरसेवक रमेश म्हात्रे यांना अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून त्यांना थेट कल्याण न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. प्रकृती अस्वस्थ असल्याचे कारण देत ते कळवा शासकीय रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र, न्यायालयाने प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले. यापूर्वी रमेश…

Read More

नाशिकच नाही, संपूर्ण राज्यातील अनेक नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेत येणार:उदय सामंतांचा मोठा दावा, खडसे-तावडे भेटीवरही केले भाष्य

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत लवकरच ‘मेगा इन्कमिंग’ पाहायला मिळणार आहे, असा अत्यंत मोठा दावा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. केवळ नाशिक महानगरपालिकाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक नगरपालिका, नगरपंचायती आणि महानगरपालिकांमधील विद्यमान आणि माजी नगरसेवक लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सामंत यांनी म्हटले आहे. याचवेळी, राज्याच्या राजकारणात सध्या चर्चेचा विषय ठरलेल्या…

Read More

लोकांनी महायुतीविरोधात निवडून दिलंय, मग खासदार अस्वस्थ का?:2029 मध्ये देशात 'इंडिया' आघाडीच सत्तेत येणार- संजय राऊत

आमच्या पक्षातून किंवा शरद पवारांच्या पक्षाकडून निवडून आलेल्या खासदारांना लोकांनी महायुतीच्याविरोधात निवडून दिले आहे. मग त्यांनी अस्वस्थ का व्हावे? असा सवाल उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. शरद पवार गटातील 5 ते 6 खासदार अस्वस्थ आहेत, पंतप्रधान मोदी आणि शहा त्यांच्यामागे लागले आहेत ते खासदार काय करतील सांगता येत नाही या पृथ्वीराज चव्हाण यांच्या…

Read More

महाड मुख्याधिकारी मारहाण प्रकरण तापलं:अबू आझमींकडून 'सत्तेचा माज' आल्याची टीका, मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या- महाराष्ट्राच्या प्रतिमेला धक्का

महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय सदाशिव कोळेकर यांच्यावर त्यांच्या दालनात झालेल्या कथित मारहाण प्रकरणाचे राज्यभर पडसाद उमटू लागले आहेत. याप्रकरणी भाजप नगरसेवक सुरज बामणे, राकेश पाटील आणि अन्य एका व्यक्तीविरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेवर विरोधकांसह सत्ताधारी नेत्यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली असून कठोर कारवाईची मागणी होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्याधिकारी…

Read More

न खाऊंगा, न खाने दूंगा.. पण पिंपरीत 400 कोटींची लूट:शालेय साहित्य घोटाळ्यावरून संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, उच्चस्तरीय चौकशीची मागणी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेल्या शालेय साहित्य आणि गणवेश खरेदीत तब्बल ४०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी ९ जुलै २०२६ रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवले असून, या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावेही जोडले आहेत. “न खाऊंगा,…

Read More