Headlines

मुंबईत मान्सूसपूर्व पावसाच्या सरी:उकाड्यामुळे हैरान झालेल्या जनतेला दिलासा, हिंगोली, सोलापुरातही सरी; विदर्भातील उष्णतेची लाट कायम

गत काही दिवसांपासून वाढत्या तापमानाने मुंबईकरांच्या अंगाची अक्षरशः लाही – लाही होत होती. अल निनोच्या प्रभावामुळे यंदा मुबलक पाऊसपाणी होणार किंवा नाही? या चिंतेने नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. लोक चातक पक्षाप्रमाणे पावसाची वाट पाहत होते. त्यातच आज सकाळी मुंबईतील काही भागांत मान्सूनपूर्व सरींनी हजेरी लावल्यामुळे उकाड्यामुळे हैरान झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला. दरम्यान, विदर्भात…

Read More

नीट पेपरफूट प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी:जळगाव जामोदमध्ये काँग्रेसची मागणी; तहसीलदारांना निवेदन‎

नीट परीक्षा पेपरफूट प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशा मागण्या काँग्रेसच्या वतीने करण्यात आल्या आहेत. या संदर्भात पदाधिकाऱ्यांनी आज, दि. १८ मे रोजी तहसीलदारांना निवेदन दिले. त्यामध्ये नमूद केले की, देशात शिक्षण क्षेत्राचे व्यापारीकरण होत असून, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी गंभीर प्रकारे खेळ केला जात आहे. नीट परीक्षा पेपरफूट प्रकरणामुळे सुमारे २२…

Read More

अमळनेर शिवारामध्ये शेतकऱ्यांचे रात्रीपर्यंत जलसमाधी आंदोलन सुरू:जायकवाडी जल फुगवट्याचे पाणी थेट शेतात असल्याचा केला आरोप‎

जायकवाडी जल फुगवट्याचे पाणी वीस वर्षांपासून असंपादित अमळनेर-लखमापूरच्या शेतात येत असून, उभी पिके मातीमोल झाली आहे. प्रशासन वेळकाढू भूमिका घेत असल्याचा आरोप करीत संतप्त शेतकऱ्यांनी अमळनेर शिवारात सोमवारी (१८ मे) सकाळी साडेअकरा वाजेपासून जलसमाधी आंदोलन सुरू केले आहे. रात्री उशिरापर्यंत हे आंदोलन सुरूच होते. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जायकवाडी जल फुगवट्यामुळे उभ्या पिकांचे १०० टक्के नुकसान होते….

Read More

सुनेत्रा पवारांनी दोनदा फोन करून बिनविरोधसाठी विनंती केली:देवेंद्र फडणवीस म्हणजे झारीतले शुक्राचार्य, निवडणूक लढायला आम्ही सक्षम- हर्षवर्धन सपकाळ

बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांनी दोन वेळा फोन करत संपर्क साधला आणि बिनविरोध निवडणुकीची विनंती केली, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. आपण सभ्यतेने वाटचाल केली पाहिजे असे या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रयत्न करतो आहोत. आमची भूमिका ही सर्वांना माहिती आहे. सत्ताधाऱ्यांनी तसा प्रतिसाद दिलेला नाही. बारामती निवडणूक लढण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, पण जी…

Read More

कॅफेतील फोटो व्हायरल करण्याची धमकी;भुसावळमध्ये तरुणीचे धर्मांतर अन् निकाह:आरोपीस अटक, मूळची मध्य प्रदेशातील पीडिता आजी-आजोबांकडे राहायची

कॅफेमध्ये काढलेले फोटो व्हायरल करण्याची व कुटुंबाला मारण्याची धमकी देऊन तरुणीचे बळजबरीने धर्मांतर केल्याचा धक्कादायक प्रकार भुसावळमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुख्य संशयित नबिल कासम शेख (रा. भुसावळ) याला रविवारी पहाटे अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मूळची मध्य प्रदेशातील असलेली पीडिता भुसावळमध्ये आजी-आजोबांकडे राहून शिक्षण घेत होती. इयत्ता दहावीत असताना…

Read More

पेट्रोलमध्ये 100% इथेनॉल मिश्रणाच्या गाड्यांची तयारी:वाहन उत्सर्जन नियम बदलण्याचा प्रस्ताव

रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने केंद्रीय मोटार वाहन नियमांमध्ये बदलाचा मसुदा जारी केला आहे. यामध्ये ई८५ (८५ टक्के इथेनॉल आणि पेट्रोल) आणि ई १०० (जवळपास शुद्ध इथेनॉल) यांसारख्या इंधनांचा औपचारिक समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉलचा वापर वाढवणे हा यामागचा उद्देश आहे. यामुळे आयात केल्या जाणाऱ्या तेलावरील देशाचे अवलंबित्व कमी होईल. सरकारने पेट्रोलमध्ये २० टक्के…

Read More

सुप्रीम कोर्ट म्हणाले- सीएम तपासात हस्तक्षेप करतील असे वाटले नव्हते:त्या लोकशाहीला धोका पोहोचवू शकत नाहीत; ममता IPAC छाप्यांदरम्यान पोहोचल्या होत्या

I-PAC रेड प्रकरणी ईडीच्या याचिकेवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने केंद्रीय तपास यंत्रणेमार्फत सुरू असलेल्या चौकशीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या हस्तक्षेपालाही चुकीचे ठरवले. न्यायालयाने म्हटले की, कोणत्याही राज्याचा मुख्यमंत्री असे करतो, तेव्हा ते लोकशाहीला धोक्यात आणते. न्यायमूर्ती कुमार म्हणाले – हा राज्य आणि केंद्रातील वाद नाही. आम्हाला कधी वाटले नव्हते की या देशात असाही दिवस…

Read More

सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी बोलावले तर जाण्याचे सुप्रिया सुळेंचे संकेत:म्हणाल्या- रिश्ते मायने रखते है, संपूर्ण कुटुंब वहिनींच्या पाठीशी

बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याने नव्या चर्चांना तोंड फुटले आहे. रिश्ते मायने रखते है, असे म्हणत त्यांनी कुटुंबाचे महत्त्व अधोरेखित केले. पैसा आणि सत्ता यापेक्षा नातेसंबंध अधिक महत्त्वाचे असतात, असे सांगताना त्यांनी सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराबाबतही सूचक भूमिका मांडली आहे. त्यामुळे बारामतीतील राजकारणात वेगळाच रंग भरला आहे. सुनेत्रा पवार यांच्या…

Read More

देशात पहिला विस्तृत सामाजिक-आर्थिक सर्व्हे:तेलंगणामध्ये खुल्या प्रवर्गापेक्षा एससी-एसटी तीन पटीने मागास, राज्याची 67% लोकसंख्या संघर्षात

तेलंगणामध्ये गेल्या वर्षीच्या जातीनिहाय सर्वेक्षणाच्या अहवालाने राज्याच्या सामाजिक व आर्थिक स्थितीचे गंभीर चित्र समोर आणले आहे. अहवालानुसार राज्यात अनुसूचित जाती (एससी), अनुसूचित जमातीचे (एसटी) लोक सामान्य वर्गाच्या तुलनेत ३ पट मागासलेले आहेत. तर ओबीसी वर्ग २.७ पट मागासलेला आहे. एससीचा मागासलेपणा निर्देशांक स्कोअर ९६, एसटीचा ९५, ओबीसीचा ८६ आहे. नियम सांगतो की, स्कोअर जेवढा जास्त…

Read More

काँग्रेसच्या दोन्ही अध्यक्षांची फेरनिवड:बबलू देशमुख ग्रामीणचे, तर बबलू शेखावत यांची शहर काँग्रेसचे अध्यक्षपदी निवड

अमरावती काँग्रेसच्या दोन्ही जिल्हाध्यक्षांची फेरनिवड करण्यात आली आहे. बबलू देशमुख यांची ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी तर बबलू शेखावत यांची शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. काँग्रेसचे केंद्रीय सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांनी गुरुवारी काँग्रेस अध्यक्षांची यादी जाहीर केली. यामध्ये बबलू देशमुख आणि बबलू शेखावत यांच्या नावांचा समावेश आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राबवलेल्या ‘सृजन संघटन अभियान’…

Read More