Headlines

नेहा पेंडसेला रस्त्यावर एका व्यक्तीने पकडले होते:अभिनेत्रीने घाबरून चावी त्या व्यक्तीच्या गाडीवर फेकली होती

टीव्ही अभिनेत्री नेहा पेंडसे यांनी नुकतेच सांगितले की, मुंबईत सकाळी जॉगिंग करत असताना एकदा एका व्यक्तीने रस्ता विचारण्याच्या बहाण्याने गाडी थांबवली आणि अचानक त्यांना पकडले होते. नेहा पेंडसे यांनी ‘हॉट्टरफ्लाई’ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, त्या एका सकाळी मुंबईत जॉगिंगसाठी बाहेर पडल्या होत्या. तेव्हा एका माणसाने त्यांची गाडी त्यांच्याजवळ थांबवली आणि हळू आवाजात रस्ता विचारला,…

Read More

मेळघाटात जलसंकट गहिरे:8 गावांना 19 टँकरने पाणीपुरवठा सुरू

तापमानात वाढ झाल्याने मेळघाटातील जलसंकट अधिक गंभीर झाले आहे. चिखलदरा तालुक्यातील आठ गावांमध्ये सध्या १९ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. या गावांमध्ये भूगर्भात पाण्याचा कोणताही स्रोत उपलब्ध नसल्यामुळे टँकरशिवाय पाणीपुरवठा करण्याचा दुसरा कोणताही पर्याय नसल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाने म्हटले आहे. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या नोंदीनुसार, या आठही गावांमध्ये रहिवाशांसाठी दररोज पिण्याच्या पाण्याचे टँकर पाठवले जात…

Read More

हरियाणाचे CM सैनी कंगना रनोटसोबत चित्रपट पाहणार:काल दिल्लीत झालेल्या भेटीत ठरला प्लॅन; BBV च्या विशेष शोमध्ये पोहोचणार

हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी शनिवारी संध्याकाळी अभिनेत्री आणि खासदार कंगना रनोट यांच्यासोबत त्यांच्या ‘भारत भाग्य विधाता (BBV)’ या नवीन चित्रपटाचा विशेष शो पाहणार आहेत. मुख्यमंत्री आणि कंगना चंदीगडमध्ये आयोजित संध्याकाळच्या शोमध्ये एकत्र उपस्थित राहतील. माहितीनुसार, एक दिवसापूर्वीच मुख्यमंत्री सैनी आणि कंगना यांची दिल्लीत भेट झाली होती. यावेळी दोघांमध्ये चित्रपट आणि विविध समकालीन विषयांवर चर्चा…

Read More

भोंदू खरात प्रकरणामुळे आणखी एका पदाधिकाऱ्याचा राजीनामा:राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे पदावरून पायउतार

नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्या आर्थिक साम्राज्याची पाळेमुळे खणून काढली जात असतानाच, राज्याच्या सहकार क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. समता पतसंस्थेचे संस्थापक आणि ज्येष्ठ सहकार नेते काका कोयटे यांनी ‘महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन’च्या अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. अशोक खरात याच्याशी असलेल्या आर्थिक संबंधांच्या आरोपांमुळे आणि पतसंस्थेच्या सभासदांकडून होत असलेल्या वाढत्या…

Read More

दगडूशेठ ट्रस्टतर्फे मोफत महाआरोग्य शिबीर:23 मे रोजी नू.म.वि. प्रशालेत, जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत आयोजन

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ‘जय गणेश रुग्णसेवा अभियान’ अंतर्गत मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार, २३ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे रस्त्यावरील नू.म.वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयात होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी दिली….

Read More

थकीत उसबिलासाठी धरणे आंदोलन सुरू:जकरायाच्या विरोधात जनहित संघटनेचा ठिय्या‎

तालुक्यातील वटवटे येथील जकराया साखर कारखान्याने सन २०२५ – २६ च्या चालु गळीत हंगामात जाहीर केलेल्या ऊसदरा पैकी ५० टक्केच रक्कम शेतकऱ्यांना दिलेली आहे. उर्वरित ५० टक्के रक्कम दिलेली नाही. ती रक्कम तात्काळ १५ टक्के व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने संस्थापक प्रभाकर देशमुख यांनी बेमुदत धरणे आंदोलनास…

Read More

बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने चौघांचा मृत्यू:किडनी निकामी झाल्याने मृत्यू, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये दावा; परिसरात कलिंगडाची विक्री बंद

मुंबईमधील पायधुनी परिसरात राहणाऱ्या एका कुटुंबातील 4 जणांचा बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना सोमवारी समोर आली होती. या मृत्यूंविषयी राज्यात वेगवेगळे तर्कवितर्क व्यक्त केले जात असताना आता या मृतांचा पोस्टमार्टेम अहवाल समोर आला आहे. त्यात हे चारही मृत्यू किडनी निकामी झाल्यामुळे झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अब्दुल्ला दोकाडिया, त्यांची पत्नी नसरीन दोकाडिया,…

Read More

मणिपूरमध्ये बंगालच्या BSF जवानाची गोळ्या घालून हत्या:उखरुलमध्ये पेट्रोलिंग ड्युटीवर तैनात होते; येथे फेब्रुवारीपासून हिंसाचार सुरू

मणिपूरच्या उखरुल जिल्ह्यात शुक्रवारी गस्त घालणाऱ्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) च्या एका कॉन्स्टेबलची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कॉन्स्टेबल मिथुन मंडल यांना संध्याकाळी सुमारे ४:३० वाजता गोळी लागली. गोळी लागल्यानंतर त्यांना तात्काळ इम्फाळ येथील रुग्णालयात नेण्यात आले, जिथे संध्याकाळी सुमारे ६ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मिथुन मंडल हे पश्चिम…

Read More

बाळापूरमध्ये अपघातांचे वाढते प्रमाण:रस्त्यांसाठी 150 कोटी द्या आ. देशमुख यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; 851 अपघात, 334 जणांचा मृत्यू‎

विधानसभेच्या बाळापूर मतदारसंघातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून रस्त्यांसाठी १५० कोटींचा निधी द्यावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. याबाबत आ. देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांना पत्रही दिले. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे सन २०१९ ते जून २०२६ या कालावधीत तब्बल ८५१ रस्ते अपघात झाले. या दुर्घटनांमध्ये…

Read More

नवरदेवाचा बूट लपवला म्हणून पोटात खुपसला खंजीर!:2 जण गंभीर जखमी, चौघांविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल

हिंगोली तालु्क्यातील कळमकोंडा येथे विवाह सोहळ्यात नवरदेवाचा बुट लपवून ठेवण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर दोघांना खंजीरने भोसकल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या दोघांना उपचारसाठी शासकिय रुग्णालया दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी चौघांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 28 पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील कळमकोंडा येथे दोन दिवसांपूर्वी…

Read More