शेतकरी कर्जमाफी म्हणजे निव्वळ बनवाबनवी:विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात, अधिकाऱ्यांच्या 'मग्रुरी'वरही ओढले ताशेरे
राज्यातील शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेली कर्जमाफी ही निव्वळ ‘बनवाबनवी’ आणि ‘फसवी’ असल्याचा घणाघाती आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. मंगळवारी (३० जून) विधानभवनात माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीवरून आणि मग्रुरीवरून राज्य सरकारवर सडकून टीका केली. तसेच, याआधी काल (२९ जून) विधानसभेत बोलतानाही त्यांनी ३६ हजार कोटींच्या कर्जमाफीच्या दाव्यातील फोलपणा आणि…