Headlines

यूट्यूब ॲपमधून 'शॉर्ट्स' पूर्णपणे हटवता येतील:वेळेच्या व्यवस्थापनात नवीन 0 मिनिटांचा पर्याय उपलब्ध झाला; रीलचे व्यसन सोडवण्यासाठी मदत मिळेल

यूट्यूबने ‘टाइम मॅनेजमेंट’चे नवीन फीचर जारी केले आहे. याच्या मदतीने आता तुम्ही ॲपवर शॉर्ट्स पाहण्याची वेळ मर्यादा ‘शून्य’ वर सेट करू शकता. यामुळे शॉर्ट्स फीड पूर्णपणे काढून टाकली जाईल. याचा उद्देश स्क्रीन टाइम अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करण्यास मदत करणे हा आहे. यूट्यूबने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये शॉर्ट्ससाठी टाइमर फीचर सादर केले होते, ज्यामध्ये किमान वेळ…

Read More

दिल्लीनंतर महाराष्ट्रातही ऑपरेशन टायगर?:नारायण कुचेंचा मोठा दावा, म्हणाले- 2029 च्या निवडणुकीत ठाकरेंना उमेदवारही मिळणार नाहीत

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील खासदार फुटीच्या चर्चांदरम्यान भाजप आमदार नारायण कुचे यांनी ‘ऑपरेशन टायगर’वर मोठे वक्तव्य केले आहे. दिल्लीत जे घडलं, तेच महाराष्ट्रातही होईल. राज्यात देखील ऑपरेशन टायगर होणार, असा दावा करत त्यांनी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला. नारायण कुचे म्हणाले, संजय राऊत यांना खासदारांचा हमीभाव कसा माहिती? त्यांना…

Read More

हिंगोलीतील फुलदाभा परिसर मध्यरात्रीला झालेल्या भूकंपाने हादरला:3.6 रिश्‍टर स्केलची नोंद, परिसरातील गावकऱ्यांनी रात्र काढली जागून

औंढा नागनाथ तालुक्यातील फुलदाभा परिसर बुधवारी ता. 1 मध्यरात्री 1.20 वाजता भूकंपाने हादरला आहे. भूकंपमापकावर 3.6 रिश्‍टर स्केलची नोंद झाली आहे. या भूकंपामुळे परिसरातील गावकऱ्यांनी रात्र जागून काढली आहे. या भागात वारंवार होणाऱ्या भूकंपाची कारणे शोधण्यास प्रशासन अपयशी ठरत असल्याच्या प्रतिक्रिया नागरीकांतून व्यक्त होत आहेत. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे तसेच कळमनुरी तालुक्यातील रामेश्‍वरतांडा परिसरातील केंद्रबिंदू…

Read More

ठाकरे गटातील खासदारांवर हुसेन दलवाईंचा हल्लाबोल:धाडस असेल तर राजीनामा द्या आणि भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवा!

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील खासदारांच्या कथित फुटीवरून राजकीय वातावरण तापले असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी बंडखोर खासदारांवर जोरदार टीका केली आहे. पक्ष सोडायचाच असेल तर आधी खासदारकीचा राजीनामा द्या आणि नंतर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून जनतेचा कौल घ्या, असे आव्हान त्यांनी दिले. ‘पाच गेले, सहावा कुठे आहे हेही माहिती नाही’ माध्यमांशी बोलताना…

Read More

देशात 90, महाराष्ट्रात 98% पाऊस; पण यंदा खंडही मोठे:नैऋत्य मान्सून येत्या 2 ते ३ दिवसांत केरळममध्ये; संभाजीनगरला वादळी पावसाचा तडाखा

देशाची अर्थव्यवस्था आणि शेतीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला नैऋत्य मान्सून येत्या २ ते ३ दिवसांत केरळमच्या मार्गे देशात प्रवेश करू शकतो. यंदा प्रशांत महासागरातील ‘एल निनो’च्या प्रभावामुळे देशभरात सरासरीपेक्षा कमी (९०%) पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला तरी, महाराष्ट्रासाठी मात्र एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे. राज्यात आणि विशेषतः मराठवाड्यात यंदा सरासरीच्या तब्बल ९८ टक्के पाऊस पडण्याची…

Read More

विदर्भात 54 टक्के पावसाची तूट:जून संपत आला तरी समाधानकारक पाऊस नाही, पेरण्या खोळंबल्या

चालू मान्सून हंगामात विदर्भात पावसाची मोठी तूट नोंदवली गेली आहे. जून महिना संपत आला तरी अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. हवामान विभागाने १ ते २४ जून २०२६ या कालावधीसाठी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, विदर्भ उपविभागात सरासरीच्या तुलनेत तब्बल ५४ टक्के पावसाची तूट आहे. या कालावधीत विदर्भात सामान्यतः १२०.४ मिमी पावसाची अपेक्षा असताना, प्रत्यक्षात केवळ ५५.५ मिमी…

Read More

जनगणना देशाच्या विकासाचा पाया; गाफील राहू नका:देवळाली प्रवरा पालिकेचे मुख्याधिकाऱ्यांचे आवाहन

प्रतिनिधी | राहुरी आगामी जनगणनेच्या पार्श्वभूमीवर देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या वतीने अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. “जनगणना ही केवळ लोकसंख्या मोजण्याची प्रक्रिया नसून ती देशाच्या उज्ज्वल भविष्याचा आणि विकासाचा पाया आहे,” असे प्रतिपादन मुख्याधिकारी तथा चार्ज अधिकारी ऋषिकेश पाटील यांनी केले. शासकीय योजनांचा लाभ, निधीचे नियोजन आणि सामाजिक-आर्थिक धोरणांची आखणी ही…

Read More

दिव्य मराठी इन्व्हेस्टिगेशन‎:बंदी असतानाही गायरान जमिनीवर प्लॉट्स पाडून पिंप्री मोंढाळेत विक्री, पारोळा तालुक्यात कुंपणानेच शेत खाल्ले

पारोळा तालुक्यातील पिंप्री मोंढाळे येथे शासकीय यंत्रणेच्या संगनमताने २ एकर गायरान जमिनीवर २०० प्लॉट्स पाडून बेकायदेशीर खरेदी-विक्रीचा महाघोटाळा उघडकीस आला आहे. त्याचे पुरावे ‘दिव्य मराठी’कडे आहेत. गायरान जमीन विक्रीस बंदी असल्याने मूळ सातबारा उतारा कोराच आहे. मात्र तत्कालीन ग्रामसेवक, सरपंच आणि शासकीय कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायत नमुना नं. ८ वर वाढीव बेकायदेशीर नोंदी करून लोकांना मालकी हक्क…

Read More

देवाभाऊ काय चाललंय तुमचं?:1 किमी रस्त्याला 254 कोटी कशासाठी लागतात? शक्तीपीठवरून राजू शेट्टींचा फडणवीसांना सवाल

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या वाढीव अंतरावरून आणि त्यापोटी फुगलेल्या हजारो कोटींच्या खर्चावरून सरकारला धारेवर धरले आहे. “देवाभाऊ, फोंड्या माळावर १ किलोमीटर रस्ता करण्यासाठी २५४ कोटी रुपये कशासाठी लागतात? हा रस्ता काय ट्रम्प तात्यांचे डॉलर वापरून बनवणार आहात का?”असा सवाल राजू शेट्टी यांनी केला असून, या प्रकल्पातून ७० हजार कोटींचा ‘ढपला’…

Read More

काँग्रेसने महिलांना संसदेत येण्यापासून रोखले:केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा आरोप; देशभर रस्त्यावर उतरण्याचा इशारा

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर महिलांना संसदेत येण्यापासून रोखल्याचा गंभीर आरोप केला आहे. महिला आरक्षण विधेयकामुळे सामान्य महिलांना संसदेत येण्याची संधी होती, मात्र विरोधी पक्षांनी हे प्रयत्न हाणून पाडले, असे आठवले म्हणाले. महिलांना लोकसभेत आरक्षण मिळवून देण्याच्या सरकारच्या चांगल्या प्रयत्नांना विरोधी पक्षांनी धुळीस मिळवले, असे आठवले यांनी सांगितले….

Read More