Headlines

शिक्षण मंत्र्यांकडून डॉ. पंजाबराव देशमुख संकुलाच्या जागेची पाहणी:राज्य सरकारची मंजुरी; डिसेंबरमध्ये निधी तरतुदीचे प्रयत्न

अमरावती येथे डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुलासाठी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी रविवारी प्रस्तावित जागेची पाहणी केली. राज्य शासनाने या संकुलाला मंजुरी दिली असून, डिसेंबरमध्ये निधीची तरतूद करण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. देशाचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी कृषी आणि शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या नावाने अमरावती…

Read More

शिक्षण, आरोग्य, सामाजिक न्याय यावर समाजाची प्रगती अवलंबून- डॉ. इंगळे:ज्येष्ठ नागरिक विचारमंचातर्फे डॉक्टरांचा सन्मान सोहळा उत्साहात‎

मानवतेच्या आरोग्यसेवेत मोलाचे योगदान देणाऱ्या चर्मकार समाजातील डॉक्टरांचा सन्मान सोहळा ज्येष्ठ नागरिक विचारमंचातर्फे प्रमिलाताई ओक सभागृहात उत्साहात पार पडला. समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आजही अपरिहार्य आहेत. समता, बंधुता आणि सामाजिक न्याय ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची मूलतत्त्वे आहेत. जात, धर्म आणि विषमता यापलीकडे जाऊन सर्वसमावेशक व न्यायाधिष्ठित समाज घडवण्यासाठी त्यांच्या विचारांचे आचरण…

Read More

11 वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली!:अक्कलकोटमध्ये 'देऊळ बंद 2' चा टिझर लाँच; अभिनेत्री स्नेहल तरडे भावुक

2015 मध्ये बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या ‘देऊळ बंद’ या चित्रपटाचा दुसरा भाग तब्बल 11 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने स्वामीभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. नुकताच या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित टिझर अक्कलकोट येथील स्वामी समर्थांच्या मंदिरात भक्तांच्या अलोट गर्दीत आणि मोठ्या जल्लोषात प्रदर्शित करण्यात आला. या सोहळ्याला प्रवीण तरडे यांच्यासह चित्रपटातील सर्व कलाकार उपस्थित होते. यावेळी…

Read More

शेतकऱ्यांच्या बँकांमध्ये फेऱ्या वाढल्या; अद्यापही कर्जमाफीबाबत संभ्रम कायम, निकष व लाभार्थी यादी जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी‎

राज्य शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने अंजनगाव बारी परिसरातील शेतकरी सध्या बँकांच्या फेऱ्या मारताना दिसत आहेत. कर्जमाफीच्या निकषांबाबत अधिकृत माहिती उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, राष्ट्रीयकृत व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या शाखांमध्ये दररोज चौकशीसाठी गर्दी वाढत आहे. यंदा पावसाने अपेक्षित साथ न दिल्याने…

Read More

अवैध दारूच्या धंद्याला चाप: यापुढे पोलिस पाटीलच असतील जबाबदार:अकोले तालुक्यातील अवैध दारूविरोधात आता "ऑपरेशन क्लीन'' सुरू होणार‎

“गावात अवैध दारू विकली जाते आणि पोलीस पाटील डोळे मिटून बसतात, हे आता खपवून घेतले जाणार नाही,” असा सज्जड दम संगमनेरचे प्रांताधिकारी अरुण उंडे यांनी दिला आहे. आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या सूचनेनंतर महसूल, पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाची तातडीची बैठक अकोले तहसील कार्यालयात पार पडली. यात अवैध दारू माफियांविरोधात “ऑपरेशन क्लीन’ छेडण्याचा निर्धार करण्यात…

Read More

जगातील सर्वात रुंद बोगद्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद:मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील 'मिसिंग लिंक' प्रकल्पामुळे नवयुगा इंजिनिअरिंगचा पराक्रम

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेडने भारताच्या पायाभूत सुविधा क्षेत्रात एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील बहुप्रतीक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पांतर्गत जगातील सर्वात रुंद भूमिगत बोगदा निर्माण करून कंपनीने दुसऱ्या ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’वर नाव कोरले आहे. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवयुगा इंजिनिअरिंगच्या अभियांत्रिकी कौशल्याचे कौतुक केले. सह्याद्रीच्या कठीण डोंगररांगांमधून जाणारा हा…

Read More

बालभारतीच्या अभ्यासक्रमावरून पुन्हा नवा वाद:सहावीच्या मराठी पुस्तकातून महाराष्ट्राचीच लोकनृत्ये गायब; केवळ परराज्यांतील नृत्यांना स्थान

राज्यात एका बाजूला शालेय शिक्षणात ‘सीबीएसई’ पॅटर्न राबवण्यावर आणि मराठी भाषा सक्तीची करण्यावर भर दिला जात आहे. मात्र, दुसरीकडे शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे महाराष्ट्र आणि मराठी भाषेच्या संदर्भात सातत्याने त्रुटी समोर येत आहेत. आता बालभारतीच्या इयत्ता सहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील एका धड्यावरून नवा वाद उफाळून आला आहे. या पुस्तकातील ‘लोकनृत्य’ या पाठात महाराष्ट्रातील समृद्ध लोककलांना डावलून…

Read More

अनाथ बालकांच्या आरोग्यासाठी मामाच्या गावाला जाऊ या उपक्रम:विश्व मांगल्य स्वनाथ परिषदेने स्विकारले सामाजिक दायित्व‎

महानगरातील विविध अनाथ व निराधार गृहात राहणाऱ्या व त्याचप्रमाणे आई-वडिलांचे छत्र हरवून आपल्या नातलगांकडे राहत असणाऱ्या स्वनाथ बालकांसाठी विश्व मांगल्य स्वनाथ परिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या “मामाच्या गावाला जाऊ या’ या उपक्रमास प्रतिसाद मिळत आहे. या बालकांवर विविध संस्काराचे रोपण करण्यात येत असल्याची माहिती विश्व मांगल्य स्वनाथ परिषदेच्यावतीने मनुताई कन्या शाळेत शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात…

Read More

टाटा अल्ट्रोज iCNG AMT लाँच, किंमत ₹8.70 लाखांपासून सुरू:ही CNG सह ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेली भारतातील पहिली प्रीमियम हॅचबॅक, 360° कॅमेरासारखी वैशिष्ट्ये

टाटा मोटर्सने आज (12 मे) आपली प्रीमियम हॅचबॅक अल्ट्रोजच्या CNG मॉडेलला AMT (ऑटोमॅटिक ट्रान्समिशन) गिअरबॉक्ससह भारतात लॉन्च केले आहे. यासह टाटा अल्ट्रोज iCNG भारतात CNG सह ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेली पहिली प्रीमियम हॅचबॅक बनली आहे. टाटाने हे 5 व्हेरिएंट्समध्ये सादर केले आहे – प्योर, प्योर S, क्रिएटिव्ह, क्रिएटिव्ह S आणि अकम्प्लिश्ड S. याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत…

Read More

ममता बॅनर्जींची राजीनामा न देण्याची भूमिका चुकीची:बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागणार नाही राज्यपाल हस्तक्षेप करतील, उज्ज्वल निकम यांचा दावा

भाजप खासदार तथा ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनामा न देण्याच्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे. ममता बॅनर्जी यांची विधानसभा निवडणुकीत पराभव होऊनही राजीनामा न देण्याची भूमिका चुकीची आहे. बहुमत गमावल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देणे अपेक्षित असते, पण आता ममतांच्या भूमिकेमुळेच राज्यपालच या प्रकरणात हस्तक्षेप करून योग्य तो मार्ग काढतील, असे ते…

Read More