Headlines

उद्धव ठाकरे धर्मांतर प्रकरणावर मूग गिळून गप्प का?:ॲक्सिस बँकेत धर्मांतर नाही तर लैंगिक छळाची चौकशी झाली- नवनाथ बन

अमृता फडणवीस यांनी ॲक्सिस बँकेत धर्मातरांचा प्रकार झाला होता असे सांगितले नाही तर लैंगिक छळाचे प्रकरण झाले होते आणि या प्रकरणी रितसर चौकशी केल्याचे सांगितले. लैंगिक छळाबद्दलच बोलायचे झाले तर पाटकर फाईल्समध्ये तुम्ही एका महिलेबद्दल काय बोलला, त्यांच्यावर कसा अन्याय केला, हे पाटकर फाईल्समध्ये महाराष्ट्राने ऐकले आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे….

Read More

कर्जमाफीची पहिली यादी आज; 68 लाख शेतकऱ्यांना लाभ:तिजोरीवर 4,400 कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा

राज्य सरकारकडून शेतकरी कर्जमुक्तीची पहिली यादी उद्या बुधवारी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना दिला जाणारा प्रोत्साहनपर लाभ आता ५० हजारांवरून थेट २ लाखांपर्यंत वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने योजनेची अंमलबजावणी वेगाने केली जात आहे,अशी माहिती मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. लाभार्थी संख्या, आर्थिक भार आधीचा…

Read More

'राम मंदिराच्या बेईमानांना 7 पिढ्यांपर्यंत शाप लागेल':नृपेंद्र मिश्रा म्हणाले- चर्चा आहे की लोक खिशात नोटांची बंडले घेऊन गेले, बँकही वाचू शकत नाही

‘चंपत राय श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे कर्तेधर्ते आहेत. चंपत राय यांच्या निष्ठेवर मी प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही. ते गेल्या 35 वर्षांपासून मंदिर आंदोलनाशी जोडले गेले आहेत. पण देखरेखीमध्ये कमतरता राहिली आहे. देणगीमध्ये बेईमानी करणाऱ्यांना 7 पिढ्यांपर्यंत शाप लागेल.’ अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात माजी आयएएस नृपेंद्र मिश्रा यांनी एका मीडिया हाऊसशी बोलताना हे सांगितले. 71…

Read More

राजा खून प्रकरण- सोनम रघुवंशीचा जामीन कायम:न्यायालयाचा स्थगिती देण्यास नकार; मेघालय सरकारने रद्द करण्याची याचिका दाखल केली होती

राजा रघुवंशी हत्याकांडातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशीचा जामीन कायम राहील. सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी यावर स्थगिती देण्यास नकार दिला आहे. यापूर्वी 15 जून रोजी सोनम रघुवंशीने सांगितले होते की ती नेपाळला पळून गेली नाही. तिने म्हटले होते – माझ्याबद्दल खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत. जनतेला हेच सांगू इच्छिते की कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका. सोनमने एका…

Read More

हिंगोली जिल्ह्यात डिझेलची अचानक मागणी वाढल्याने टंचाई:वाहनधारकांनी आवश्यक तेवढेच डिझेल घ्यावे, प्रशासनाचे आवाहन

हिंगोली जिल्ह्यात मागील पंधरा दिवसात डिझेलची अचानक मागणी वाढली असून त्यामुळे डिझेलचा तुटवडा भासू लागला आहे. मात्र कंपन्यांकडून डिझेलचा पुरवठा सुरळीत होत असून वाहनधारकांनी आवश्यक तेवढे डिझेल भरावे असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील यांनी केली आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये मागील पंधरा दिवसापासून डिझेलची मागणी अचानक वाढली आहे. सध्या शेतीची कामे सुरू असून नांगरणी व…

Read More

रणवीर सिंहने मोहन भागवत यांची घेतली भेट:नागपूरच्या रेशीमबाग स्मृती मंदिरात पोहोचला, RSS चे संस्थापक हेडगेवार यांना आदरांजली वाहिली

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहने शुक्रवारी नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) चे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मारकाला भेट दिली. त्यांनी त्यांना आदरांजली वाहिली आणि संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. पीटीआयच्या वृत्तानुसार, अभिनेत्याने संघाचे दुसरे सरसंघचालक एम.एस. गोळवलकर यांच्या नागपूर येथील स्मारकावर त्यांना आदरांजली वाहिली. रणवीर सिंह दुपारी सुमारे 4 वाजता मुंबईहून चार्टर्ड विमानाने नागपूरला पोहोचले….

Read More

राज्यात पावसाचा जोर ओसरला:विदर्भाला विश्रांती! तरीही पुणे-साताऱ्यासह 17 जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट

गेले चार दिवस संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः झोडपून काढणाऱ्या पावसाचा जोर आज थोडा कमी झाला आहे. सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून, काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र, आज पावसाने काहीशी उसंत घेतल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. पावसाचा जोर कमी…

Read More

1000 शाळांत पटपडताळणी; पहिल्या दिवशीच ॲप ठप्प झाल्यामुळे गोंधळ:वैजापुरात अनेक शाळांनी ऑफलाइन माहिती केली गोळा‎

जिल्ह्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची अचूक नोंद सुनिश्चित करण्यासाठी पटपडताळणी मोहिमेला शनिवारपासून सुरुवात झाली. मात्र, पहिल्याच दिवशी स्टुडंट पोर्टल ॲप व्यवस्थित न चालल्याने अनेक शाळांमध्ये गोंधळ उडाला. ऑनलाइन नोंदी करता न आल्याने काही ठिकाणी माहिती ऑफलाईन पद्धतीने गोळा करण्यात आली. गैरहजर विद्यार्थ्यांच्या पडताळणीबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. पहिल्या दिवशी जिल्ह्यात खासगी व जिल्हा परिषदेच्या १०८७ शाळांची पटपडताळणी…

Read More

भगवान चवलेंनी माउंट धौलागिरी केले सर:जगातील सातवे उंच शिखर पादाक्रांत, अनेक अष्टहजारी शिखरेही समिट

पुण्यातील गिर्यारोहक भगवान चवले यांनी जगातील सातवे सर्वात उंच शिखर माउंट धौलागिरी यशस्वीरित्या सर केले आहे. १८ एप्रिल २०२४ रोजी त्यांनी हे शिखर पादाक्रांत केले. मुळशी तालुक्यातील टेमघर धरणाच्या पायथ्याशी असलेल्या लव्हार्डे येथील रहिवासी असलेले चवले हे एलआयसीमध्ये विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. धौलागिरी हे ८,१६७ मीटर (२६,७९५ फूट) उंचीचे शिखर पश्चिम-मध्य नेपाळमध्ये स्थित आहे….

Read More

कैलास मानसरोवर यात्रेचा पहिला गट चीनमध्ये पोहोचला:लिपुलेख खिंडीत चिनी सुरक्षा यंत्रणांनी कागदपत्रे तपासली, दुसरा गट गुंजीला पोहोचला

सुमारे पाच वर्षांनंतर सुरू झालेल्या कैलास मानसरोवर यात्रेत शुक्रवारी पहिला गट लिपुलेख खिंड पार करून तिबेट (चीन) मध्ये पोहोचला आहे. 52 सदस्यांच्या गटाने सकाळी 9 वाजता सीमा ओलांडली, जिथे चिनी सुरक्षा यंत्रणांनी प्रवाशांच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर त्यांना प्रवेश दिला. पहिला गट सकाळी 7 वाजता नाभीढांग येथून लिपुलेख खिंडीसाठी रवाना झाला. या गटात 48 भाविक, एक…

Read More