Headlines

बद्रीनाथ देणगी वाद- बीकेटीसीच्या चौकशी समितीवर प्रश्नचिन्ह:भैरव सेना म्हणाली- सध्या थेट पुरावे नाहीत, म्हणून SIT चौकशी व्हावी; CM धामी यांना पाठवले पत्र

अयोध्या येथील राम मंदिरात देणगीवरून निर्माण झालेल्या वादामुळे आता बद्रीनाथ धाममधील देणगीत कथित गैरव्यवहाराच्या आरोपाचे प्रकरणही वाढत चालले आहे. हे प्रकरण समोर आणणारे भैरव सेना उत्तराखंडचे अध्यक्ष संदीप खत्री यांनी डेहराडूनमध्ये पत्रकार परिषद घेऊन श्री बद्री-केदार मंदिर समितीने (BKTC) स्थापन केलेल्या चार सदस्यीय चौकशी समितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांचे म्हणणे आहे की, सध्या संघटनेकडे आरोपांची…

Read More

हॉटेलमध्ये घरचे अन्न खाण्यावरील बंदी योग्यच:पाण्याच्या बाटलीवर जास्त दर आकारणेही कायदेशीर, ग्राहक आयोगाचा महत्त्वपूर्ण निकाल

हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये जाताना लहान मुले अथवा ज्येष्ठ नागरिकांसाठी घरून जेवणाचा डबा घेऊन जाणाऱ्या ग्राहकांना ग्राहक न्यायालयाने एक मोठा झटका दिला आहे. हॉटेल्समध्ये ‘बाहेरचे अन्न खाण्यास मनाई आहे’ असे सक्तीचे फलक लावणे आणि त्यानुसार ग्राहकांना मज्जाव करणे कायदेशीरदृष्ट्या पूर्णपणे योग्यच असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे. यासोबतच, हॉटेलमध्ये पाण्याच्या बाटलीवर छापील…

Read More

ज्येष्ठ गीतकार जहीर आलम यांचे नागपुरात निधन:'तुम तो ठहरे परदेसी' फेम गीतकाराच्या निधनाने संगीत विश्वावर शोककळा

ज्येष्ठ गीतकार जहीर आलम यांचे नागपुरात निधन झाले. ते ‘तुम तो ठहरे परदेसी’ या गाण्याचे गीतकार म्हणून प्रसिद्ध होते. रविवारी रात्री एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संगीत आणि साहित्य क्षेत्रात शोककळा पसरली आहे. जहीर आलम यांनी ९० च्या दशकात ‘तुम तो ठहरे परदेसी’ हे अजरामर गीत लिहिले. अल्ताफ राजा यांनी…

Read More

शिंदे गटाला पश्चाताप झाला असेल तर 'मातोश्री'वर यावे:शिंदे गट आमचा मुख्य शत्रू, पण भाजप काही दानशूर नाही; संजय राऊतांचा दोन्ही पक्षांवर जोरदार प्रहार

उबाठाचा पहिल्या क्रमाकांचा शत्रू हा शिंदे गट आहे. याचा अर्थ असा नाही की भाजप काही दानशूर पक्ष आहे, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. दोन्ही शिवसेना एकत्र यावे असे मत व्यक्त करत असाल तर आम्ही मातोश्रीवर बसलो आहोत. तुम्हाला पश्चताप झाला असेल तर तो व्यक्त करण्याची जागा ही मातोश्री हे निवासस्थान आहे. ज्या…

Read More

वरुडमध्ये अतितापमानामुळे संत्रा-मोसंबीची फळगळ:शेतकऱ्यांकडून हेक्टरी १ लाखाच्या मदतीची मागणी, मुख्यमंत्र्यांना निवेदन

वरुड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या तापमानामुळे संत्रा आणि मोसंबीच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणावर फळगळ झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीपोटी शासनाने प्रतिहेक्टरी किमान एक लाख रुपयांची मदत तातडीने जाहीर करावी, अशी मागणी ‘किसान न्याय हक्क संघर्ष समिती’ने केली आहे. यासंदर्भात तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठवण्यात आले आहे. वरुड तालुका संत्रा आणि…

Read More

जयपूरमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला आग, मुलासह 3 ठार:होरपळल्यामुळे रस्त्यावर तडफडत होते लोक; भरवस्तीत सुरू होता कारखाना

जयपूरमधील खोह नागोरियान परिसरात असलेल्या फटाक्यांच्या कारखान्यात मंगळवारी सकाळी 11 वाजता भीषण आग लागली. या आगीत एका मुलासह तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर 6 मजूर गंभीर जखमी झाले. मृत्यू झालेल्यांमध्ये रहीम, रुबिन (१५) आणि अब्दुल वाहिद यांचा समावेश आहे. भाजल्यामुळे जखमी झालेल्यांत अजीम खान, नासीर खान, समीर खान, बिलाल आणि अशफाक यांचा समावेश आहे….

Read More

नक्षलवाद्यांचा शस्त्रनिर्मिती कारखाना उद्ध्वस्त; 25 किलो RDX जप्त:'ऑपरेशन अंतिम प्रहार' अंतर्गत महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर मोठी कारवाई

महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांच्या मोठ्या शस्त्रनिर्मिती कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. ‘ऑपरेशन अंतिम प्रहार’ अंतर्गत २७ मे रोजी गडचिरोली आणि नारायणपूर (छत्तीसगड) पोलिसांनी संयुक्त कारवाई करत हा कारखाना उद्ध्वस्त केला. यात इन्सास रायफल्स, १२ बोअर रायफल्स आणि २५ किलो आरडीएक्ससह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे…

Read More

काश्मीर- गुलमर्ग रोपवे अचानक थांबला, हवेत 300 पर्यटक अडकले:यांत लहान मुले-वृद्धही, अनेक लोक घाबरून रडू लागले; सेना-पोलिसांचे बचावकार्य सुरू

जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध गुलमर्ग रोपवे (गुलमर्ग गोंडोला) मध्ये सोमवारी मोठा तांत्रिक बिघाड झाला. यामुळे रोपवेच्या सर्व केबिन हवेतच थांबल्या. सुमारे 300 पर्यटक अडकले. अनेक पर्यटक घाबरून रडू लागले आणि खाली उतरवण्यासाठी ओरडू लागले. प्रत्यक्षदर्शींच्या मते, लहान मुले आणि वृद्धांमध्ये सर्वाधिक भीतीचे वातावरण दिसून आले. घटनेची माहिती मिळताच श्रीनगरहून विशेष बचाव पथके घटनास्थळी पाठवण्यात आली आहेत. सेनाही…

Read More

स्पॉटिफायने एका वर्षात 7.5 कोटी स्पॅम ट्रॅक हटवले:AI म्युझिकचा धोका; दररोज 50 हजार ट्रॅक रिलीज, व्हर्च्युअल बँड्सचे 10 लाख श्रोते

एआयमुळे आता टेक्स्ट प्रॉम्प्टवरून काही सेकंदात गाणे तयार होत आहे आणि ते कोणत्याही खऱ्या गायकाच्या नावाने अपलोड केले जाऊ शकते. याचा फायदा घेऊन काही लोक केवळ व्ह्यूज मिळवत नाहीत, तर रॉयल्टी देखील कमावत आहेत. गार्डियन वृत्तपत्रानुसार, स्पॉटिफायवर एआयने तयार केलेल्या बनावट कलाकारांची वाढती संख्या आता एका मोठ्या उद्योगाच्या संकटात बदलली आहे. असा अंदाज आहे की…

Read More

राम नदी चित्रपट महोत्सव सुरू:ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ परांजपे यांच्या हस्ते उदघाटन, नदी परिसरातील नैसर्गिक अधिवास जतनाचे आवाहन

कोहिनूर कट्टातर्फे आयोजित कोहिनूर राम नदी चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली आहे. ज्येष्ठ पर्यावरण व पाणी तज्ज्ञ तसेच गोमुखचे अध्यक्ष प्रा. विजय परांजपे यांच्या हस्ते महोत्सवाच्या पोस्टरचे अनावरण करून त्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना प्रा. परांजपे यांनी राम नदीच्या पुनरुज्जीवनासाठी तिच्या उगमस्थानापासून संगमापर्यंत सखोल अभ्यास होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. नदीची वारी-परिक्रमा व्हावी आणि मानवनिर्मित…

Read More